महाराष्ट्र

राहुल गांधींचे आंदोलन बेजबाबदार; पंतप्रधान निवासस्थानी घातपाताचा कट होता का? एकनाथ शिंदेंचा सवाल

नीट पेपरफुटीनंतर केंद्राने कठोर पावले उचलली; विद्यार्थ्यांच्या भवितव्यावर राजकारण केल्याचा विरोधकांवर आरोप

मुंबई: काँग्रेसचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अधिकृत निवासस्थानाबाहेर केलेल्या आंदोलनावरून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी तीव्र टीका केली. आंदोलनास परवानगी नसलेल्या ठिकाणी लोकांना जमण्याचे आवाहन करून राहुल गांधींना नेमके काय साध्य करायचे होते, असा सवाल उपस्थित करत त्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाबत काही घातपाताचा कट होता का किंवा देशात अराजकता निर्माण करण्याचा प्रयत्न होता का, अशी शंका व्यक्त केली.

राहुल गांधी हे विरोधी पक्षनेते असून त्यांच्यावर मोठी घटनात्मक जबाबदारी आहे. अशा पदावरील व्यक्तीने जबाबदारीने वागणे अपेक्षित असताना त्यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानाबाहेर आंदोलन करून चुकीचा पायंडा पाडल्याचा आरोप शिंदे यांनी केला. ज्या ठिकाणी कोणालाही आंदोलन करता येत नाही, त्या ठिकाणी लोकांना बोलावणे अत्यंत बेजबाबदारपणाचे असून विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून राजकारण करण्याचा हा प्रयत्न असल्याची टीकाही त्यांनी केली.

नीट परीक्षेच्या पेपरफुटीची घटना दुर्दैवी असल्याचे मान्य करत शिंदे म्हणाले की, केंद्र सरकारने त्यानंतर तातडीने कठोर पावले उचलली. नीटची फेरपरीक्षा पारदर्शक आणि काटेकोरपणे घेण्यात आली. या परीक्षेला सुमारे २० ते २२ लाख विद्यार्थी बसले, त्यापैकी जवळपास ११ लाख विद्यार्थी पात्र ठरले. त्यानंतर जेईई आणि सीयूईटी (कॉमन युनिव्हर्सिटी एंट्रन्स टेस्ट) या राष्ट्रीय स्तरावरील परीक्षाही सुरळीत पार पडल्या. या तीन प्रमुख परीक्षांमध्ये मिळून ४० ते ५० लाख विद्यार्थी सहभागी झाल्याची माहिती त्यांनी दिली.

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्र सरकारने परीक्षा प्रक्रियेवर स्वतः लक्ष ठेवत संबंधित यंत्रणांना आवश्यक त्या सूचना दिल्या. परीक्षा प्रणाली अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि विश्वासार्ह करण्यासाठी सर्वोच्च स्तरावरून हस्तक्षेप करण्यात आला. विद्यार्थ्यांचे भविष्य सुरक्षित ठेवण्याचे काम सरकारने केले, मात्र विरोधकांनी त्यावरही राजकारण करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपही एकनाथ शिंदे यांनी केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे असूनही काही लोकांसाठी ठरतं घातक

हेल्दी ड्रिंक्सचा विषय निघतो तेव्हा नारळ पाण्याचं नाव सगळ्यात वर येतं. नारळ पाणी हे शरीरासाठी…

41 मिनिटे ago

आंबट ढेकर, पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय

कधीकधी अपचनामुळे पोट जड होऊन वेदनाही होतात. अस्वस्थता, जळजळ आणि मळमळ असा त्रासही होतो. तर…

44 मिनिटे ago

आजारी पडण्यापुर्वी पुढील गोष्टी फक्त आयुर्वेदच करु शकतो

1) कॅन्सर होण्याची भीती वाटते.-नियमित कडीपत्त्याचा रस प्या. 2) हार्ट अँटॅकची भीती वाटते - नियमित…

47 मिनिटे ago

7 तारखेपर्यंत पगार अनिवार्य; नोकरी सोडल्यानंतर 2 दिवसांत Full & Final, नवीन कामगार नियमांची माहिती

मुंबई : कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळावे आणि नोकरी सोडल्यानंतर देय रक्कम मिळण्यासाठी होणारा विलंब टाळावा,…

49 मिनिटे ago

प्रदीप कबरे यांच्या ‘खिडकी’ अभिवाचनाचा विशेष प्रयोग ३० जुलैला दादरच्या शिवाजी मंदिरात

मुंबई: प्रसिद्ध नाटककार प्रदीप कबरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या 'खिडकी' या पुस्तकातील निवडक अनुभवांवर आधारित…

54 मिनिटे ago

अपघातग्रस्त तरुणीला सुनेत्रा पवार यांची तात्काळ मदत; रुग्णालयात दाखल करून उपचाराची केली व्यवस्था

बारामतीत विकासकामांच्या पाहणीदरम्यान थांबवला ताफा; जखमी तरुणीच्या उपचारासाठी अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना बारामती: उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित…

57 मिनिटे ago