पुणे: सार्वजनिक बांधकाम विभागाने शिरुर-खेड-कर्जत असा नवीन मार्ग प्रस्तावित केला असल्यामुळे मराठवाडा तसेच शिरुरमधून येणाऱ्या वाहतुकीला मुंबईला जाण्यासाठी नवीन मार्ग मिळणार आहे. यामुळे नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होणार आहे.
पुण्यात येणारी वाहतूक शिरुर-खेडमार्गे थेट कर्जतला जाणार आहे. यामुळे वेळेची बचत तसेच पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. मराठवाडामधून येणाऱ्या वाहनांना सध्या मुंबईला जाण्यासाठी चाकण-शिक्रापूर-तळेगाव या मार्गे मुंबईला जाता येते. चाकण आणि शिरुर येथील एमआयडीसीमुळे नगर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी असते. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना जाण्यासाठी सध्या एकच मार्ग आहे. नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेतला आहे.
शिरुर ते कर्जत असा सुमारे 135 किलोमीटर लांबीचा मार्ग करण्यात येणार आहे. मल्टिनोडल कॉरिडॉर म्हणून हा मार्ग ओळखला जाणार असून, हा मार्ग चार पदरी असणार आहे. याबाबतचा प्रस्ताव मान्यतेसाठी शासनाकडे सादर करण्यात आला आहे.
मुंबई: राज्यभरात शिवसेनेच्या विस्ताराला वेग मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून यवतमाळ जिल्ह्यात…
शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रगतशील शेतकरी माऊली जगन्नाथ शेळेके (वय ६४) यांचे…
माजी मंत्री अनंतराव थोपटे यांना उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांच्याकडून श्रद्धांजली मुंबई: ज्येष्ठ नेते अनंतराव…
श्रद्धा, पर्यावरण आणि आरोग्याशी चाललेला खेळ थांबणार कधी? जेजुरी: "येळकोट येळकोट जय मल्हार!" या घोषणेने…
मुंबई: पुण्यात मागील आठवड्यात विषारी दारू सेवनामुळे २२ जणांचा मृत्यू झाल्यानंतर सरकारने २६ अधिकारी आणि…
नागपूर: विधान परिषद निवडणुकीत पैशांचा खुलेआम वापर झाल्याचा गंभीर आरोप काँग्रेस विधिमंडळ पक्षाचे नेते Vijay Wadettiwar…