क्राईम

शिरूर तालुक्यात विद्युत मोटारी, केबल चोरीचे सत्र सुरूच…

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील इनामगाव, आण्णापूर, टाकळी हाजीसह बेट भागातील शेतकऱ्यांचे विद्युत कृषी पंप, केबल तसेच कृषी साहित्य चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस मोठया प्रमाणात वाढ झाली असून यामुळे शेतकरी वर्गाची चिंता वाढली आहे.

शेतकऱ्यांचे अवकाळी पाऊस, कमी बाजार भाव त्यात विद्युत मोटारी, केबलची चोरी यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. शेतकरी हतबल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मागील पंधरा दिवसांत जवळपास दिवसाआड ठिकाण बदलून या चोऱ्या सातत्याने होत आहेत.

पोलीस अधीक्षकांनी २७ एप्रिल पासून मागील गुन्ह्यातील दोन मोटार चोरांना तडीपार करत अशा चोऱ्या रोखण्यासाठी गुन्हेगारांना तडीपारीचा इशारा दिला असला तरी शुक्रवारी (ता. २८) पुन्हा टाकळी हाजी, निमगाव दूडे , आण्णापुर या भागातून केबल आणि मोटार चोरी झाल्याने शेतकरी सुरक्षित नसल्याची भावना नागरिकांमधून उमटत आहे. गेल्या दोन वर्षापासून लाखो रुपयांच्या शेकडो विद्युत मोटारी चोरीला गेल्या असून फक्त १८ मोटारी शोधण्यात शिरूर पोलिसांना यश आले आहे.

दरम्यान, मोटार चोरांचा शोध घेवून तात्काळ त्यांचा बंदोबस्त करा, अन्यथा यापुढे अशा प्रकारच्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले तर शिरूर पोलीस स्टेशन वर मोर्चा काढावा लागेल, असा इशारा शेतकरी संघटनेच्या वतीने पुणे जिल्हा उपाध्यक्ष जयवंत भाकरे व बाबाजी रासकर यांनी दिला आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्टतर्फे २०५ विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके व शालोपयोगी साहित्याचे वाटप

मुंबई : धी यशोदाबाई गोविंद गंगाधर फडके चॅरिटेबल ट्रस्टतर्फे गेल्या पाच वर्षांपासून राबविण्यात येणाऱ्या पाठ्यपुस्तक…

3 तास ago

आठवडे बाजारातील चोऱ्यांवर शिक्रापूर पोलिसांचा वचक; दोन महिला रंगेहात जेरबंद

तळेगाव ढमढेरे : शिरूर तालुक्यातील शिक्रापूर, कोरेगाव भीमा व तळेगाव ढमढेरे येथील आठवडे बाजारांमध्ये वाढत्या…

3 तास ago

शिरूरमध्ये तरुणाला अडवून पाच जणांकडून बेदम मारहाण; कामावरून काढल्याच्या रागातून हल्ला

शिरूर (अरुणकुमार मोटे): "तुझ्या चुकीच्या सांगण्यामुळे मला कंपनीतून कामावरून काढण्यात आले," असा जाब विचारत एका…

3 तास ago

ऑपरेशन टायगर की ‘ऑपरेशन बकरा’?

मुंबई: महाराष्ट्रातील सध्याच्या राजकीय घडामोडींवर भाष्य करणारी "ऑपरेशन टायगर की ‘ऑपरेशन बकरा’?" या शीर्षकाची एक व्यंगात्मक…

6 तास ago

सहा खासदारांची बंडखोरी म्हणजे जनतेशी व महाविकास आघाडीशी विश्वासघात; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई : शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातील सहा खासदारांनी केलेली बंडखोरी ही केवळ उद्धव ठाकरे…

6 तास ago

झोपण्यापूर्वी पाणी अवश्य प्यावे

अनेकदा डॉक्टर भरपूर पाणी पिण्याचा सल्ला देतात. पण रात्री झोपण्यापूर्वी पाणी प्यायल्यास पाण्यापासून मिळणारे फायदे…

6 तास ago