मुख्य बातम्या

Video; राजगड तालुक्यात विचित्र घटना ११ ट्रॅक्टर अडकले चिखलात

राजगड (प्रतिनिधी) पुणे जिल्ह्यातील राजगड परिसरातील करंजवणे गावात भात लागवडीदरम्यान एक अनोखी आणि थोडीशी गंमतीशीर घटना घडली आहे. एका ट्रॅक्टरच्या चिखलात अडकण्याने सुरु झालेला प्रकार एकामागोमाग तब्बल ११ ट्रॅक्टर अडकल्याने शेतात काम ठप्प झाले.

स्थानिक शेतकरी भात लागवडीसाठी शेतात गेले होते. मात्र, शेतात चिखल खुप खोल असल्याचा अंदाज न आल्याने एक ट्रॅक्टर चिखलात खोलवर अडकला. त्याला बाहेर काढण्यासाठी आणलेले इतर १० ट्रॅक्टरही अडकले आणि सगळ्या शेताचं दृश्य एकदम विचित्र झालं.

यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी सांगितले की, “चिखलाची खोली खूपच जास्त होती अंदाज चुकला आणि एकामागोमाग एक ११ ट्रॅक्टर फसत गेले.” या प्रकारामुळे काही वेळासाठी संपूर्ण लागवड थांबवावी लागली.

या घटनेत सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही, ही दिलासा देणारी गोष्ट आहे. मात्र शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान आणि वेळेचा अपव्यय सहन करावा लागला.

Video; शिरुर तालुक्यातील शांताई डेअरी मध्ये शेतकऱ्यांची फसवणुक होत असल्याचा आरोप

शिरुर पोलिसांनी ट्रान्सफॉर्मर चोरी करणार्‍या आंतरराज्यीय टोळीचा केला पर्दाफाश

शिरुर तपास पथकाची धडाकेबाज कारवाई मोटेवाडी येथे डाळिंब चोरी करणारा चोरटा गजाआड

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

बारामतीकरांचा अभूतपूर्व कौल; सुनिल तटकरे यांचा मानाचा मुजरा, पश्चिम बंगाल परिवर्तनावरही भाष्य

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे यांनी बारामतीतील मतदारांचे आभार मानत विक्रमी मतदानाबद्दल मानाचा…

10 तास ago

बंगालमध्ये तृणमूल पिछाडीवर! वाघासारखं लढत राहू;  ममता बॅनरजी यांची प्रतिक्रिया

कोलकाता: पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीची मतमोजणी सुरू असताना मुख्यमंत्री Mamata Banerjee यांनी पहिली प्रतिक्रिया देत…

10 तास ago

भोर नसरापूर प्रकरण! आरोपीला फाशीचीच शिक्षा होणार;  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई : भोर तालुक्यातील नसरापूर येथे चिमुकलीवर अत्याचार करून तिची हत्या करणाऱ्या आरोपीला कठोरात कठोर…

10 तास ago

शेतकऱ्यांच्या प्रश्नावरून भाजपावर काँग्रेसचा हल्लाबोल; सपकाळांचा गंभीर आरोप

मुंबई: काँग्रेस आघाडीच्या काळात शेतकऱ्यांना भरीव मदत मिळत होती, मात्र २०१४ नंतर भाजप सत्तेत आल्यानंतर…

10 तास ago

नातं हृदयाशी; बायपास सर्जरी

बायपास सर्जरी म्हटले की हातपाय गाळायचे दिवस आता गेले. बायपास केल्यानंतरही योग्य ती काळजी घेऊन…

14 तास ago

दक्षिणेत भाजपाला नकार, केरळमध्ये काँग्रेसचा विजय लोकशाहीचा; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांमध्ये भारतीय जनता पक्ष ने साम, दाम, दंड, भेद नीतीचा वापर…

14 तास ago