मुख्य बातम्या

Video; राजगड तालुक्यात विचित्र घटना ११ ट्रॅक्टर अडकले चिखलात

राजगड (प्रतिनिधी) पुणे जिल्ह्यातील राजगड परिसरातील करंजवणे गावात भात लागवडीदरम्यान एक अनोखी आणि थोडीशी गंमतीशीर घटना घडली आहे. एका ट्रॅक्टरच्या चिखलात अडकण्याने सुरु झालेला प्रकार एकामागोमाग तब्बल ११ ट्रॅक्टर अडकल्याने शेतात काम ठप्प झाले.

स्थानिक शेतकरी भात लागवडीसाठी शेतात गेले होते. मात्र, शेतात चिखल खुप खोल असल्याचा अंदाज न आल्याने एक ट्रॅक्टर चिखलात खोलवर अडकला. त्याला बाहेर काढण्यासाठी आणलेले इतर १० ट्रॅक्टरही अडकले आणि सगळ्या शेताचं दृश्य एकदम विचित्र झालं.

यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी सांगितले की, “चिखलाची खोली खूपच जास्त होती अंदाज चुकला आणि एकामागोमाग एक ११ ट्रॅक्टर फसत गेले.” या प्रकारामुळे काही वेळासाठी संपूर्ण लागवड थांबवावी लागली.

या घटनेत सुदैवाने कोणतीही जिवितहानी झाली नाही, ही दिलासा देणारी गोष्ट आहे. मात्र शेतकऱ्यांना आर्थिक नुकसान आणि वेळेचा अपव्यय सहन करावा लागला.

Video; शिरुर तालुक्यातील शांताई डेअरी मध्ये शेतकऱ्यांची फसवणुक होत असल्याचा आरोप

शिरुर पोलिसांनी ट्रान्सफॉर्मर चोरी करणार्‍या आंतरराज्यीय टोळीचा केला पर्दाफाश

शिरुर तपास पथकाची धडाकेबाज कारवाई मोटेवाडी येथे डाळिंब चोरी करणारा चोरटा गजाआड

 

शिरूर तालुका टीम

Recent Posts

१७ सप्टेंबरला बीड–पुणे रेल्वे धावणार; डिसेंबरअखेर बीड–मुंबई सेवाही सुरू करण्याचे उद्दिष्ट

मुंबई: बीड जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्याच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण ठरणारी बीड–पुणे रेल्वे सेवा येत्या १७ सप्टेंबर रोजी…

19 सेकंद ago

शिंदे गटाला निकालाआधीच टेन्शन? ‘धनुष्यबाण ठाकरेंनाच मिळणार’; असीम सरोदे यांचा मोठा दावा

मुंबई: सर्वोच्च न्यायालयात शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हासंदर्भातील सुनावणी निर्णायक टप्प्यात पोहोचली असून, आजपासून शिंदे…

5 मिनिटे ago

अष्टविनायक यात्रा म्हणजे श्रद्धा, इतिहास आणि निसर्गाचा अनोखा संगम; जाणून घ्या आठही गणरायांचे महत्त्व

Pपुणे : महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेत अष्टविनायक यात्रेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. श्रीगणेशाची आठ…

14 मिनिटे ago

धनुष्यबाण गोठवण्याची मागणी करणाऱ्यांवर शिंदेंची खरमरीत टीका; ‘उबाठा’वर निशाणा

नवी दिल्ली: “बाळासाहेब ठाकरे यांना धनुष्यबाण प्राणाहून प्रिय होता. ते देव्हाऱ्यात धनुष्यबाणाची पूजा करायचे. मात्र, २०१९…

58 मिनिटे ago

राज्यभरात २९ सप्टेंबरला ‘रोजगार महाकुंभ’; महाविद्यालयांनी पुढाकार घ्यावा; चंद्रकांत पाटील

मुंबई: राज्यातील युवक-युवतींना त्यांच्या शैक्षणिक पात्रता, कौशल्ये आणि क्षमतेनुसार रोजगाराच्या अधिकाधिक संधी उपलब्ध करून देण्यासाठी…

1 तास ago

युद्धजन्य परिस्थितीतही भारताची अर्थव्यवस्था ७.८ टक्के दराने वाढतेय; एकनाथ शिंदे

ठाणे : जगातील अनेक देशांमध्ये युद्धजन्य परिस्थिती निर्माण झालेली असताना आणि त्याचा विविध अर्थव्यवस्थांवर परिणाम…

1 तास ago