महाराष्ट्र

दोन्ही राष्ट्रवादीचे विलीनीकरण? तटकरे यांच्या त्या प्रतिक्रियेने सर्वांच्याच भुवया उंचावल्या

मुंबई: सर्व मतभेद दूर सारत दोन ठाकरे 5 जुलै रोजी एकाच मंचावर आले. मराठीच्या मुद्यावर त्यांनी एकला चलो रे ऐवजी ‘आम्ही दोघे भाऊ एक होऊ’ असे संकेत दिले. त्यानंतर राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची जोरदार चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी दोन्ही खेम्यातील नेत्यांनी एकत्रिकरणाचा सूर आळवला आहे. दस्तूरखुद्द शरद पवार यांनी अगोदर विरोध पण नंतर अनुकूल संकेत दिले आहेत. आता अजित पवार राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे आणि मंत्री छगन भुजबळ यांच्या वक्तव्यांनी पुन्हा वातावरण ढवळले आहे.

शरद पवार यांनी काय दिले संकेत

28 जून 2025 रोजी कोल्हापूरात माध्यमांशी बोलताना राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी मोठे वक्तव्य केले होते. मनसे आणि शिवसेना एकाच मंचावर आल्यानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येणार का? असा सवाल शरद पवार यांना विचारण्यात आला होता. राजकारणात मतभेद विसरून एकत्र येऊन चांगले काम करणे कधीही चांगलेच. त्यामुळे सगळे मतभेद विसरून आम्ही एकत्र येत असू तर ते चांगलेच आहे असे स्पष्ट संकेत पवारांनी त्यावेळी दिले होते. सगळे मतभेद विसरून चांगले काम केले तर वाईट वाटायचे काम नाही असे दोन्ही राष्ट्रवादीच्या एकत्रीकरणावर त्यांनी भाष्य केले होते.

भाजपाशी बोलावे लागेल

तर दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची वेळ आल्यास भाजपशी बोलावे लागले असे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे म्हणाले. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची वेळ जर आली तर भाजपच्या वरिष्ठ नेतृत्वाशी बोलावे लागले असे मोठे वक्तव्य तटकरे यांनी केले आहे. त्यांच्या या वक्तव्याने दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का याविषयीची चर्चा सुरू झाली. त्यावरही तटकरे यांनी प्रतिक्रिया दिली. दोन्ही राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाची चर्चा सध्या सुरू नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले. हा मुद्दा अजून दूर दिसत आहे. माझ्यापर्यंत तरी अशी काही चर्चा आली नाही असे तटकरे म्हणाले. तर मंत्री छगन भुजबळ यांनी सुद्धा तटकरे यांच्या मताला दुजोरा दिला आहे. राष्ट्रवादीच्या विलीनीकरणासंदर्भात भाजप काय भूमिका घेतो हे अद्याप समोर आलेले नाही. पण निदान चर्चा होत आहे. दोन्ही बाजूची नेते मंडळी भूमिका आणि मतं मांडत असल्याचे दिसून येते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मुंबईत हरवलेली चिमुरडी पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुखरूप परत

मुंबई: छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस स्थानकाच्या गजबजलेल्या सबवेमध्ये औरंगाबादहून पर्यटनासाठी आलेल्या कुटुंबातील एक ८ वर्षांची…

20 तास ago

प्रश्नपत्रिका लीक प्रकरणावर अ.भा.वि.प.चा संताप; जबाबदारांवर कारवाईची मागणी

मुंबई: अखिल भारतीय विद्यार्थी परिषद (अ.भा.वि.प.) मुंबई महानगराच्या वतीने मुंबई विद्यापीठाच्या TY B.Com (Sem VI)…

21 तास ago

‘आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही’! होमगार्डचा आक्रोश; ४० हजार कुटुंबांचा जगण्याचा प्रश्न ऐरणीवर

मुंबई: “आम्ही सैनिक आहोत, खेळणं नाही... आम्हालाही सन्मानाने जगू द्या!” – ही हाक आहे महाराष्ट्रातील…

21 तास ago

साताऱ्याचे एसपी तुषार दोषी यांच्या बदल्यांवर वाद; शिवसेनेची चौकशीची मागणी

मुंबई: सातारा जिल्ह्याचे वादग्रस्त पोलीस अधीक्षक तुषार दोषी यांच्या सांगली येथील बदलीनंतर नवा वाद उफाळून…

21 तास ago

एसटी सौर ऊर्जेचा पहिला टप्पा सुरू; २.५७ मेगावॉट ग्रीड सोलर प्रकल्पास मंजुरी

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) बसस्थानके, कार्यालये, कार्यशाळा आणि आगारांच्या छतांवर सौरऊर्जेच्या माध्यमातून…

21 तास ago

काँग्रेसचे ‘पुतना मावशीचे प्रेम’; महिलांच्या प्रश्नांवर दुटप्पी भूमिका; डॉ. नीलम गोऱ्हे

महिला आरक्षणावर उपमुख्यमंत्री Eknath Shinde यांचा काँग्रेस-समाजवादी पक्षावर हल्लाबोल मुंबई: ‘नारीशक्ती वंदन’ विधेयकाबाबत लोकसभेत स्पष्ट…

21 तास ago