महाराष्ट्र

आदरणीय अजित पवारांचा लोकाभिमुख वारसा पुढे नेण्यास सज्ज; उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार

मुंबई: उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार यांनी आदरणीय अजित पवारांचा लोकाभिमुख वारसा पुढे नेण्याचे ठरवले आहे. शेतकरी, महिला, युवक आणि समाजातील वंचित घटकांसाठी आयुष्यभर कार्य केलेल्या दादांच्या विचारांवर टिकून राहून त्यांनी महाराष्ट्राच्या सेवेसाठी स्वतःला सज्ज केले असल्याचे त्यांनी सांगितले.

सुनेत्रा पवार म्हणाल्या, “दादांच्या अकाली निधनाने वैयक्तिक आयुष्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. मात्र त्यांनी दिलेली कर्तव्यनिष्ठा, संघर्षाची ताकद आणि जनतेप्रती प्रामाणिक बांधिलकी हाच माझा खरा आधार आहे.”

त्यांनी पुढे सांगितले की, दादांच्या स्वप्नातील न्यायप्रिय, समताधिष्ठित आणि विकसित महाराष्ट्र घडवण्यासाठी ते प्रामाणिकपणे, पारदर्शकतेने आणि लोकाभिमुखतेने काम करतील. शेतकऱ्यांच्या हितासाठी, युवकांच्या संधींसाठी, महिलांच्या सक्षमीकरणासाठी आणि सर्वसामान्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी शासनाच्या प्रत्येक योजनेची प्रभावी अंमलबजावणी हे त्यांचे सर्वोच्च प्राधान्य असेल.

सुनेत्रा पवार यांनी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत २०४७’ या संकल्पनेला बळ देण्यास तसेच देशाचे गृह व सहकारमंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्राचा सर्वांगीण विकास साधण्यास राज्य सरकार तत्पर राहणार असल्याचे सांगितले.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या साथीने सामाजिक समता, आर्थिक प्रगती आणि सर्वसमावेशक समृद्धी साधण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यांनी पुन्हा एकदा जनतेचे आणि सहकाऱ्यांचे मनापासून आभार मानले आणि पक्षातील विश्वासास पात्र ठरण्यासाठी पूर्ण क्षमतेने कार्य करण्याचे आश्वासन दिले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

महाराष्ट्र हादरला! ३ वर्षांच्या चिमुकलीवरील अत्याचार प्रकरणाने संताप

मुंबई: महाराष्ट्रात अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांमुळे राज्यभर संतापाची लाट उसळली आहे. नुकत्याच समोर आलेल्या…

5 तास ago

बारामती पोटनिवडणूक निकाल! ‘हा शेवट नाही, नव्या बारामतीची सुरुवात’; सुनेत्रा अजित पवार

मुंबई: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीचा निकाल जाहीर होत असताना मतदारांनी दाखवलेला विश्वास हा “आदरणीय अजितदादांच्या पवित्र…

5 तास ago

बीडसह राज्यात अल्पवयीनांवरील अत्याचारांच्या घटनांनी खळबळ; जलद न्याय आणि कडक कारवाईची मागणी तीव्र

पालकांची वाढती चिंता, समाजजागृती आणि यंत्रणांच्या जबाबदारीवर पुन्हा प्रश्नचिन्ह मुंबई: महाराष्ट्रात अल्पवयीन मुलींवरील अत्याचारांच्या सलग…

5 तास ago

नसरापूर प्रकरणात वेगवान न्यायासाठी सरकार कटिबद्ध; कुटुंबाच्या पुनर्वसनाची हमी; डॉ. नीलम गोऱ्हे

पुणे: पुणे जिल्ह्यातील नसरापूर येथील चिमुकलीवरील अत्याचार व हत्येच्या घटनेने राज्यभर संताप व्यक्त होत असताना,…

20 तास ago

विड्याचे पान सेवन करण्याची पद्धत

जर तुम्ही दररोज सकाळी रिकाम्या पोटी विडयाचे पान खाल्ले तर तुम्हाला त्यातून बरेच फायदे मिळतील.…

1 दिवस ago

कढीपत्त्यापासून तयार केलेला चहा आरोग्यासाठी खूप फायदेशीर

बहुतेक लोक विविध पदार्थांमध्ये कढीपत्ता भरपूर वापरतात. कढीपत्ता जेवणाची चव वाढवण्याचे काम करतो. सांबर, डाळ,…

1 दिवस ago