महाराष्ट्र

‘मोदी मस्ट गो’! देश आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर; यशवंत सिन्हा

मुंबई: देशासमोर गंभीर आर्थिक व राजकीय संकट उभे असून त्यातून बाहेर काढण्याची क्षमता मोदी सरकारमध्ये नाही, असा घणाघात माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अर्थशास्त्र विभाग आणि ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेसच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘भारतात येणारी आर्थिक त्सुनामी?’ या चर्चासत्रात ते बोलत होते.

सिन्हा यांनी सरकारच्या विकासदराच्या आकडेवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भारताचा प्रत्यक्ष विकासदर सरकार सांगत असलेल्या ७.७ टक्क्यांपेक्षा कमी असल्याचा दावा केला. वाढती महागाई, घटती गुंतवणूक, शेतकऱ्यांवरील संकट, रुपयाचे अवमूल्यन आणि देशातून बाहेर जाणारी गुंतवणूक यामुळे अर्थव्यवस्थेची स्थिती चिंताजनक बनल्याचे त्यांनी सांगितले. “२०४७ पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट सध्याच्या परिस्थितीत साध्य करणे कठीण आहे,” असेही ते म्हणाले.

ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अरुण कुमार यांनी नोटबंदी आणि जीएसटीमुळे असंघटित क्षेत्राला मोठा फटका बसल्याचे सांगितले. वाढती बेरोजगारी, घटती क्रयशक्ती आणि शिक्षण-आरोग्य क्षेत्रातील अपुरी गुंतवणूक यामुळे सामाजिक व आर्थिक समस्या वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हर्षवर्धन सपकाळ होते. देशातील आर्थिक प्रश्नांवर राजकारण केंद्रित होण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी शेतकरी, बेरोजगारी, महागाई आणि शिक्षण क्षेत्रातील समस्यांवर सरकारवर टीका केली.या चर्चासत्राला पृथ्वीराज चव्हाण, भालचंद्र मुणगेकर, कुमार केतकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

3 तास ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

3 तास ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

3 तास ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

18 तास ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

2 दिवस ago