महाराष्ट्र

महादेव मुंडेंना मारुन गळ्याजवळचा मांसाचा तुकडा काढला अन्..

मुंबई: महादेव मुंडे यांचा खून 12 गुंठे जमिनीसाठी झाला. ती जमीन वाल्मिक कराड यांच्या मुलाला घ्यायची होती. जमिनीचा वाद वाढत गेला, पुढे या प्रकरणातूनच त्यांचा खून करण्यात आल्याची माहिती सतीश फड आणि ज्ञानेश्वरी मुंडे यांनी रोहित पवार यांना दिली.

वाल्मिक कराडची दोन मुलं आणि गोट्या गित्ते यांनी महादेव मुंडेंना निर्घृणपणे मारले. महादेव मुंडे यांच्या गळ्याजवळचा मांसाचा तुकडा काढण्यात आला होता, हे पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये समोर आले आहे. आमदार रोहित पवार यांनी मंगळवारी परळीत महादेव मुंडे कुटुंबीयांची भेट घेतली. मुंडे कुटुंबीयांकडून संपूर्ण प्रकरणाची माहितीही घेतली. यानंतर ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते.

कराडचे जुने सहकारी असलेले बाळा बांगर आता या प्रकरणाबाबत माहिती समोर आणत आहेत. त्यांनी महादेव मुंडेंच्या गळ्याजवळचा मांसाचा तुकडा टेबलवर वाल्मिक कराड याच्यासमोर ठेवण्यात आल्याचे सांगितले. ही सर्व माहिती मला आज मुंडे कुटुंबाकडून सांगण्यात आली. मी या प्रकरणात एसपींना फोन केला. मात्र, एफआयआरमध्ये आणखी काही नावं आलेली नाहीत, असा आरोप रोहित पवारांनी केला.

सुप्रिया सुळे या प्रकरणाबाबत माहिती घेत आहेत. जितेंद्र आव्हाड यांनी देखील अधिवेशनात याचा पाठपुरावा केलाय सर्व जाती-धर्माचे लोक या परिवारातसोबत आहेत. एसपींशी बोलल्यावर आमचे समाधान झाले नाही. पुरावे असतानाही अद्यापही आरोपी अटक नाही. या प्रकरणात सीडीआर काढण्यासाठी कुटुंबाला खर्च करावा लागला. हा खर्च सरकारने न करता सतीश फड यांनी बहिणीला न्याय मिळावा यासाठी दीड लाख रुपये खर्च करून हा डाटा काढला होता. बांगर यांनी या प्रकरणाचे फोटो दाखवले होते, त्यामध्ये महादेव मुंडे यांना अत्यंत वाईट पद्धतीने मारल्याचे दिसत आहे, असे रोहित पवार यांनी म्हटले.

संतोष साबळे नावाचे पीआय आहे त्यांना या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीमध्ये घेण्यात यावं, अशी मागणी केली आहे. याचे अधिकार आयजीकडे असल्याने आयजींना देखील मी बोललो. ते सुट्टीवर असल्याने सध्या ड्युटीवर असलेल्या उमाप यांच्यासोबत माझी चर्चा झाली. रश्मी शुक्ला यांच्याकडे आता मी संतोष साबळे यांची नियुक्ती करावी यासाठी पाठपुरावा करणार आहे. ज्ञानेश्वरी मुंडे यांना मुख्यमंत्री आणि पालकमंत्र्यांना भेटायचे आहे. मात्र त्यांना भेटू दिले जात नाही. मी तिन्ही मोठ्या नेत्यांना विनंती करतो की, यांच्याकडून तुम्हाला फोन केला जाईल किंवा तुम्ही परिवाराला फोन करून कुटुंबाचे म्हणणे ऐकावे व त्यांना न्याय द्यावा.

या प्रकरणात सर्व जाती-धर्माचे लोक आंदोलनाला बसले होते. मात्र, पोलिसांनी त्यांच्यावरच कारवाई केली. इथले लोक चांगले आणि प्रामाणिक आहेत काही ठराविक लोकांमुळे नाव खराब होत आहे. सतीश फड आणि ज्ञानेश्वरी मुंडे यांना पोलिसांचं संरक्षण दिले गेले पाहिजे, अशी माझी मागणी आहे. कराड यांच्या परिचयाचे लोक चुकीच्या कामात आहेत. गांजा ड्रग्स विकणारे त्यांची माणस आहेत ते ठराविक लोक आहेत. ते लोक या परिवाराला काहीही करू शकतात. वाल्मीक कराड आणि जे कोणी या प्रकरणात जबाबदार असेल, त्यांचे नाव घेण्यात घेण्यात यावे, अशी आमची आणि मुंडे परिवाराची मागणी आहे.

दोन वर्षापासून मुंडे परिवार न्याय मागत आहे कितीतरी वेळा ते पोलीस ठाण्यात गेले आहेत. त्यांनी आत्मदहन करण्याचा प्रयत्न देखील केला. मुंडे प्रकरणात कुठेतरी पाणी मुरत आहे तिथे कुणाला तरी प्रशासन वाचवत आहे.महादेव मुंडे प्रकरणात बबन गित्ते यांच्यासह काही जणांचे नाव घेण्याचा दबाव होता, असे ज्ञानेश्वरी मुंडे सोबत चर्चा केल्यावर दिसून येते. मुंडे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. ते प्रामाणिक लोक आहेत, हे ताकदीने लढत आहेत. बापू आंधळे प्रकरणात बबन गित्तेला अडकवले गेले, त्यामध्ये देखील वाल्मीक कराड होता. या ठिकाणी खून एकाने करायचा आणि दुसऱ्यालाच अडकवायचे, असे प्रकार होतात, याकडे रोहित पवार यांनी लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला.

वाल्मिक कराड याची १००० कोटीच्या प्रॉपर्टी जप्त करा. एवढी प्रॉपर्टी आली कुठून याची एसआयटी नेमून चौकशी करा व पार्टनरशिप कोणाची आहे हे, लोकांना कळू द्या, अशी मागणी रोहित पवार यांनी केली आहे. महादेव मुंडे हत्या प्रकरणात वाल्मिक कराड आणि त्याच्या परिवारातील जे कोणी जबाबदार असतील त्यांचे नाव गुन्ह्यात घेऊन कारवाई करावी, अशी मागणीही रोहित पवार यांनी केली. वाल्मिक कराडचा मुलगा श्री कराड याच्या परिचयाची परळी भागात लोक आहेत गांजा आणि ड्रग्स विकनारी आहेत. ती लोक काहीही करू शकतात. वाल्मिक कराड आणि त्याच्या परिवारातील जबाबदार असेल त्यांना या गुन्ह्यांमध्ये नाव घेऊन त्यांच्या कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी केली.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात कारने एकमेकांना धडक देत केला गोळीबार; एकाचा मृत्यू….

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…

13 तास ago

हिंदकेसरी महेंद्र गायकवाड यांचा भव्य नागरी सत्कार; जयकुमार गोरे यांची उपस्थिती

मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…

18 तास ago

आदरणीय अजितदादांच्या पश्चात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभासारखा

पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक मुंबई: स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक…

18 तास ago

अहिल्यादेवींच्या विचारांवर राज्यकारभार! चौंडीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; एकनाथ शिंदे

अहिल्यानगर: लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आयोजित भव्य जयंती सोहळ्यात…

18 तास ago

नवनाथ बन यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यापेक्षा सत्याचा अभ्यास करावा; राष्ट्रवादी काँग्रेसची टीका

मुंबई: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना नवनाथ बन यांनी केलेल्या विधानांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समाचार…

18 तास ago

भेसळ, विषारी दारू आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर आमदार सत्यजीत तांबे यांची घणाघाती टीका

जळगाव: अन्नपदार्थांतील भेसळ, विषारी दारूच्या घटना, शिक्षण विभागातील भ्रष्टाचार, मराठी माध्यमाच्या शाळांसमोरील आव्हाने आणि अनुदानित…

20 तास ago