महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रमात प्रोटोकॉल भंग? सुनेत्रा पवारांना थांबावे लागल्याने राजकीय चर्चा

पुणे: छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात कथित प्रोटोकॉल भंगाचा प्रकार घडल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. माजी जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके यांनी अचानक भाषण सुरू केल्याने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना काही क्षण ताटकळत उभे राहावे लागल्याची घटना समोर आली आहे.

कार्यक्रमात भाषणांचा क्रम सुरू असताना आमदार शरद सोनवणे यांनी आपले मनोगत संपवून थेट उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना भाषणासाठी आमंत्रित केले. याच वेळी सोनवणे यांच्या हातातील माईक घेत आशाताई बुचके यांनी “मला घोषणा द्यायची आहे,” असे सांगत थेट भाषणालाच सुरुवात केली. सुमारे दीड ते दोन मिनिटे त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या व्यासपीठावर भाषणासाठी सज्ज होत्या; मात्र अचानक सुरू झालेल्या या भाषणामुळे त्या काही क्षण मागे उभ्या राहिल्या. त्यामुळे उपस्थितांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले.

या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर नाराजीचे भाव दिसून आल्याची चर्चा आहे. त्यांनी हातवारे करून भाषण थांबवण्याची सूचना केल्याचेही काही उपस्थितांनी सांगितले. अखेर आशाताई बुचके यांनी आपले भाषण आटोपते घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अधिकृत मनोगत व्यक्त केले.

दरम्यान, या घटनेमुळे कार्यक्रमात प्रोटोकॉलचा भंग झाल्याची चर्चा रंगली असून राजकीय व सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी यावर टीका केली आहे, तर काहींनी हा प्रकार गैरसमज असल्याचे म्हटले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

विद्यार्थ्यांच्या आंदोलनात भाजपाला अजेंडाच दिसतो; अण्णा आंदोलनातून भाजपानेच राजकारण केले; हर्षवर्धन सपकाळ

नीट पेपरफुटी, विद्यार्थ्यांवरील लाठीहल्ला आणि मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्यावर काँग्रेसचा जोरदार पलटवार मुंबई: नीट प्रश्नपत्रिका फुटीच्या प्रकरणावरून…

2 तास ago

विनाअनुदानित महाविद्यालयांच्या प्रश्नांवर सकारात्मक निर्णयाचे संकेत; मंत्री चंद्रकांत पाटील यांची ग्वाही

ग्रामीण, आदिवासी व दुर्गम भागातील महाविद्यालयांना आर्थिक पाठबळ, शुल्कवाढ, मान्यता व कर्मचारी धोरणासह विविध मागण्यांवर…

2 तास ago

शिरुर पोलिसांचा नवीन पॅटर्न; ‘कायद्यात राहाल तर फायद्यात राहाल’ करडे गोळीबार प्रकरणातील आरोपींची काढली धिंड

शिरुर (तेजस फडके): शिरुर पोलिस ठाण्याच्या हद्दीत वाढत्या गुन्हेगारीमुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेवर सातत्याने प्रश्नचिन्ह उपस्थित होत…

2 तास ago

‘कमळी’मध्ये मोठा ट्विस्ट! जिवंत परतली आई, पण स्मृती हरवली; हृषीने घेतला मोठा निर्णय

मुंबई: लोकप्रिय मालिका 'कमळी' मध्ये प्रेक्षकांना लवकरच भावनिक आणि नाट्यमय वळण पाहायला मिळणार आहे. कमळीची…

11 तास ago

आरक्षणावर नव्याने चर्चेची गरज; सामाजिक न्यायासह समान संधींचा समतोल साधण्याची मागणी

आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती, शिक्षणातील जागा वाढविणे आणि आरक्षण धोरणाचे वस्तुनिष्ठ पुनरावलोकन करण्यावर भर मुंबई:…

11 तास ago

मलठण–शिक्रापूर रस्ता मृत्यूचा सापळा; रखडलेल्या कामामुळे पावसात नागरिकांचे हाल

खड्डे, चिखल आणि वाहतूक कोंडीने वाहनचालक त्रस्त; काम तातडीने पूर्ण करण्याची नागरिकांची मागणी पाबळ (सुनिल…

11 तास ago