नाशिक: केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग रद्द करून तो नाशिक–शिर्डी–अहिल्यानगर मार्गे नेण्याची घोषणा केल्याने उत्तर महाराष्ट्रात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या निर्णयावर विधान परिषद आमदार सत्यजीत तांबे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत हा निर्णय उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला बाधा आणणारा असल्याचे म्हटले आहे.
तांबे म्हणाले की, नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग हा केवळ नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांसाठीच नव्हे, तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, खेड तसेच मार्गावरील अनेक ग्रामीण भागासाठी महत्त्वाचा ठरणारा प्रकल्प होता. या रेल्वेमुळे पुणे शहरावरील वाहतूक आणि लोकसंख्येचा ताण कमी होण्यास मदत झाली असती. मात्र हा सरळ आणि सोपा प्रकल्प अधिक गुंतागुंतीचा करण्यात आल्याची टीका त्यांनी केली.
या निर्णयामागे राजकीय कारणे किंवा अन्य कोणते हितसंबंध आहेत का, असा सवाल उपस्थित करत तांबे यांनी रेल्वे प्रकल्प हे दीर्घकालीन विकासाच्या दृष्टीने आखले जातात, असे नमूद केले. आज घेतलेला चुकीचा निर्णय भविष्यातील पिढ्यांच्या विकासावर परिणाम करणारा ठरू शकतो, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी या विषयावर तज्ज्ञ समिती नेमून मध्यम मार्ग काढण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे येत्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री यांची भेट घेऊन या विषयात वैयक्तिक लक्ष घालण्याची विनंती करणार असल्याचे तांबे यांनी स्पष्ट केले.
नाशिकच्या औद्योगिक, आयटी आणि सेवा क्षेत्राच्या विकासासाठी उत्तम रेल्वे कनेक्टिव्हिटी अत्यावश्यक असल्याचे सांगत त्यांनी नागरिकांनीही या प्रश्नाचे गांभीर्य ओळखावे, असे आवाहन केले. तसेच सिन्नर, संगमनेर, अकोले, जुन्नर, खेड आणि मार्गावरील इतर भागांतील नागरिकांनी जनआंदोलन उभारावे, असेही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी सत्ताधारी पक्षाच्या आमदार-खासदारांनी पक्षीय भूमिका बाजूला ठेवून जनतेच्या हितासाठी पुढे यावे, असे आवाहन केले. जनतेचा आवाज उठवणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य असून सर्वांनी एकत्र येऊन या निर्णयाविरोधात लढा उभारला पाहिजे, असे तांबे यांनी सांगितले.
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी गांधी भवन येथील काँग्रेस कार्यालयात घुसून धुडगूस घातल्याचा आरोप करत…
ठाणे: उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवक व लोकप्रतिनिधींना सेवाभाव,…
आजकाल वेगवेगळ्या कारणांनी लोकांना किडनी स्टोनची समस्या होते. किडनी स्टोन झाल्याचं अनेकदा फार उशीरा समजतं.…
एक्सरसाईज आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. लोक फीट राहण्यासाठी रोज एक्सरसाईज करतात.…
मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) च्या शेअरमध्ये मंगळवारी बाजार सुरू होताच…
सातारा : राज्याचे पहिले मुख्यमंत्री तथा सहकार चळवळीचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती…