मुंबई : महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाने (एसटी) विविध सवलत योजनांचा लाभ घेण्यासाठी एनसीएमसी (NCMC) स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्याच्या निर्णयाला मुदतवाढ दिली आहे. पूर्वी १ ऑगस्टपर्यंत असलेली अंतिम मुदत आता १ सप्टेंबर २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे महिला, ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि इतर लाभार्थ्यांना स्मार्ट कार्ड काढण्यासाठी आणखी एक महिन्याचा अतिरिक्त वेळ मिळाला आहे.
या योजनांसाठी NCMC स्मार्ट कार्ड बंधनकारक
महिला सन्मान योजना – महिलांना एसटी प्रवासात ५० टक्के सवलत.
विद्यार्थी पास योजना – शालेय विद्यार्थ्यांना ६६.६७ टक्के सवलतीसह मासिक पास.
पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर योजना – इयत्ता १२ वीपर्यंतच्या विद्यार्थिनींसाठी मोफत प्रवास.
ज्येष्ठ नागरिक सवलत – ६५ ते ७५ वर्षे वयोगटासाठी ५० टक्के सवलत.
अमृत ज्येष्ठ नागरिक योजना – ७५ वर्षांवरील नागरिकांसाठी एसटी प्रवास पूर्णपणे मोफत.
स्मार्ट कार्ड कसे मिळेल?
महिला व ज्येष्ठ नागरिकांचे कार्ड आधार कार्डशी जोडले जाईल.
विद्यार्थ्यांचे कार्ड SARAL क्रमांकाशी लिंक केले जाईल.
दिव्यांग नागरिकांचे कार्ड UDID क्रमांकाशी जोडले जाईल.
स्वातंत्र्यसैनिक, पत्रकार आणि राज्य पुरस्कार विजेत्यांना विभागीय मुख्यालयातून कार्ड उपलब्ध होईल.
महत्त्वाचे नियम
अधिकृत केंद्रावर जाऊन स्मार्ट कार्ड काढता येईल.
सवलतीच्या तिकिटांची रक्कम थेट कार्डच्या वॉलेटमधून वजा होईल.
कार्डमध्ये रोख रक्कम किंवा UPI द्वारे रिचार्ज करण्याची सुविधा उपलब्ध आहे.
एसटी महामंडळाने सर्व पात्र लाभार्थ्यांना १ सप्टेंबरपूर्वी NCMC स्मार्ट कार्ड काढून सवलतींचा लाभ अखंडपणे सुरू ठेवण्याचे आवाहन केले आहे.
सरळ सेवा भरतीचे प्रमाण कमी करून लाखो स्पर्धा परीक्षार्थींवर अन्याय; काँग्रेसचा सरकारला इशारा मुंबई: एमपीएससीमार्फत…
अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, अनेक गंभीर आजारांची सुरूवात ही पोटापासूनच होते. त्यामुळेच पोटाचं आरोग्य…
आजकाल शरीरात यूरिक अॅसिड वाढणं ही एक कॉमन समस्या झाली आहे. खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी…
पचन सुधारते: बेलाच्या सरबतात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे पचन सुधारते आणि गॅस, अतिसार आणि…
मुंबई: ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ९००…
उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता; रस्ते, वाहनतळ, पालखी मार्ग आणि सार्वजनिक सुविधांचा होणार सर्वांगीण विकास…