महाराष्ट्र

‘मोदी मस्ट गो’! देश आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर; यशवंत सिन्हा

मुंबई: देशासमोर गंभीर आर्थिक व राजकीय संकट उभे असून त्यातून बाहेर काढण्याची क्षमता मोदी सरकारमध्ये नाही, असा घणाघात माजी केंद्रीय अर्थमंत्री यशवंत सिन्हा यांनी केला. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या अर्थशास्त्र विभाग आणि ऑल इंडिया प्रोफेशनल काँग्रेसच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘भारतात येणारी आर्थिक त्सुनामी?’ या चर्चासत्रात ते बोलत होते.

सिन्हा यांनी सरकारच्या विकासदराच्या आकडेवारीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत भारताचा प्रत्यक्ष विकासदर सरकार सांगत असलेल्या ७.७ टक्क्यांपेक्षा कमी असल्याचा दावा केला. वाढती महागाई, घटती गुंतवणूक, शेतकऱ्यांवरील संकट, रुपयाचे अवमूल्यन आणि देशातून बाहेर जाणारी गुंतवणूक यामुळे अर्थव्यवस्थेची स्थिती चिंताजनक बनल्याचे त्यांनी सांगितले. “२०४७ पर्यंत विकसित भारताचे उद्दिष्ट सध्याच्या परिस्थितीत साध्य करणे कठीण आहे,” असेही ते म्हणाले.

ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ अरुण कुमार यांनी नोटबंदी आणि जीएसटीमुळे असंघटित क्षेत्राला मोठा फटका बसल्याचे सांगितले. वाढती बेरोजगारी, घटती क्रयशक्ती आणि शिक्षण-आरोग्य क्षेत्रातील अपुरी गुंतवणूक यामुळे सामाजिक व आर्थिक समस्या वाढत असल्याचे त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी हर्षवर्धन सपकाळ होते. देशातील आर्थिक प्रश्नांवर राजकारण केंद्रित होण्याची गरज असल्याचे सांगत त्यांनी शेतकरी, बेरोजगारी, महागाई आणि शिक्षण क्षेत्रातील समस्यांवर सरकारवर टीका केली.या चर्चासत्राला पृथ्वीराज चव्हाण, भालचंद्र मुणगेकर, कुमार केतकर यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर सरकारचा बुलडोझर; जीआर मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरू; अतुल लोंढे

सरळ सेवा भरतीचे प्रमाण कमी करून लाखो स्पर्धा परीक्षार्थींवर अन्याय; काँग्रेसचा सरकारला इशारा मुंबई: एमपीएससीमार्फत…

7 तास ago

पोटात होणाऱ्या या समस्येमुळे मेंदुवर पडतो वाईट प्रभाव, जाणून घ्या कसा कराल बचाव

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, अनेक गंभीर आजारांची सुरूवात ही पोटापासूनच होते. त्यामुळेच पोटाचं आरोग्य…

8 तास ago

आल्याचा वापर करून शरीरातील Uric Acid करू शकता कमी

आजकाल शरीरात यूरिक अ‍ॅसिड वाढणं ही एक कॉमन समस्या झाली आहे. खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी…

8 तास ago

बेलाचे सरबत आरोग्यासाठी फायदेशीर

पचन सुधारते: बेलाच्या सरबतात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे पचन सुधारते आणि गॅस, अतिसार आणि…

8 तास ago

ठाण्यातील ९०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे काम फास्टट्रॅकवर पूर्ण करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ९००…

8 तास ago

अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराच्या विकासाला गती; ५०० कोटींच्या आराखड्यासाठी म्हाडा विशेष नियोजन प्राधिकरण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता; रस्ते, वाहनतळ, पालखी मार्ग आणि सार्वजनिक सुविधांचा होणार सर्वांगीण विकास…

8 तास ago