महाराष्ट्र

पुणे-नगर रस्त्यावरील कोंडी सुटणार; मिळणार नवीन मार्ग…

पुणे: सार्वजनिक बांधकाम विभागाने शिरुर-खेड-कर्जत असा नवीन मार्ग प्रस्तावित केला असल्यामुळे मराठवाडा तसेच शिरुरमधून येणाऱ्या वाहतुकीला मुंबईला जाण्यासाठी नवीन मार्ग मिळणार आहे. यामुळे नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडीतून नागरिकांची सुटका होणार आहे.

पुण्यात येणारी वाहतूक शिरुर-खेडमार्गे थेट कर्जतला जाणार आहे. यामुळे वेळेची बचत तसेच पुणे-मुंबई महामार्गावरील वाहतुकीचा ताण कमी होणार आहे. मराठवाडामधून येणाऱ्या वाहनांना सध्या मुंबईला जाण्यासाठी चाकण-शिक्रापूर-तळेगाव या मार्गे मुंबईला जाता येते. चाकण आणि शिरुर येथील एमआयडीसीमुळे नगर रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहनांची गर्दी असते. मालवाहतूक करणाऱ्या वाहनांना जाण्यासाठी सध्या एकच मार्ग आहे. नगर रस्त्यावरील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने पुढाकार घेतला आहे.

शिरुर ते कर्जत असा सुमारे 135 किलोमीटर लांबीचा मार्ग करण्यात येणार आहे. मल्टिनोडल कॉरिडॉर म्हणून हा मार्ग ओळखला जाणार असून, हा मार्ग चार पदरी असणार आहे. याबाबतचा प्रस्ताव मान्यतेसाठी शासनाकडे सादर करण्यात आला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

सणसवाडीत ८०० लिटर डिझेल चोरीचा पर्दाफाश; बॅरलमध्ये पाणी भरून कंपनीची दिशाभूल, दोन सराईत चोरटे अटकेत

शिक्रापूर: शिरूर तालुक्यातील सणसवाडी येथील झेनिथ बायोकेमिकल इंडस्ट्रीज प्रा. लि. कंपनीतून तब्बल ८०० लिटर डिझेल…

3 तास ago

महाराष्ट्राला ‘समग्र शिक्षा’त अधिक निधी द्या; केंद्रीय परिषदेत दादाजी भुसे यांची जोरदार मागणी

मुंबई: देशातील एकूण विद्यार्थी संख्येपैकी ८.६१ टक्के विद्यार्थी महाराष्ट्रात शिक्षण घेत असतानाही ‘समग्र शिक्षा’ योजनेच्या…

3 तास ago

विद्यार्थ्यांवर लाठीमार म्हणजे लोकशाहीवरील काळा डाग; हे विद्यार्थ्यांच्या जिवावर उठलेलं निष्ठूर सरकार; विजय वडेट्टीवार

सिंदेवाही: दिल्लीतील जंतर-मंतर येथे विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर झालेल्या लाठीचार्जच्या निषेधार्थ सिंदेवाही येथे काँग्रेसच्या वतीने तीव्र निषेध…

3 तास ago

नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे असूनही काही लोकांसाठी ठरतं घातक

हेल्दी ड्रिंक्सचा विषय निघतो तेव्हा नारळ पाण्याचं नाव सगळ्यात वर येतं. नारळ पाणी हे शरीरासाठी…

20 तास ago

आंबट ढेकर, पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय

कधीकधी अपचनामुळे पोट जड होऊन वेदनाही होतात. अस्वस्थता, जळजळ आणि मळमळ असा त्रासही होतो. तर…

20 तास ago

आजारी पडण्यापुर्वी पुढील गोष्टी फक्त आयुर्वेदच करु शकतो

1) कॅन्सर होण्याची भीती वाटते.-नियमित कडीपत्त्याचा रस प्या. 2) हार्ट अँटॅकची भीती वाटते - नियमित…

20 तास ago