नाशिक: केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग रद्द करून तो नाशिक–शिर्डी–अहिल्यानगर मार्गे नेण्याची घोषणा केल्याने उत्तर महाराष्ट्रात नाराजीचे वातावरण निर्माण झाले आहे. या निर्णयावर विधान परिषद आमदार सत्यजीत तांबे यांनी तीव्र प्रतिक्रिया व्यक्त करत हा निर्णय उत्तर महाराष्ट्राच्या विकासाला बाधा आणणारा असल्याचे म्हटले आहे.
तांबे म्हणाले की, नाशिक–पुणे सरळ रेल्वेमार्ग हा केवळ नाशिक आणि अहिल्यानगर जिल्ह्यांसाठीच नव्हे, तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर, खेड तसेच मार्गावरील अनेक ग्रामीण भागासाठी महत्त्वाचा ठरणारा प्रकल्प होता. या रेल्वेमुळे पुणे शहरावरील वाहतूक आणि लोकसंख्येचा ताण कमी होण्यास मदत झाली असती. मात्र हा सरळ आणि सोपा प्रकल्प अधिक गुंतागुंतीचा करण्यात आल्याची टीका त्यांनी केली.
या निर्णयामागे राजकीय कारणे किंवा अन्य कोणते हितसंबंध आहेत का, असा सवाल उपस्थित करत तांबे यांनी रेल्वे प्रकल्प हे दीर्घकालीन विकासाच्या दृष्टीने आखले जातात, असे नमूद केले. आज घेतलेला चुकीचा निर्णय भविष्यातील पिढ्यांच्या विकासावर परिणाम करणारा ठरू शकतो, असेही त्यांनी सांगितले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यापूर्वी या विषयावर तज्ज्ञ समिती नेमून मध्यम मार्ग काढण्याचे आश्वासन दिले होते. त्यामुळे येत्या पावसाळी अधिवेशनात मुख्यमंत्री यांची भेट घेऊन या विषयात वैयक्तिक लक्ष घालण्याची विनंती करणार असल्याचे तांबे यांनी स्पष्ट केले.
नाशिकच्या औद्योगिक, आयटी आणि सेवा क्षेत्राच्या विकासासाठी उत्तम रेल्वे कनेक्टिव्हिटी अत्यावश्यक असल्याचे सांगत त्यांनी नागरिकांनीही या प्रश्नाचे गांभीर्य ओळखावे, असे आवाहन केले. तसेच सिन्नर, संगमनेर, अकोले, जुन्नर, खेड आणि मार्गावरील इतर भागांतील नागरिकांनी जनआंदोलन उभारावे, असेही ते म्हणाले.
यावेळी त्यांनी सत्ताधारी पक्षाच्या आमदार-खासदारांनी पक्षीय भूमिका बाजूला ठेवून जनतेच्या हितासाठी पुढे यावे, असे आवाहन केले. जनतेचा आवाज उठवणे हे लोकप्रतिनिधींचे कर्तव्य असून सर्वांनी एकत्र येऊन या निर्णयाविरोधात लढा उभारला पाहिजे, असे तांबे यांनी सांगितले.
मुंबई: राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल तंत्रज्ञानाचे आधुनिक प्रशिक्षण देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग…
मुंबई: महाराष्ट्रात मान्सूनच्या प्रगतीला झालेल्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते जय पवार यांनी मुंबईतील प्रादेशिक…
शिवसेनेच्या हिरक महोत्सवी वर्धापन दिन सोहळ्यात शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल; विधान परिषदेत महायुती सर्व १७ जागा…
शिंदोडी (तेजस फडके): गुनाट (ता. शिरुर) येथील सरकारी गायरान जमिनीवर अवैधरित्या वाळूचा साठा केला असल्याचा…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील बेट भागात जुगार, हातभट्टी दारू, ताडी तसेच अवैध मद्यविक्रीचे धंदे…
शिक्रापूर (ओमकार भोरडे): महावितरणच्या रोहित्र (डीपी) चोरीच्या घटनांना प्रतिबंध घालण्यासाठी महावितरण व पोलिस प्रशासनाच्या संयुक्त…