कान्हूर मेसाई (सुनिल जिते): शिरूर तालुक्यातील संवेदनशील असणाऱ्या रांजणगाव -कान्हूर मेसाई या गटात ‘काटे की टक्कर’ चाललेल्या मतदानात एका-एका मतांचा विचार होत आहे. अशाप्रसंगी आज स्वतःचं लग्न असतानाही ‘आधी मतदान, मग लग्न’ असं ठरवून नवरदेव गणेश खर्डे यांनी चक्क आपला मतदानाचा हक्क बजावला. याची चर्चा कान्हूर मेसाईमध्ये दिवसभर रंगली.
कान्हूर मेसाई येथील जि.प शाळेत या नवरदेवानी मतदान केले. सायं सहा वाजता स्वतःचं लग्न असतानाही आणि घरात लग्नाची लगीनघाई असतानाही वेळात वेळ काढून आपल्याला घटनेनं दिलेला मतदानाचा अधिकार प्रथम बजावायचा, असा मनोदय नवरदेवनं केला आणि त्याप्रमाणं लग्न मंडपात जाण्याआधी वेशभूषा परिधान करून,हा नवरदेव मतदानासाठी हजर झाला.
दरम्यान, रांजणगाव – कान्हूर गटातील येथील निवडणूक ही संवेदनशील म्हणून परिचित असताना एका-एका मतदानाचा हिशोब लावला जात आहे. अशा परिस्थितीत हे मतदान झाल्यानं या घटनेची चर्चा कान्हूर मेसाई येथे घडून आली.
मुंबई: लोकशाहीमध्ये कोणत्याही नेत्याची खरी ओळख सत्ता किंवा पदावरून नव्हे, तर जनतेच्या विश्वासावरून ठरते. हा…
सार्वजनिक मालमत्तेचे १ लाख ३१ हजार ७५० रुपयांचे नुकसान; एकाविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा शिरुर…
बोगस विद्यार्थी, बनावट शिक्षक मंजुरी, कोरे धनादेश आणि स्टॅम्प पेपर जप्त; मालेगाव-पुण्यापर्यंत तपासाचे धागेदोरे परभणी:…
मुंबई: राज्यात दुधातील भेसळीच्या वाढत्या प्रकारांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अन्न व औषध…
मुंबई: भारत आणि युनायटेड किंगडम (यूके) यांच्यातील व्यापक आर्थिक व व्यापार करार (FTA) अंमलात आल्याने…
छत्रपती संभाजीनगर : 'सेफ फूड – सेफ महाराष्ट्र' मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासन (FDA) ने…