महाराष्ट्र

त्र्यंबकेश्वर येथे पत्रकारांवर झालेल्या हल्ल्याचा मीडिया असोसिएशन ऑफ इंडियाकडून तीव्र निषेध

मुंबई: त्र्यंबकेश्वर येथे टोल वसुली करणाऱ्या कंत्राटी कर्मचारी गुंडांकडून पत्रकारांवर केलेल्या जीवघेण्या हल्ल्याचा ‘मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया'(माई) कडून तीव्र शब्दात निषेध करत आहे. या हल्लेखोरांवर तत्काळ कठोर कारवाई करावी आणि या प्रकरणाची सखोल चौकशी करून ही गुंडगिरी का होते आहे? याचा शोध घेऊन अशा व्यक्ती, प्रवृत्तींचा कायमचा बिमोड करण्याची गरज आहे.

त्र्यंबकेश्वर येथे कुंभ मेळ्यासंदर्भात साधू महंताची बैठक होती, त्या बैठकीचे वृत्तांकन करण्यासाठी काही पत्रकार नाशिक येथून त्र्यंबकेश्वर येथे गेले होते. त्र्यंबकेश्वर येथे प्रवेश शुल्क वसुल करणाऱ्या गुंडांनी या पत्रकारांशी बाचाबाची करत त्यांना जबर मारहाण केली. यात झी 24 तासचे योगेश खरे, पुढारी न्यूजचे किरण ताजणे, अभिजित सोनवणे आणि इतर दोन पत्रकार जखमी झाले आहेत.

“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तथा गृहमंत्री यांनी यात गांभीर्याने लक्ष घालून कठोर कारवाई करावी आणि भविष्यात अशी कृती करणाऱ्या हल्लेखोर गुंडांना कायमचा कठोर संदेश जाईल अशी कारवाई करावी.” अशी मीडिया असोसिएशन ऑफ इंडिया मागणी करत आहे.

शीतल करदेकर 

संस्थापक अध्यक्ष

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर! वरुडे येथील आरोपीचे स्टेटस; लवकरच एकाचा मर्डर करून जेलमध्ये जाणार…

शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील वरुडे येथील एका अल्पवयीन मुलाने जुन्या वादाचा राग मनात धरून, गेल्या…

2 तास ago

Video: शिरूर तालुक्यात जमिनीच्या वादातून डोळ्यात मिरची पुड टाकत जीवघेणा हल्ला…

शिरूर (तेजस फडके) : नवीन खरेदी केलेल्या शेतजमिनीच्या वादातुन एकाने आपल्या साथीदारांच्या मदतीने एका चुलत…

5 तास ago

शिरुर! वरुडे खून प्रकरणाचा 36 तासांत उलगडा; मुलगा ताब्यात; कारण समोर…

शिक्रापुर (ओंकार भोरडे) शिरुर तालुक्यातील वरूडे गावात घराबाहेर झोपलेल्या व्यक्तीच्या निर्घृण हत्येचा उलगडा अवघ्या 36…

8 तास ago

आचारसंहितेदरम्यान घेतलेल्या निर्णयांवर काँग्रेसचा सवाल; निवडणूक आयोगाने चौकशी करावी; अनंत गाडगीळ

मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि नाशिक कुंभमेळ्यानिमित्त तपोवन विकासासाठी आर्थिक…

2 दिवस ago

शेतकरी कर्जमाफी फसवी; सर्वपक्षीय बैठक बोलवा; विजय वडेट्टीवार

नागपूर: महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही सरसकट नसून अनेक जाचक अटी-शर्तींनी युक्त असल्याने…

2 दिवस ago

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर समर्थ पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व; सर्व १४ जागांवर विजय

मुंबई: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत निर्माता…

2 दिवस ago