बारामती: राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदावर आज सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली. मात्र या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर पवार गटात दोन गट स्पष्टपणे दिसून आले.
अजित पवार यांच्या गटातील नेते मुंबईत असताना शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार बारामतीत थांबले होते. शपथविधीनंतर सुप्रिया सुळे अजित पवार यांच्या काटेवाडीतील निवासस्थानी गेल्या होत्या आणि मातोश्री आशा पवार यांची तब्येत विचारली. सुळे म्हणाल्या, “उद्या देशाचं आर्थिक बजेट सेशन असल्याने दिल्लीला जाणं गरजेचं आहे. सभागृहाची गटनेते असल्यामुळे परवानगी घेण्यासाठी आलो.”
दरम्यान, शपथविधीच्या वेळी पवार गटातील नेत्यांना विश्वासात का घेतले नाही, असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी हात जोडून ‘रामकृष्ण हरी’ असे म्हणत उत्तर टाळले.
याच दरम्यान, रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पीएसओ विदीप जाधव यांचे मुळगाव तरडगाव येथे नातेवाईकांना सांत्वन दिले. बारामती विमान अपघातात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, ज्यात अजित पवार आणि त्यांचा पीएसओ विदीप जाधव यांचा समावेश होता.
मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपावर जोरदार टीका…
महेश तपासे यांचा सवाल; परराष्ट्र धोरण, राष्ट्रीय सुरक्षा आणि महिला आरक्षणावरही केंद्रावर टीका मुंबई: पाहलगाम…
मुंबई : KEM Hospital (के.ई.एम. रुग्णालय) चे नाव बदलण्याच्या मागणीवरून राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा वाद…
मुंबई: महिला आरक्षण विधेयकाविरोधात भूमिका घेणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे आणि काँग्रेस खासदार…
मुंबई: काँग्रेसच खऱ्या अर्थाने राष्ट्रद्रोही आणि देशद्रोही असल्याचा घणाघात राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी करत…
मुंबई: पीसीएम आणि पीसीबी गटातील विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा दिलासादायक निर्णय घेत दुसऱ्या प्रयत्नासाठी (Second Attempt) नोंदणी…