महाराष्ट्र

नवनाथ बन यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यापेक्षा सत्याचा अभ्यास करावा; राष्ट्रवादी काँग्रेसची टीका

मुंबई: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना नवनाथ बन यांनी केलेल्या विधानांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समाचार घेतला आहे. शरद पवार यांच्यावरील टीका ही अर्धसत्यावर आधारित असून केवळ राजकीय प्रसिद्धीसाठी करण्यात आल्याचा आरोप पक्षाकडून करण्यात आला आहे.

“शरद पवार कृषिमंत्री असताना शेतकऱ्यांना किती वेळा हमीभाव मिळाला?” असा प्रश्न उपस्थित करणाऱ्या नवनाथ बन यांनी प्रथम सध्याच्या सरकारकडे कांदा निर्यातबंदीच्या निर्णयांबाबत प्रश्न विचारावेत, असे राष्ट्रवादी काँग्रेसने म्हटले आहे. कांद्याचे दर कोसळून शेतकरी अडचणीत सापडला असताना सरकारची भूमिका काय होती, असा सवालही पक्षाने उपस्थित केला आहे.

शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सातत्याने संघर्ष करणाऱ्या नेतृत्वावर टीका करणे सोपे असले तरी कृषी क्षेत्रासाठी धोरणात्मक निर्णय घेण्यासाठी कणखर नेतृत्व आवश्यक असते, असे पक्षाने म्हटले आहे. शरद पवार यांनी कृषी क्षेत्राच्या विकासासाठी दिलेले योगदान देशातील शेतकरी विसरू शकणार नाहीत, असा दावाही करण्यात आला आहे.

नवनाथ बन यांना खरोखरच कांदा उत्पादक शेतकऱ्यांची चिंता असेल, तर त्यांनी उत्पादन खर्चातील वाढ, निर्यात धोरणातील त्रुटी, साठवणूक व्यवस्थेचा अभाव आणि बाजारभावातील अस्थिरता यांसारख्या प्रश्नांवरही ठोस भूमिका घ्यावी, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसने केले आहे.

शेतकरी हा राजकीय टोलेबाजीचा विषय नसून देशाचा अन्नदाता आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या वेदनांचा वापर स्वस्त राजकारणासाठी करू नये. तथ्यांवर आधारित चर्चा करण्याची तयारी असल्यास राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष चर्चेसाठी सदैव तयार असल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात कारने एकमेकांना धडक देत केला गोळीबार; एकाचा मृत्यू….

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…

4 तास ago

हिंदकेसरी महेंद्र गायकवाड यांचा भव्य नागरी सत्कार; जयकुमार गोरे यांची उपस्थिती

मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…

9 तास ago

आदरणीय अजितदादांच्या पश्चात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभासारखा

पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक मुंबई: स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक…

9 तास ago

अहिल्यादेवींच्या विचारांवर राज्यकारभार! चौंडीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; एकनाथ शिंदे

अहिल्यानगर: लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आयोजित भव्य जयंती सोहळ्यात…

10 तास ago

भेसळ, विषारी दारू आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर आमदार सत्यजीत तांबे यांची घणाघाती टीका

जळगाव: अन्नपदार्थांतील भेसळ, विषारी दारूच्या घटना, शिक्षण विभागातील भ्रष्टाचार, मराठी माध्यमाच्या शाळांसमोरील आव्हाने आणि अनुदानित…

11 तास ago

ज्येष्ठ गायक-अभिनेते पं. चंद्रकांत लिमये यांचे निधन

मुंबई: ज्येष्ठ शास्त्रीय गायक, नाट्यसंगीताचे अभ्यासक आणि अभिनेते पं. चंद्रकांत लिमये यांचे शनिवारी गुवाहाटी येथे…

11 तास ago