महाराष्ट्र

शिवसैनिकच बाळासाहेबांचे खरे वारस; हा फक्त ट्रेलर, पिक्चर अजून बाकी; एकनाथ शिंदे

शिवसेनेच्या हिरक महोत्सवी वर्धापन दिन सोहळ्यात शिंदेंचा विरोधकांवर हल्लाबोल; विधान परिषदेत महायुती सर्व १७ जागा जिंकेल, असा विश्वास

मुंबई : शिवसेनेच्या हिरक महोत्सवी वर्धापन दिनानिमित्त गोरेगाव येथील नेस्को सभागृहात आयोजित कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटावर जोरदार टीका केली. “रक्ताचं नातं सांगून किंवा सातबाऱ्यावर नाव लावून कोणी वारस होत नाही, शिवसैनिकच बाळासाहेबांचे खरे वारस आहेत,” असे म्हणत त्यांनी उबाठा गटावर निशाणा साधला.

शिंदे म्हणाले, “काही लोक भुंकत आहेत, पण कुत्री झुंडीने येतात तर वाघ एकटा येतो. कुत्रे भुंकतात आणि वाघ शिकार करतो. ही शिवसेना आहे, हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अजून बाकी आहे.” त्यांच्या या वक्तव्याने सभागृहात उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले.

बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले की, “बाळासाहेब फक्त नावात नसून विचारात आणि कामात असले पाहिजेत. खुर्चीसाठी हिंदुत्व आणि बाळासाहेबांचे विचार सोडणाऱ्यांना जनता ओळखते.” शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीमुळे दोनदा फोडली गेल्याचा आरोपही त्यांनी केला.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारताने सर्व क्षेत्रांत प्रगती केल्याचे सांगत शिवसेनेतर्फे त्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करताना शिंदे यांनी त्यांना “भस्मासूर” अशी उपमा दिली.

चार वर्षांपूर्वीच्या शिवसेना उठावाचा उल्लेख करताना शिंदे म्हणाले की, जनतेने त्या निर्णयाला स्वीकारले असून आज राज्यभर शिवसेनेचे भगवे वर्चस्व वाढत आहे. कार्यकर्त्यांच्या बळावर पक्षाने ६० आमदार निवडून आणले असून अनेक स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये शिवसेनेचे प्रतिनिधित्व वाढल्याचे त्यांनी सांगितले.

विधान परिषदेत महायुतीचा क्लीन स्वीप होईल – शिंदे

आगामी विधान परिषद निवडणुकीत महायुती सर्व १७ जागा जिंकेल आणि विरोधकांची पाटी कोरी राहील, असा विश्वास एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये उत्तम समन्वय असल्याचे सांगत त्यांनी महायुती अभेद्य असल्याचा दावा केला. राज्यभरातून मोठ्या प्रमाणावर लोक शिवसेनेत प्रवेश करत असून “शहर ते गाव, फक्त शिवसेनेचेच नाव” हेच पुढील लक्ष्य असल्याचे त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

गांधी भवनवरील हल्ल्यामागे भाजप-पोलिसांची फूस; काँग्रेस गांधींचा मार्ग सोडणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी गांधी भवन येथील काँग्रेस कार्यालयात घुसून धुडगूस घातल्याचा आरोप करत…

9 तास ago

लोकप्रतिनिधींनी मालक नव्हे, जनतेचा सेवक बनावे; एकनाथ शिंदे

ठाणे: उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवक व लोकप्रतिनिधींना सेवाभाव,…

9 तास ago

किडनी स्टोन असल्यावर कोणती फळं खावीत आणि कोणती टाळावीत

आजकाल वेगवेगळ्या कारणांनी लोकांना किडनी स्टोनची समस्या होते. किडनी स्टोन झाल्याचं अनेकदा फार उशीरा समजतं.…

14 तास ago

एक्सरसाईज नंतर लगेच पाणी पिणं पडू शकतं महागात, जाणून घ्या योग्य पद्धत कोणती

एक्सरसाईज आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. लोक फीट राहण्यासाठी रोज एक्सरसाईज करतात.…

14 तास ago

सरकारच्या हिस्सा विक्रीच्या निर्णयाने LIC शेअर घसरला; बाजार उघडताच 9% पडझड

मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) च्या शेअरमध्ये मंगळवारी बाजार सुरू होताच…

14 तास ago

यशवंतरावांच्या जिल्ह्यात ठरावांचा लिलाव दुर्दैवी! ठरावांचा बाजार म्हणजे लोकशाहीचा पराभव

सातारा : राज्याचे पहिले मुख्यमंत्री तथा सहकार चळवळीचे शिल्पकार यशवंतराव चव्हाण यांच्या जिल्ह्यात जिल्हा मध्यवर्ती…

14 तास ago