महाराष्ट्र

मस्साजोग सरपंच हत्या प्रकरण: फरार कृष्णा आंधळे तीनदा गावी आल्याचा दावा

बीड: बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख यांच्या निर्घृण हत्येनंतर संपूर्ण राज्यभर संतापाची लाट उसळली होती. आरोपींना वाचवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करत विविध संघटनांनी मोर्चे काढले होते. या वाढत्या दबावानंतर पोलिस प्रशासनाने तपासाला गती दिली असून प्रमुख आरोपींना अटक करण्यात आली आहे.

या प्रकरणात वाल्मिक कराड हा कटाचा मास्टरमाईंड असल्याचा दावा करण्यात आला आहे. मात्र, कृष्णा आंधळे हा अद्याप फरार असून तो जिवंत आहे की नाही, याबाबतही चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान, संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांनी या प्रकरणात मोठा खुलासा केला आहे.

सर्व साक्षीदारांची यादी न्यायालयात सादर होणार

धनंजय देशमुख यांनी सांगितले की, काही दिवसांपूर्वी फॉरेन्सिक लॅबला पाठवण्यात आलेल्या लॅपटॉपमधील संपूर्ण डेटा रिकव्हर झाला आहे. येत्या सुनावणीत सर्व साक्षीदारांची यादी न्यायालयात सादर केली जाणार आहे.

“मागील काही दिवसांत सुनावणी लांबवण्याचा प्रयत्न करण्यात आला. चार्ज फ्रेम होऊ नये, असा त्यांचा प्रयत्न होता. मात्र आता दोषारोप दाखल झाले असून लवकरच साक्षी-पुराव्यांची यादी सादर केली जाईल. ही केस लवकर मार्गी लागावी, ही आमची मागणी आहे,” असे धनंजय देशमुख म्हणाले.

आरोपींची संपत्ती जप्त करण्यासाठी पाठपुरावा

येत्या सहा तारखेला होणाऱ्या सुनावणीत आरोपींची संपत्ती जप्त करण्याबाबत पाठपुरावा केला जाणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि सहाय्यक सरकारी वकील यांच्यामार्फत यासंदर्भात प्रयत्न सुरू आहेत.

“सीज केलेली खाती लवकर जप्त करण्यात यावीत, यासाठी आम्ही पुढाकार घेणार आहोत,” असे धनंजय देशमुख यांनी सांगितले.

फरार कृष्णा आंधळे तीन वेळा गावात?

धनंजय देशमुख यांनी दावा केला की, फरार आरोपी कृष्णा आंधळे गेल्या सहा महिन्यांत तीन वेळा गावी येऊन गेला आहे. ही माहिती संबंधित तपास यंत्रणेला देण्यात आली असून त्यांनीही आरोपी गावात आल्याची बाब मान्य केल्याचे ते म्हणाले.

मोबाईलचा वापर न करत असल्याने तपास यंत्रणांना त्याचा माग काढण्यात अडचणी येत आहेत. “आरोपीमुळे आमच्या कुटुंबाच्या जीवितास धोका आहे. त्याला तातडीने जेरबंद करावे,” अशी मागणी धनंजय देशमुख यांनी केली.

दरम्यान, या प्रकरणातील पुढील सुनावणीकडे राज्याचे लक्ष लागले असून फरार आरोपीला अटक करण्यासाठी पोलिसांकडून विशेष मोहीम राबवली जाण्याची शक्यता आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

3 तास ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

3 तास ago

तुम्हीही घाई घाईने जेवता का? १० मिनिटांत जेवण्याचा शरीरावर असा होतो परिणाम

जेवण करताना अनेकदा घरातील मोठी मंडळी ‘सावकाश जेव’ असे सांगतात. काही लोक अत्यंत हळू हळू…

3 तास ago

भीमाशंकरच्या विकासाला २८८ कोटींची गती; पुनर्वसनासाठी १९३ कोटींचा निधी

पुणे: श्री क्षेत्र भीमाशंकरचा सर्वांगीण विकास करून हे तीर्थक्षेत्र पर्यटन, स्थानिक रोजगार आणि अर्थव्यवस्थेला चालना देणारे…

3 तास ago

‘छात्रों की गुंज’मुळे भाजपच्या पोटात गोळा; विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर सरकारकडे उत्तर नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राहुल गांधी यांनी सुरू केलेल्या ‘छात्रों की गुंज’ अभियानाची भाजप आणि देवेंद्र फडणवीस सरकारने…

3 तास ago

राष्ट्रवादी काँग्रेसचे २७ सप्टेंबरला नाशिकमध्ये राज्यव्यापी शिबिर; ७५० नेते-पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे एकदिवसीय राज्यव्यापी शिबिर येत्या २७ सप्टेंबर २०२६ रोजी नाशिक येथे आयोजित करण्यात येणार…

3 तास ago