महाराष्ट्र

पॉलीटेक्निक प्रवेश अर्जाची अंतिम मुदत 2 जुलैपर्यंत वाढवली; विद्यार्थ्यांना मोठा दिलासा

मुंबई: प्रथम वर्ष पदविका अभियांत्रिकी (पॉलीटेक्निक) अभ्यासक्रमांच्या केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेसाठी अर्ज सादर करण्याची मुदत २ जुलै २०२६ पर्यंत वाढविण्यात आली आहे. यापूर्वी अर्ज भरण्याची अंतिम तारीख २२ जून होती. विद्यार्थ्यांचा वाढता प्रतिसाद तसेच विविध प्रमाणपत्रे मिळण्यात होणारा विलंब लक्षात घेऊन हा निर्णय घेण्यात आला असल्याची माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली.

मंत्री पाटील यांनी सांगितले की, अंतिम मुदतीपर्यंत १ लाख ४५ हजार ७०८ उमेदवारांनी नोंदणी केली असून त्यापैकी १ लाख १५ हजार ५३ विद्यार्थ्यांनी शुल्क भरून मान्यतेसाठी अर्ज सादर केले आहेत. अधिकाधिक विद्यार्थ्यांना प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता यावे आणि आवश्यक कागदपत्रे व प्रमाणपत्रे मिळविण्यासाठी पुरेसा वेळ मिळावा यासाठी मुदतवाढ देण्यात आली आहे.

सुधारित वेळापत्रकानुसार इच्छुक विद्यार्थ्यांना आता २ जुलै २०२६ पर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करता येणार आहेत. प्रवेश प्रक्रियेचे सविस्तर वेळापत्रक, अर्ज सादरीकरणाची माहिती आणि ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी विद्यार्थ्यांनी DTE महाराष्ट्र पोर्टल⁠� ला भेट द्यावी, असे आवाहन मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी केले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वावर खासदारांचा विश्वास

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात मोठी घडामोड घडल्याचा दावा शिवसेना (शिंदे गट) समर्थकांकडून करण्यात येत आहे. उबाठा…

56 मिनिटे ago

शिंदेंची ताकद वाढली, ठाकरेंपुढे नवे राजकीय आव्हान

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेतील फूट आणि त्यानंतरचे बदलते राजकीय समीकरण पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरले…

1 तास ago

शिरूर! आमदाबादच्या युवकाने 27व्या वाढदिवसानिमित्त केली 27 वृक्षांची लागवड…

शिरूर (नितीन थोरात) : वाढदिवस साजरा करण्याच्या पारंपरिक पद्धतींपेक्षा समाजोपयोगी आणि पर्यावरण संवर्धनाला चालना देणारा…

1 तास ago

निकृष्ट कोळसा पुरवठ्यामुळे वीज निर्मितीवर परिणाम; दोषींना ब्लॅकलिस्ट करण्याची वडेट्टीवारांची मागणी

मुंबई: राज्यातील वाढती वीज मागणी आणि वीज निर्मिती केंद्रांतील संच बंद पडण्यामागे निकृष्ट दर्जाच्या कोळसा पुरवठ्याचे…

1 तास ago

शिरूर तालुक्यातील आरोपींचा दीड किलोमीटर पाठलाग करत पोलिसांनी ठोकल्या बेड्या…

मंचर (कैलास गायकवाड) : शिरूर तालुक्याच्या सीमा परिसरात दुचाकीवरून येऊन दागिने हिसकावून पळून जाणाऱ्या तीन…

1 तास ago

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक : महायुतीचा दणदणीत विजय, 17 पैकी 16 जागांवर कब्जा

मुंबई: महाराष्ट्र विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघ निवडणुकीत महायुतीने मोठे यश संपादन करत 17…

6 तास ago