Shirur Police Station
शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील इनामगाव, आण्णापूर, टाकळी हाजीसह बेट भागातील शेतकऱ्यांचे विद्युत कृषी पंप, केबल तसेच कृषी साहित्य चोरीच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस मोठया प्रमाणात वाढ झाली असून यामुळे शेतकरी वर्गाची चिंता वाढली आहे.
शेतकऱ्यांचे अवकाळी पाऊस, कमी बाजार भाव त्यात विद्युत मोटारी, केबलची चोरी यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक कंबरडे मोडले आहे. शेतकरी हतबल झाल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. मागील पंधरा दिवसांत जवळपास दिवसाआड ठिकाण बदलून या चोऱ्या सातत्याने होत आहेत.
पोलीस अधीक्षकांनी २७ एप्रिल पासून मागील गुन्ह्यातील दोन मोटार चोरांना तडीपार करत अशा चोऱ्या रोखण्यासाठी गुन्हेगारांना तडीपारीचा इशारा दिला असला तरी शुक्रवारी (ता. २८) पुन्हा टाकळी हाजी, निमगाव दूडे , आण्णापुर या भागातून केबल आणि मोटार चोरी झाल्याने शेतकरी सुरक्षित नसल्याची भावना नागरिकांमधून उमटत आहे. गेल्या दोन वर्षापासून लाखो रुपयांच्या शेकडो विद्युत मोटारी चोरीला गेल्या असून फक्त १८ मोटारी शोधण्यात शिरूर पोलिसांना यश आले आहे.
दरम्यान, मोटार चोरांचा शोध घेवून तात्काळ त्यांचा बंदोबस्त करा, अन्यथा यापुढे अशा प्रकारच्या चोऱ्यांचे प्रमाण वाढले तर शिरूर पोलीस स्टेशन वर मोर्चा काढावा लागेल, असा इशारा शेतकरी संघटनेच्या वतीने पुणे जिल्हा उपाध्यक्ष जयवंत भाकरे व बाबाजी रासकर यांनी दिला आहे.
रायगड: “महाविकास आघाडी सरकारने महाराष्ट्राच्या विकासाची ‘लिंक’च मिस केली होती; मात्र आम्ही ती केवळ जोडली…
मुंबई: शिव-शाहू-फुले-आंबेडकरांच्या विचारांच्या पुरोगामी महाराष्ट्राला गायपट्टा बनवण्याचा सत्ताधा-यांचा डाव आहे. महाराष्ट्र धर्म नासवण्यासाठी जाती जातीत…
महाराष्ट्र दिनानिमित्त वास्तवाचा आढावा; कामगार हक्क, मराठी सक्ती आणि पत्रकार सुरक्षेवर चर्चा औरंगाबाद: १ मे…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर येथे २७ जुलै २०२० रोजी घडलेल्या पत्नीच्या खून प्रकरणात आरोपी दत्तात्रय…
मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…
मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…