महाराष्ट्र

साक्षरतेच्या समान अधिकारा’चा आदर करून श्रीगणेशाचे आशीर्वाद व प्रसाद वाटण्याचा अनोखा मार्ग…

मुंबई: सुमनालय फाऊंडेशन या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्थेने १९ सप्टेंबर २०२५ रोजी शांतीवन आश्रम शाळेतील वंचित मुलांसोबत प्रेम , बाप्पाचा आशीर्वाद आणि वही आणि लेखन साहित्याचा प्रसाद वाटून गणेशोत्सव साजरा केला. शाळेतील विद्यार्थ्यांनी, प्राथमिक आणि माध्यमिक शाळेच्या मुख्याध्यापकांनी काही शिक्षकांसह सुमनालय फाऊंडेशनच्या अध्यक्ष डाॅ प्रा.सुजाता वॉरियर आणि कोषाध्यक्ष रुद्रन यांचे स्वागत केले .

अंटार्क्टिका, कासा रिओ, पलावा सिटी आणि सुमनालय फाऊंडेशन च्या अध्यक्षांंच्या निवासस्थानी गणेशोत्सवा दरम्यान संंकलित केलेल्या वह्या व लेखन साहित्याच्या स्वरूपातील बाप्पाचा प्रसाद आणि आशीर्वाद स्वीकारले.

शाळेच्या मुख्याध्यापिका क्रांती पाटील यावेळी सांगितले की , “साक्षरता वाढीसाठी सुमनालय फाऊंडेशन आणि इतर सामाजिक कार्यकर्त्यांनी अशा प्रकारच्या उपक्रमांना प्रोत्साहन दिले पाहिजे. राष्ट्र उभारणीत शिक्षणतज्ज्ञांसह स्वयंसेवी संस्था, सरकार आणि लोकांचे सहकार्य खूप महत्त्वाचे आहे…”

‘एक पेन एक पुस्तक,वही अभियानातील साहित्याचे वितरण यावेळेस करण्यात आले. वंचित मुले आणि विद्यार्थ्यांसोबत प्रेम वाटण्याच्या सुंदर संदेशासह गणेशोत्सवाचा असा आगळ समारोप मोठ्या उत्साहात संपन्न झालेला मुलांच्या चेहऱ्यावरील आनंदात दिसत होता.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

3 तास ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

4 तास ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

5 तास ago

मोशी कचरा डेपो दुर्घटना म्हणजे भ्रष्टाचाराचा हिमनग; उच्चस्तरीय चौकशीची वडेट्टीवारांची मागणी

प्रशासनाच्या निष्काळजीपणा, नियमभंग आणि वेस्ट-टू-एनर्जी प्रकल्पातील अनियमिततेवर कठोर कारवाईची मागणी मुंबई: मोशी कचरा डेपो येथे…

9 तास ago

टीईटी पेपरफुटीवर दादा भुसेंच्या राजीनाम्याची काँग्रेसची सात दिवसांची अल्टिमेटम; राज्यभर आंदोलनाचा इशारा

मुंबई : टीईटी आणि सीईटी पेपरफुटी प्रकरणावरून काँग्रेसने राज्य सरकार आणि शिक्षण मंत्री दादा भुसे यांच्यावर…

10 तास ago

नशामुक्त मुंबई’ अभियानाचा 30 जुलैला शुभारंभ; विद्यार्थी, पालक आणि शिक्षकांच्या सहभागातून वर्षभर जनजागृती

मुंबई: वाढत्या अमली पदार्थांच्या विळख्यातून तरुण पिढीला वाचवण्यासाठी राज्य सरकारतर्फे 'नशामुक्त मुंबई' अभियानाची सुरुवात 30 जुलै…

10 तास ago