महाराष्ट्र

जेजुरीच्या विकासासाठी श्रद्धा आणि समाजसुधारणेचा समतोल आवश्यक; डॉ. नीलम गोऱ्हे

जेजुरी: जेजुरी देवस्थानच्या प्रगती व सर्वांगीण विकासासाठी राज्य स्तरावर अनेक बैठका घेण्यात आल्या असून, श्रद्धेला धक्का न लावता सामाजिक सुधारणा घडवून आणण्याचा सातत्याने प्रयत्न करण्यात आला आहे, असे प्रतिपादन डॉ. नीलम गोऱ्हे यांनी केले.

जेजुरी येथे श्री खंडोबाचे दर्शन घेतल्यानंतर पत्रकारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या. यावेळी त्यांनी श्री खंडोबाची विधिवत पूजा करून राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी तसेच महायुती सरकारच्या माध्यमातून जनहिताची कामे अधिक वेगाने पूर्ण होण्यासाठी प्रार्थना केली. देवस्थानचे विश्वस्त अॅड. विश्वास पानसे यांनी शाल, श्रीफळ आणि खंडोबाची प्रतिमा देऊन त्यांचा सत्कार केला. कोविड काळात घडशी समाजाला दिलेल्या मदतीबद्दल घडशी समाजाच्यावतीनेही त्यांचा गौरव करण्यात आला.

डॉ. गोऱ्हे यांनी सांगितले की, जेजुरीतील मुरळी प्रथा बंद करण्यासाठी करण्यात आलेल्या प्रयत्नांना मोठे यश मिळाले आहे. धर्म आणि परंपरेचा आदर राखत समाजसुधारणा साध्य होऊ शकते, हे या परिवर्तनातून सिद्ध झाले आहे. समाजातील विविध घटकांच्या सहकार्यामुळे हे शक्य झाल्याचे त्यांनी नमूद केले.

जेजुरीतील भंडाऱ्यासाठी वापरल्या जाणाऱ्या हळदीबाबत चिंता व्यक्त करत त्यांनी सेंद्रिय हळदीच्या वापराला प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले. रासायनिक व बनावट हळदीमुळे भाविकांच्या आरोग्यावर परिणाम होत असून मंदिराच्या ऐतिहासिक वास्तूलाही नुकसान पोहोचत असल्याचे त्यांनी सांगितले. राज्यातील सेंद्रिय हळद संशोधन केंद्राच्या माध्यमातून शुद्ध हळद उपलब्ध करून देण्याचे प्रयत्न करता येतील, असेही त्यांनी स्पष्ट केले. यासाठी त्यांनी श्री मार्तंड देवसंस्थानला वैयक्तिकरित्या २१ हजार रुपयांची देणगी धनादेशाद्वारे दिली.

देवस्थानच्या जमिनीचा प्रश्न सोडविण्यासाठी राज्य सरकार कटिबद्ध असल्याचे सांगत त्यांनी जेजुरीच्या विकासाला गती मिळेल, असा विश्वास व्यक्त केला. लाखो भाविकांसाठी आधुनिक सुविधांनी युक्त भक्तनिवास उभारण्याची गरज असून, यासाठी स्थानिक नागरिक आणि महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ यांनी संयुक्तपणे पुढाकार घ्यावा, असे त्या म्हणाल्या.

वाराणसीच्या धर्तीवर जेजुरीमध्ये धार्मिक पर्यटनाला चालना देणारा कॉरिडॉर विकसित करण्याची आवश्यकता असल्याचे सांगत, विकासकामांमध्ये स्थानिक नागरिकांचा सहभाग आणि विश्वास हा सर्वात महत्त्वाचा घटक असल्याचे डॉ. गोऱ्हे यांनी अधोरेखित केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर सरकारचा बुलडोझर; जीआर मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरू; अतुल लोंढे

सरळ सेवा भरतीचे प्रमाण कमी करून लाखो स्पर्धा परीक्षार्थींवर अन्याय; काँग्रेसचा सरकारला इशारा मुंबई: एमपीएससीमार्फत…

10 तास ago

पोटात होणाऱ्या या समस्येमुळे मेंदुवर पडतो वाईट प्रभाव, जाणून घ्या कसा कराल बचाव

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, अनेक गंभीर आजारांची सुरूवात ही पोटापासूनच होते. त्यामुळेच पोटाचं आरोग्य…

11 तास ago

आल्याचा वापर करून शरीरातील Uric Acid करू शकता कमी

आजकाल शरीरात यूरिक अ‍ॅसिड वाढणं ही एक कॉमन समस्या झाली आहे. खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी…

11 तास ago

बेलाचे सरबत आरोग्यासाठी फायदेशीर

पचन सुधारते: बेलाच्या सरबतात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे पचन सुधारते आणि गॅस, अतिसार आणि…

11 तास ago

ठाण्यातील ९०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे काम फास्टट्रॅकवर पूर्ण करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ९००…

11 तास ago

अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराच्या विकासाला गती; ५०० कोटींच्या आराखड्यासाठी म्हाडा विशेष नियोजन प्राधिकरण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता; रस्ते, वाहनतळ, पालखी मार्ग आणि सार्वजनिक सुविधांचा होणार सर्वांगीण विकास…

11 तास ago