बारामती: राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदावर आज सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली. मात्र या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर पवार गटात दोन गट स्पष्टपणे दिसून आले.
अजित पवार यांच्या गटातील नेते मुंबईत असताना शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार बारामतीत थांबले होते. शपथविधीनंतर सुप्रिया सुळे अजित पवार यांच्या काटेवाडीतील निवासस्थानी गेल्या होत्या आणि मातोश्री आशा पवार यांची तब्येत विचारली. सुळे म्हणाल्या, “उद्या देशाचं आर्थिक बजेट सेशन असल्याने दिल्लीला जाणं गरजेचं आहे. सभागृहाची गटनेते असल्यामुळे परवानगी घेण्यासाठी आलो.”
दरम्यान, शपथविधीच्या वेळी पवार गटातील नेत्यांना विश्वासात का घेतले नाही, असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी हात जोडून ‘रामकृष्ण हरी’ असे म्हणत उत्तर टाळले.
याच दरम्यान, रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पीएसओ विदीप जाधव यांचे मुळगाव तरडगाव येथे नातेवाईकांना सांत्वन दिले. बारामती विमान अपघातात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, ज्यात अजित पवार आणि त्यांचा पीएसओ विदीप जाधव यांचा समावेश होता.
मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…
लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…
नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…
मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…
तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…
शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…