बारामती: राष्ट्रवादी काँग्रेसचे दिवंगत नेते अजित पवार यांच्या अकाली निधनानंतर रिक्त झालेल्या उपमुख्यमंत्रिपदावर आज सुनेत्रा पवार यांनी शपथ घेतली. मात्र या शपथविधीच्या पार्श्वभूमीवर पवार गटात दोन गट स्पष्टपणे दिसून आले.
अजित पवार यांच्या गटातील नेते मुंबईत असताना शरद पवार, सुप्रिया सुळे आणि रोहित पवार बारामतीत थांबले होते. शपथविधीनंतर सुप्रिया सुळे अजित पवार यांच्या काटेवाडीतील निवासस्थानी गेल्या होत्या आणि मातोश्री आशा पवार यांची तब्येत विचारली. सुळे म्हणाल्या, “उद्या देशाचं आर्थिक बजेट सेशन असल्याने दिल्लीला जाणं गरजेचं आहे. सभागृहाची गटनेते असल्यामुळे परवानगी घेण्यासाठी आलो.”
दरम्यान, शपथविधीच्या वेळी पवार गटातील नेत्यांना विश्वासात का घेतले नाही, असा प्रश्न विचारल्यावर त्यांनी हात जोडून ‘रामकृष्ण हरी’ असे म्हणत उत्तर टाळले.
याच दरम्यान, रोहित पवार यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांचे पीएसओ विदीप जाधव यांचे मुळगाव तरडगाव येथे नातेवाईकांना सांत्वन दिले. बारामती विमान अपघातात पाच जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता, ज्यात अजित पवार आणि त्यांचा पीएसओ विदीप जाधव यांचा समावेश होता.
शिरूर : शिरूर तालुक्यातील वरूडे गावात घराबाहेर झोपलेल्या व्यक्तीच्या निर्घृण हत्येचा उलगडा अवघ्या 36 तासांत…
मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि नाशिक कुंभमेळ्यानिमित्त तपोवन विकासासाठी आर्थिक…
नागपूर: महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही सरसकट नसून अनेक जाचक अटी-शर्तींनी युक्त असल्याने…
मुंबई: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत निर्माता…
मुंबई: "नेत्रदान हे मानवतेचे श्रेष्ठदान असून एका व्यक्तीच्या नेत्रदानामुळे दृष्टीहीनांच्या आयुष्यात नवी पहाट निर्माण होऊ…
षण्मुखानंद सभागृहात दुपारी २ वाजता होणार कार्यक्रम; संघटन विस्ताराला प्राधान्य मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी १०…