महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराज जयंती कार्यक्रमात प्रोटोकॉल भंग? सुनेत्रा पवारांना थांबावे लागल्याने राजकीय चर्चा

पुणे: छत्रपती शिवाजी महाराज जयंती महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात कथित प्रोटोकॉल भंगाचा प्रकार घडल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे. माजी जिल्हा परिषद सदस्या आशाताई बुचके यांनी अचानक भाषण सुरू केल्याने उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना काही क्षण ताटकळत उभे राहावे लागल्याची घटना समोर आली आहे.

कार्यक्रमात भाषणांचा क्रम सुरू असताना आमदार शरद सोनवणे यांनी आपले मनोगत संपवून थेट उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांना भाषणासाठी आमंत्रित केले. याच वेळी सोनवणे यांच्या हातातील माईक घेत आशाताई बुचके यांनी “मला घोषणा द्यायची आहे,” असे सांगत थेट भाषणालाच सुरुवात केली. सुमारे दीड ते दोन मिनिटे त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.

दरम्यान, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या व्यासपीठावर भाषणासाठी सज्ज होत्या; मात्र अचानक सुरू झालेल्या या भाषणामुळे त्या काही क्षण मागे उभ्या राहिल्या. त्यामुळे उपस्थितांमध्ये संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले.

या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या चेहऱ्यावर नाराजीचे भाव दिसून आल्याची चर्चा आहे. त्यांनी हातवारे करून भाषण थांबवण्याची सूचना केल्याचेही काही उपस्थितांनी सांगितले. अखेर आशाताई बुचके यांनी आपले भाषण आटोपते घेतल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी अधिकृत मनोगत व्यक्त केले.

दरम्यान, या घटनेमुळे कार्यक्रमात प्रोटोकॉलचा भंग झाल्याची चर्चा रंगली असून राजकीय व सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. काहींनी यावर टीका केली आहे, तर काहींनी हा प्रकार गैरसमज असल्याचे म्हटले आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

संघर्ष, सातत्य अन् पक्षनिष्ठेचा आदर्श; ॲड. अमोल मातेले यांचा विद्यार्थी चळवळीपासून प्रदेश सरचिटणीसपदापर्यंतचा प्रवास

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेस–शरदचंद्र पवार पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस ॲड. अमोल मातेले यांचा राजकीय प्रवास हा…

16 तास ago

सतत हातापायाला सुज येते का टाचा दुखतात, मग दुर्लक्ष करू नका असू शकतात हे गंभीर आजार

एखादा लांबचा प्रवास करून आल्यावर आपल्या हाता पायांना सुज येते. अति चालल्यावर पायांना सुज येते.…

20 तास ago

पावसाळ्यात खोबरे खावे की, टाळावे? शिवाय कुणी व किती खावे

पावसाळ्यात पोषक खोबरे चवीला गोड असणारे खोबरे पचनानंतरसुद्धा शरीरावर गोड परिणाम करते आणि शरीराला पावसाळ्यात…

20 तास ago

रेल्वेच्या जागेवरील रहिवाशांच्या पुनर्वसनाचा प्रश्न सोडवा; एकनाथ शिंदेंची अश्विनी वैष्णवांकडे मागणी

मुंबई: रेल्वेच्या जागेवर अनेक वर्षांपासून वास्तव्यास असलेल्या हजारो नागरिकांच्या पुनर्वसनाचा प्रश्न रेल्वे आणि राज्य सरकारने…

20 तास ago

DBATUतील प्राध्यापकांची रिक्त पदे तीन महिन्यांत भरणार; चंद्रकांत पाटलांची ग्वाही

निकाल वेळेत लागण्यासाठी शासनाची कार्यवाही; विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळणार रायगड : डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ,…

20 तास ago

विशेष मुलांच्या विकासासाठी ‘दिशा’ अभियान; विशेष शिक्षकांचा राज्यस्तरीय सन्मान

‘दिशा’ अभियान राबविणारे महाराष्ट्र देशातील पहिले राज्य; २१ हजारांहून अधिक विद्यार्थी जोडले मुंबई: समाजात जन्माला…

20 तास ago