महाराष्ट्र

सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री! मनोज जरांगे पाटलांचा मोठा इशारा; त्या ‘गिधाडांवर लक्ष ठेवा’…

मुंबई: आज सुनेत्रा पवार यांची महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदी शपथविधी पार पडली. राज्यपालांच्या हस्ते राजभवनात त्यांनी पदाची शपथ घेतली. याआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत त्यांना गटनेता म्हणूनही निवडण्यात आले होते.

शपथविधीनंतर मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले, “सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या, हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे. पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या, हा चांगला विषय आहे. अजित पवार यांच्या जागेवर त्यांचाच माणूस हवा होता.”जरांगे पाटीलांनी सुनेत्रा पवार यांना सल्ला दिला: “सर्वांना सोबत घेऊन चालावे. अचानक जमलेल्या ढेकणांवर लक्ष ठेवा. गिधाड आता घिरट्या घालायला लागले आहेत. पवार कुटुंबासोबत राहणे फायदेशीर ठरेल, कारण हे ढेकण खूप रक्त पिऊ शकतात.”

दरम्यान, शरद पवार यांनी सकाळी पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. जरांगे पाटील म्हणाले, “हा त्यांचा राजकीय डावपेच असू शकतो. सुनेत्रा पवार यांनी सर्वांना घेऊन चालावे.”

शिरूर तालुका टीम

Recent Posts

मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याचा संदेश खोटा

मुंबई: मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याच्या माहितीत तथ्थ नाही. पाण्याच्या टाक्यांवर लोखंडी झाकणे बसवलेली…

16 तास ago

शिंदेंच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत मोठे प्रवेश; राष्ट्रवादीला धक्का

ठाणे: राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या भोवती वाढणारा जनाधार पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. “अपॉइंटमेंटशिवाय…

19 तास ago

लग्नाच्या आमिषाखाली फसवणूक? मुंबई महानगरपालिकेच्या सहायक आयुक्ताला अटक; प्रशासनात खळबळ

मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या के-ईस्ट वॉर्डचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांना एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून…

20 तास ago

‘लोकल टू ग्लोबल’! खासदार डॉ. श्रीकांत शिंदे यांचा हार्वर्डमधील अभ्यास दौरा प्रेरणादायी

मुंबई: Dr. Shrikant Eknath Shinde यांनी अमेरिकेतील Harvard Kennedy School येथे आयोजित अभ्यासदौऱ्यात सहभागी होत…

20 तास ago

मेळघाटातील कुपोषणाचे भीषण वास्तव; वर्षभरात ९२ बालकांचा मृत्यू

अमरावती: राज्यातील प्रगत विकासाच्या दाव्यांना छेद देणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट…

22 तास ago

तुम्हीही रात्री मोबाईल उशीखाली घेऊन झोपता त्याचे होऊ शकतात गंभीर परिणाम

फोन आजकाल लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. फोन नसेल तर अनेकांची कामे रखडतात. सकाळी…

22 तास ago