सातारा: साताऱ्यानंतर आता सांगली जिल्हा परिषद (Sangli Zilla Parishad) मध्येही सत्तास्थापनेचा पेच कायम असून राजकीय हालचालींना वेग आला आहे. माजी मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. त्यादृष्टीने सांगलीत पक्षाचे नेते, आमदार आणि जिल्हा परिषद सदस्यांची बैठक पार पडली.
या बैठकीत आमदार रोहित पाटील (Rohit Patil) यांनी ठाम भूमिका घेत जयंत पाटील यांच्या नेतृत्वावर विश्वास व्यक्त केला. “साहेब, तुम्ही करेक्ट कार्यक्रमासाठी प्रसिद्ध आहात. सांगलीतही तो करून दाखवाल. तुमच्या शब्दाच्या पुढे आमच्या मतदारसंघातील एकही जिल्हा परिषद सदस्य जाणार नाही,” असा शब्द रोहित पाटील यांनी दिला. झेडपीतील सत्तास्थापनेत जयंतरावांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याची ग्वाहीही त्यांनी दिली.
जागावाटपाचे गणित काय?
सांगली जिल्हा परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट)ने सर्वाधिक १८ जागा जिंकल्या आहेत. महाविकास आघाडीतील काँग्रेसच्या ११ आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचा १ सदस्य अशा एकूण ३० जागा महाविकास आघाडीच्या खात्यात आहेत.
दुसरीकडे, भाजपने १६ जागा जिंकल्या असून महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसच्या ६, शिंदेसेनेच्या ७ तसेच रयत क्रांती संघटना आणि जनसुराज्य पक्षाच्या प्रत्येकी १ जागा अशा एकूण ३१ जागा महायुतीकडे आहेत.कोणत्याही एका पक्षाकडे स्पष्ट बहुमत नसल्याने सत्तास्थापनेचा पेच कायम आहे. विशेष म्हणजे भाजपने ही निवडणूक स्वबळावर लढवली होती. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिंदेसेना यांची पुढील भूमिका निर्णायक ठरणार आहे.
“सरकार स्थापन करू, ज्योतिषाची गरज नाही”
बैठकीत रोहित पाटील यांनी जयंत पाटील यांना पुढाकार घेण्याचे आवाहन करताना म्हटले, “तुमच्या नेतृत्वावर मला पूर्ण विश्वास आहे. सांगली जिल्हा परिषदेत आपण सरकार स्थापन करू, हे सांगायला कोणत्याही ज्योतिषाची गरज नाही. गणित घालण्यात आणि करेक्ट कार्यक्रम करण्यात तुम्ही पारंगत आहात.”दरम्यान, सांगली जिल्हा परिषदेत कोणाची सत्ता स्थापन होणार याकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. पुढील काही दिवसांत होणाऱ्या राजकीय घडामोडींवरच सत्तेचे चित्र स्पष्ट होणार आहे.
शिक्रापूर : विद्यार्थ्यांनी केवळ उत्साही राहून चालणार नाही, तर ध्येयप्राप्तीसाठी वेडे होऊन सर्वस्व समर्पित करण्याची…
शिरुर (तेजस फडके): शिरुर ग्रामीण ग्रामपंचायतीच्या भोंगळ आणि निष्क्रिय कारभाराचा फटका बाबुरावनगर परिसरातील हजारो नागरिकांना…
पाबळ (सुनिल जिते): शिक्षणासाठी आर्थिक अडचणींशी झुंज देणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहत कान्हूर मेसाई…
कर्जमाफी, ओबीसी आरक्षण आणि गोसीखुर्द कालवा दुर्घटनेवर सरकारला धारेवर धरले; ३ ऑगस्टपासून 'मंडल यात्रा'ची घोषणा.…
मुंबई: भायखळा येथील नूतनीकृत लोकशाहीर अण्णा भाऊ साठे नाट्यगृहाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकार्पण…
मुंबई: लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या नावाने नूतनीकरण व विस्तारीकरण करण्यात आलेल्या नाट्यगृहाचे लोकार्पण मुख्यमंत्री…