महाराष्ट्र

अजित पवारांच्या विमान अपघातावर रितेश देशमुखांची प्रतिक्रिया म्हणाले…

मुंबई: अजित पवार यांच्या विमान अपघातानंतर राज्यात संशयाचे वातावरण निर्माण झाले आहे. या दुर्घटनेबाबत आमदार रोहित पवार यांनी अनेक गंभीर प्रश्न उपस्थित करत घातपाताची शक्यता व्यक्त केली आहे. विशेष म्हणजे, ब्लॅक बॉक्स संदर्भात प्रश्न निर्माण होऊ शकतात, असा इशाराही त्यांनी यापूर्वी दिला होता.

दरम्यान, तपास यंत्रणांनी आगीत ब्लॅक बॉक्सला बाधा झाल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र तज्ज्ञांच्या मते, अत्यंत तीव्र आगीतही ब्लॅक बॉक्स सुरक्षित राहण्यासाठी तयार केलेला असतो. त्यामुळेच या प्रकरणातील संशय दिवसेंदिवस अधिक गडद होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.

या पार्श्वभूमीवर अभिनेते रितेश देशमुख यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. रायगडावरील शिवजन्मोत्सव कार्यक्रमानंतर माध्यमांशी संवाद साधताना त्यांनी या प्रकरणावर भाष्य केले. रोहित पवार यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांबाबत विचारले असता, रितेश देशमुख म्हणाले, “एखादा मोठा नेता आपल्याला सोडून जातो ती जागा कधीच भरून निघू शकत नाही. अजितदादा हे लोकनेते होते. त्यांनी जनतेसाठी आयुष्यभर संघर्ष केला. ते एवढ्या लवकर आपल्याला सोडून जातील, असे कधी वाटले नव्हते.”

पुढे ते म्हणाले, “जिथे शंका आहे, तिथे उत्तरं मिळालीच पाहिजेत. कुठलाही प्रश्न अनुत्तरित राहू नये. प्रत्येक प्रश्नाचं समाधानकारक उत्तर मिळालं तर लोकांच्या मनातील संभ्रम दूर होईल. अन्यथा तोच संशय कायम राहील. कारण दादा हे अत्यंत मोठे आणि लोकप्रिय नेते होते.”दरम्यान, या प्रकरणाचा तपास सुरू असून अंतिम अहवालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. तपासातून नेमकी वस्तुस्थिती समोर येईल का, याबाबत उत्सुकता कायम आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

जंतर-मंतरवरील आंदोलनानंतर परीक्षा व्यवस्थेतील पारदर्शकता

नवी दिल्ली : NEET पेपरफुटी प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांनी केलेल्या आंदोलनाची देशभर चर्चा रंगली…

58 मिनिटे ago

शिवसेना जनतेच्या दारी’ अभियानाचा राज्यभर विस्तार; शिंदेंकडून विकास, जनसेवा आणि युवा सक्षमीकरणाचा मंत्र

नेस्कोतील कार्यक्रमात २० हजार नागरिकांना शासकीय लाभांचे वितरण; दापोलीतील मीनाताई ठाकरे नाट्यगृहासाठी १५ कोटींची घोषणा…

1 तास ago

भांबर्डेतील मंदिर परिसर आणि जुना दहिवडी रस्ता चिखलमय; तातडीने मुरुम टाकण्याची ग्रामस्थांची मागणी

रांजणगाव गणपती (अक्षय टेमगिरे): भांबर्डे (ता. शिरुर) गावातील मंदिर परिसरातील तळ्याच्या भरावावर तसेच जुन्या दहिवडी…

4 तास ago

‘कमळी’ मालिकेत आषाढी विशेष भाग; महाजन कुटुंबातील मोठं सत्य उघड होणार?

मुंबई: झी मराठीवरील लोकप्रिय 'कमळी' मालिकेत आषाढी एकादशीच्या निमित्ताने विशेष भाग प्रेक्षकांच्या भेटीला येत असून,…

7 तास ago

मक्याचे कणीस खाणे आरोग्यासाठी फायदेशीर

मक्याचे कणीस खाणे आरोग्यासाठी फायदेशीर आहे. मक्यात पोषकतत्वांचा खजिना असल्याने याचे अनेक फायदे शरीरास होतात.…

7 तास ago

वाल्मीक कराड तुरुंगात; परळीच्या राखेतून महाजनकोला वर्षभरात ₹35 कोटींचे उत्पन्न

निविदा प्रक्रियेमुळे अवैध राख माफियांना लगाम; तीन वर्षांतील सर्वाधिक महसूल महाराष्ट्र राज्य वीज मंडळाच्या तिजोरीत…

7 तास ago