मुंबई: आज सुनेत्रा पवार यांची महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदी शपथविधी पार पडली. राज्यपालांच्या हस्ते राजभवनात त्यांनी पदाची शपथ घेतली. याआधी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आमदारांच्या बैठकीत त्यांना गटनेता म्हणूनही निवडण्यात आले होते.
शपथविधीनंतर मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी पहिली प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले, “सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री झाल्या, हा त्यांच्या पक्षाचा विषय आहे. पहिल्या महिला उपमुख्यमंत्री झाल्या, हा चांगला विषय आहे. अजित पवार यांच्या जागेवर त्यांचाच माणूस हवा होता.”जरांगे पाटीलांनी सुनेत्रा पवार यांना सल्ला दिला: “सर्वांना सोबत घेऊन चालावे. अचानक जमलेल्या ढेकणांवर लक्ष ठेवा. गिधाड आता घिरट्या घालायला लागले आहेत. पवार कुटुंबासोबत राहणे फायदेशीर ठरेल, कारण हे ढेकण खूप रक्त पिऊ शकतात.”
दरम्यान, शरद पवार यांनी सकाळी पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्र्यांच्या शपथविधीबाबत कोणतीही माहिती नसल्याचे सांगितले. जरांगे पाटील म्हणाले, “हा त्यांचा राजकीय डावपेच असू शकतो. सुनेत्रा पवार यांनी सर्वांना घेऊन चालावे.”
मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…
मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…
एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…
शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…