मुंबई: अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर राज्यात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. या दुर्घटनेबाबत आमदार रोहित पवार यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करत घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, ब्लॅक बॉक्स संदर्भात प्रश्न निर्माण होऊ शकतात, असा इशाराही त्यांनी यापूर्वी दिला होता.
दरम्यान, तपास यंत्रणांनी आगीत ब्लॅक बॉक्सला बाधा झाल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते, अत्यंत तीव्र आगीतही ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहण्यासाठी तयार केलेला असतो. त्यामुळेच या प्रकरणातील संशय दिवसेंदिवस अधिक गडद होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.
या पार्श्वभूमीवर अभिनेते रितेश देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. रायगडावरील शिवजन्मोत्सव कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी या प्रकरणावर भाष्य केले. रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत विचारले असता, रितेश देशमुख म्हणाले, “एखादा मोठा नेता आपल्याला सोडून जातो ती जागा कधीच भरून निघू शकत नाही. अजितदादा हे लोकनेते होते. त्यांनी जनतेसाठी आयुष्यभर संघर्ष केला. ते एवढ्या लवकर आपल्याला सोडून जातील, असे कधी वाटले नव्हते.”
पुढे ते म्हणाले, “जिथे शंका आहे, तिथे उत्तरं मिळालीच पाहिजेत. कुठलाही प्रश्न अनुत्तरित राहू नये. प्रत्येक प्रश्नाचं समाधानकारक उत्तर मिळालं तर लोकांच्या मनातील संभ्रम दूर होईल. अन्यथा तोच संशय कायम राहील. कारण दादा हे अत्यंत मोठे आणि लोकप्रिय नेते होते.”दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू असून अंतिम अहवालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. तपासातून नेमकी वस्तुस्थिती समोर येईल का, याबाबत उत्सुकता कायम आहे.
शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यात ड्रग्स माफियांनी आता थेट डिजिटल तंत्रज्ञानाचा आधार घेतला असुन त्यामुळे…
शिरूर (तेजस फडके): शिरूर शहरात प्रसूतीच्या कळांनी विव्हळणाऱ्या एका मातेला रुग्णालयापर्यंत पोहोचणेही कठीण झाले असताना,…
मुंबई: महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ मधील मतदान प्रक्रियेवर उपस्थित होत असलेल्या शंका आणि संशयाच्या पार्श्वभूमीवर,…
मुंबई: राज्यातील कायदा-सुव्यवस्था मजबूत असेल तरच विकासाला खरी गती मिळते, असा ठाम संदेश देत उपमुख्यमंत्री…
मुंबई: विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींच्या नावांची पद्म पुरस्कार 2027 साठी शिफारस करण्यासाठी राज्य…
मुंबई: सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेत महिलांच्या सुरक्षेला अधिक प्राधान्य देत बस सुविधांमध्ये आवश्यक सुधारणा करण्यासाठी लवकरच…