shirur-kurshi-utpanna-bajar samiti
शिरूर (तेजस फडके): शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत मतदानाला अवघे दोन दिवस शिल्लक असताना उच्च न्यायालयाने संपूर्ण निवडणूक प्रक्रिया रद्द करून ती नव्याने राबविण्याचे आदेश दिल्याने तालुक्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मतदार यादीतील त्रुटी आणि मोठ्या संख्येने ग्रामपंचायत सदस्यांना मतदानाच्या अधिकारापासून वंचित ठेवल्याच्या मुद्द्यावर न्यायालयाने हा महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.
निवडणुकीपूर्वीच मतदार पात्रतेच्या मुद्द्यावरून वाद निर्माण झाला होता. शिरूर तालुक्यातील ९६ ग्रामपंचायतींपैकी तब्बल ७८ ग्रामपंचायतींतील ७२९ सदस्यांना मतदार आणि उमेदवार म्हणून अपात्र ठरविण्यात आले होते. त्यामुळे संबंधित सदस्यांमध्ये तीव्र नाराजी होती. या निर्णयाविरोधात माजी आमदार अशोक पवार यांच्या पुढाकारातून शिक्रापूरचे माजी सरपंच मयूर करंजे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्यानंतर या निवडणुकीचे भवितव्य न्यायालयाच्या निर्णयावर अवलंबून होते.
उच्च न्यायालयाने आता विद्यमान मतदार यादी बेकायदेशीर ठरवत ती रद्द केली असून, नव्याने पात्र मतदारांची यादी तयार करण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानंतर संपूर्ण निवडणूक कार्यक्रम नव्याने जाहीर करून मतदानाची प्रक्रिया पुन्हा पार पडणार आहे.
या निर्णयामुळे शिरूर बाजार समितीच्या निवडणुकीतील राजकीय समीकरणे बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. प्रचाराच्या अंतिम टप्प्यात आलेल्या निवडणुकीला अचानक ब्रेक लागल्याने उमेदवार, कार्यकर्ते आणि मतदारांमध्ये या निर्णयाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. आता सर्वांचे लक्ष नव्या मतदार यादीसह जाहीर होणाऱ्या निवडणूक कार्यक्रमाकडे लागले आहे.
लोकशाहीचा हा मोठा विजय…
“शिरूर बाजार समितीची निवडणूक ही संपूर्ण तालुक्याची असताना केवळ १८ ग्रामपंचायतींनाच मतदानाचा अधिकार देऊन ७८ ग्रामपंचायतींना वंचित ठेवणे हा लोकशाहीवरील अन्याय होता. या विरोधात आम्ही न्यायालयात दाद मागितली आणि आज आमच्या पाठपुराव्याला यश मिळाले आहे. उच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे आता ७२९ ग्रामपंचायत सदस्यांना मतदानाचा हक्क मिळणार असून, हा लोकशाहीचा मोठा विजय आहे.”
– अशोक पवार, माजी आमदार
शिरुर बाजार समितीच्या उमेदवारीवरुन दिलीप हिंगे यांचा स्थानिक नेतृत्वावर अप्रत्यक्ष निशाणा
शिरुर बाजार समिती निवडणुक; अशोक पवारांवर टिका करणाऱ्या माऊली कटकेंनी दिड वर्षात काय केले…?
शिरुर बाजार समितीची बाभुळसरमध्ये पुनरावृत्ती…? सत्ताधाऱ्यांना धक्का देत उपसरपंचपदी गणेश वाळके
शिरुर; ‘हेड टू टेल’ आणि ‘टेल टू हेड’ समजायला विद्यमान आमदारांना अजुन काही दिवस लागतील”; अशोक पवार
आमदाबाद येथील नितीन थोरात यांचा जिल्हा परिषदेच्या वतीने सन्मान!
कोरेगाव भीमा : पुणे-अहिल्यानगर महामार्गावरील वाढत्या वाहतूक कोंडीचा गंभीर फटका सणसवाडी, कोरेगाव भीमा आणि रांजणगाव…
काही पारंपरिक पदार्थ ठराविक सणांना किंवा ठराविक पदार्थांसोबत केले जातात. जसे महाराष्ट्रात फार लोकप्रिय असलेला…
शरीराला आपलं काम करण्यासाठी आवश्यक पोषक तत्वांची गरज असते. शरीरातील वेगवेगळ्या अवयवांसोबतच मेंदुला सुद्धा पोषक…
थकवा हा शारीरिक किंवा मानसिक स्वरूपाचा असू शकतो. जर सतत थकवा जाणवत असेल तर त्यामागे…
मुंबई: भाजपा सरकारच्या काळात परीक्षांना पेपरफुटीचे ग्रहण लागले असून सरकार एकही परीक्षा व्यवस्थित घेऊ शकत नाही.…
मुंबई: मुख्यमंत्री वैद्यकीय सहाय्यता निधीतून अवयव प्रत्यारोपणासाठी शेकडो रुग्णांना कोट्यवधी रुपयांची मदत मिळते, ही निश्चितच…