महाराष्ट्र

सांगली जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेचा पेच; जयंत पाटील मैदानात, रोहित पाटील यांचा ठाम शब्द

सातारा: साताऱ्यानंतर आता सांगली जिल्हा परिषद (Sangli Zilla Parishad) मध्येही सत्तास्थापनेचा पेच कायम असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. माजी मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्यादृष्टीने सांगलीत पक्षाचे नेते, आमदार आणि जिल्हा परिषद सदस्यांची बैठक पार पडली.

या बैठकीत आमदार रोहित पाटील (Rohit Patil) यांनी ठाम भूमिका घेत जयंत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. “साहेब, तुम्ही करेक्ट कार्यक्रमासाठी प्रसिद्ध आहात. सांगलीतही तो करून दाखवाल. तुमच्या शब्दाच्या पुढे आमच्या मतदारसंघातील एकही जिल्हा परिषद सदस्य जाणार नाही,” असा शब्द रोहित पाटील यांनी दिला. झेडपीतील सत्तास्थापनेत जयंतरावांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.

जागावाटपाचे गणित काय?

सांगली जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)ने सर्वाधिक १८ जागा जिंकल्या आहेत. महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या ११ आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा १ सदस्य अशा एकूण ३० जागा महाविकास आघाडीच्या खात्यात आहेत.

दुसरीकडे, भाजपने १६ जागा जिंकल्या असून महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ६, शिंदेसेनेच्या ७ तसेच रयत क्रांती संघटना आणि जनसुराज्य पक्षाच्या प्रत्येकी १ जागा अशा एकूण ३१ जागा महायुतीकडे आहेत.कोणत्याही एका पक्षाकडे स्पष्ट बहुमत नसल्याने सत्तास्थापनेचा पेच कायम आहे. विशेष म्हणजे भाजपने ही निवडणूक स्वबळावर लढवली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेसेना यांची पुढील भूमिका निर्णायक ठरणार आहे.

“सरकार स्थापन करू, ज्योतिषाची गरज नाही”

बैठकीत रोहित पाटील यांनी जयंत पाटील यांना पुढाकार घेण्याचे आवाहन करताना म्हटले, “तुमच्या नेतृत्वावर मला पूर्ण विश्वास आहे. सांगली जिल्हा परिषदेत आपण सरकार स्थापन करू, हे सांगायला कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही. गणित घालण्यात आणि करेक्ट कार्यक्रम करण्यात तुम्ही पारंगत आहात.”दरम्यान, सांगली जिल्हा परिषदेत कोणाची सत्ता स्थापन होणार याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पुढील काही दिवसांत होणाऱ्या राजकीय घडामोडींवरच सत्तेचे चित्र स्पष्ट होणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शाळा-महाविद्यालयांच्या दारातच नशेचा बाजार; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात

राजगुरूनगर: राजगुरुनगर शहरातील शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात गुटखा, मावा, सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम…

3 तास ago

दरडग्रस्त भागांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

मुंबई: मुंबई उपनगरातील घाटकोपर, विक्रोळी आणि भांडुप परिसरातील डोंगराळ भागांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात घडणाऱ्या दरड कोसळण्याच्या घटनांमुळे…

5 तास ago

डिजिटल परिवर्तनामुळे तंत्रशिक्षण प्रशासन अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम; ई-गव्हर्नन्स पुस्तिकेचे प्रकाशन

मुंबई: राज्यातील तंत्रशिक्षण क्षेत्रात प्रशासन अधिक पारदर्शक, कार्यक्षम, उत्तरदायी आणि डेटा-आधारित करण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात…

5 तास ago

शिरुर तालुक्यात सामाईक इलेक्ट्रिक मोटारच्या वादातून सख्ख्या भावाकडून मारहाण

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील गुनाट गावात सामाईक वापरातील इलेक्ट्रिक मोटारच्या वादातून सख्ख्या…

8 तास ago

शिरुर तालुक्यातील भीषण अपघातात पत्नीच्या मृत्यू प्रकरणी; पतीवर गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील न्हावरे-निर्वी अष्टविनायक महामार्गावर झालेल्या भीषण कार अपघातात एका महिलेचा मृत्यू…

9 तास ago

भाजलेल्या हरभऱ्याचे फायदे

चणे हा प्रथिनांचा समृद्ध स्रोत आहे. रोज भाजलेले हरभऱ्याचे सेवन केल्यास शरीराला अनेक आरोग्य समस्यांपासून…

12 तास ago