महाराष्ट्र

लोकांनी आपल्यावर ठेवलेल्या विश्वासाला खरे उतरुन पक्ष बळकटीसाठी प्रयत्न करुया

मुंबई: लोकांनी आपल्यावर ठेवलेल्या विश्वासाला खरे उतरुन पक्षाचे नेते अजितदादा पवार आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या मार्गदर्शनाखाली आपला पक्ष अधिक बळकट कसा करता येईल यासाठी प्रयत्न करूया, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांनी केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबई येथील प्रदेश कार्यालयात राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल पटेल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी पक्षाच्यावतीने त्यांनी सर्व देशवासीयांना स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. आपला देश प्रगतीपथावर चालत राहण्यासाठी देशामधील सामान्य शेतकरी, दलित, आदिवासी, कामगार, युवा, महिला अशा सर्व घटकांचा समावेश असावा असे मत प्रफुल पटेल यांनी व्यक्त केले.

आपण मिळून राज्याची आणि देशाची उत्तमरीत्या सेवा करूया. लोकांची आपल्या पक्षाकडून असलेली अपेक्षा यशस्वीपणे पूर्ण करण्याचा संकल्प करूया. आदरणीय शरद पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली १९९९ साली आपल्या पक्षाची स्थापना करताना आपण जो संकल्प केला होता त्याप्रमाणे अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची उन्नती सतत होत राहिली. आजचा दिवस हा देशासोबतच आपल्या पक्षासाठीही शुभ दिवस आहे. राज्याची सेवा करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. राज्यकर्त्यांना केवळ सत्तेसाठी संधी मिळत नाही तर खऱ्या अर्थाने आपले विचार आणि आचारांनी लोकांच्या सेवेची आणि विकासाची जबाबदारी मिळते, ती जनसेवेत अर्पित करण्याचा प्रयत्न करूया असेही प्रफुल पटेल यांनी स्पष्ट केले

आपल्या पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याचे देशाच्या प्रगतीमध्ये उल्लेखनीय योगदान राहिल; सुनिल तटकरे

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधान, धर्मनिरपेक्ष विचार दिले. यातून देशाची संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था अधिक मजबूत करण्याचे काम आपण प्रत्येकाने मिळून करायला हवे. आपल्या पक्षातील प्रत्येक कार्यकर्त्याचे देशाच्या प्रगतीमध्ये उल्लेखनीय योगदान राहिल, असा विश्वास प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी व्यक्त केला.

देशातील संसदीय लोकशाही प्रणाली, एकात्मता, अखंडता, देशाची जलद गतीने विकसित होण्याची प्रक्रिया अव्याहतपणे सुरु ठेवणे हे २१ व्या शतकाच्या दुसऱ्या दशकातील आपल्या सर्वांचे कर्तव्य ठरते. देशाच्या अमृतमहोत्सवाचा देशवासियांमध्ये प्रचंड उत्साह आहे. प्रत्येक भारतीयाने देशाप्रतीच्या आपल्या योगदानातून देशाचे भवितव्य जगाच्या पाठीवर अधोरेखित करण्याचे काम करावे, असे आवाहनही सुनिल तटकरे यांनी केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबई प्रेस क्लबमधून तीन सदस्यांची हकालपट्टी; भीमा कोरेगाव प्रकरणाशी संबंधित बैठक ठरली कारणीभूत

मुंबई: देशातील प्रतिष्ठित पत्रकार संघटनांपैकी एक असलेल्या Mumbai Press Club ने आपल्या तीन सदस्यांची हकालपट्टी…

3 तास ago

राज्यात पर्यटन विकासाला गती; पायाभूत सुविधा व सेवांचा दर्जा उंचावण्यावर भर; मंत्री शंभूराज देसाई

मुंबई: राज्यातील पर्यटन क्षेत्र अधिक सक्षम, परिणामकारक आणि पर्यटकाभिमुख करण्यासाठी पायाभूत सुविधा मजबूत करणे, सेवांचा…

4 तास ago

कोल्हापूरात तरुणींवर अत्याचार व ब्लॅकमेल प्रकरण; मुख्य आरोपी अटकेत, साथीदार फरार

सोशल मीडियातून मैत्री करून लॉजवर नेऊन अत्याचार; अश्लील व्हिडिओद्वारे ब्लॅकमेल केल्याचा आरोप, १५ हून अधिक…

4 तास ago

महाराष्ट्रात कामगार कायद्यांचे नवे मसुदे जाहीर; ४५ दिवसांत हरकती-सूचना मागविल्या

मुंबई: राज्यातील कामगार क्षेत्रातील कायदे अधिक सुलभ, पारदर्शक आणि प्रभावी करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने महत्त्वपूर्ण…

4 तास ago

CSMT परिसरात हरवलेल्या ८ वर्षीय बालिकेचा तासाभरात शोध; महिला फौजदार चेतना पाटील यांचा मंत्रालयात सन्मान

मुंबई: छत्रपती संभाजीनगर येथून कुटुंबासह मुंबईत पर्यटनासाठी आलेली ८ वर्षीय अनाबिया सुलतान मुस्ताक शेख ही…

4 तास ago

पत्रा चाळ रहिवाशांना दिलासा; भाड्यात १०% वाढीचा निर्णय

मुंबई: गोरेगावमधील पत्रा चाळ रहिवाशांच्या विविध प्रलंबित प्रश्नांवर तोडगा काढण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मंत्रालयात…

4 तास ago