महाराष्ट्र

मालवणी टाऊनशिप शाळेत खाजगी संस्थेद्वारे अपात्र शिक्षकांची भरती; आमदार अस्लम शेख

पालिकेच्या शाळेत टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांची भरती करुन विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ! आमदार अस्लम शेख

नागपूर: मालाड पश्चिम मधील ‘मुंबई पब्लिक स्कूल’च्या’ ‘मालवणी टाऊनशिप शाळेत’ खाजगी संस्थेमार्फत अपात्र शिक्षकांची भरती करुन विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळखंडोबा सुरु आहे, असा गंभीर आरोप मालाड पश्चिमचे आमदार अस्लम शेख यांनी आज विधानसभेत केला.

शेख पुढे म्हणाले की, पालिकेच्या मालवणी टाऊनशिप शाळेत पहिली ते पाचवी पर्यंतच्या सीबीएसई बोर्डाच्या वर्गांतील टीईटी परीक्षा उत्तीर्ण पात्र शिक्षकांच्या सक्तीने व मनमानी पद्धतीने बदल्या केल्या गेल्या व तिथे खाजगी संस्थेद्वारे अपात्र शिक्षकांची भरती करण्यात आली. कालांतराने ६ वी ते ८वी व ९वी १०वी चे वर्ग देखील खाजगी संस्थेस देण्यात आले. खाजगी संस्थेने टीईटी उत्तीर्ण नसलेल्या शिक्षकांची भरती करुन विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळ सुरु केला. केंद्राचा शिक्षणाच्या अधिकाराचा कायदा (R.T.E) व सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाची पायमल्ली करुन ही भरती संपूर्ण प्रक्रिया राबविण्यात आली.

२०१३ पासून प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमध्ये शिक्षक म्हणून पात्र होण्यासाठी टीईटी किंवा सीटीईटी उत्तीर्ण होणं अनिवार्य करण्यात आलेलं आहे.

सर्वोच्या न्यायालयाच्या आदेशाचा दाखला देत शेख म्हणाले, सर्वोच न्यायालयाच्या एका आदेशानुसार १५ वर्षांपासून सेवेत असलेल्या शिक्षकांना देखील टीईटी अनिवार्य केलेली आहे. जर शिक्षक निर्धारित वेळेत टीईटी उत्तीर्ण होऊ शकला नाही, तर त्याला निवृत्त करण्यात यावे, असे सर्वोच्च न्यायालयाचे स्पष्ट आदेश आहे.

शिक्षणाच्या अधिकारांतर्गत (R.T.E.) प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील शिक्षकांसाठी निकष व पात्रता स्पष्ट केलेल्या आहेत. असे असताना देखील ही भरती प्रक्रिया राबविण्यात आली.

राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी भरती प्रक्रिया पालिकेच्या धोरणानुसार झाली आहे, पालकांमधील गैरसमज दूर झालेले आहेत, असे आपल्या उत्तरात स्पष्ट केले. मात्र त्यानंतरही आमदार अस्लम शेख यांनी टीईटीचा मुद्दा लावून धरला.

मंगलप्रभात लोढा यांनी चर्चेत हस्तक्षेप करत आमदार अस्लम शेख यांच्यावर राजकीय टीकेचा सुर आळवला. मात्र टीईटीच्या बाबतीत कोणतीच भूमिका मांडली नाही. यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी प्रश्न शालेय शिक्षण विभागाशी संबंधित असल्याचे सांगत मंत्री दादा भूसे यांच्याकडे वळता केला. मंत्री दादा भूसे यांनी केंद्राचा कायदा व न्यायालयाचा आदेशाच्या अनुषंगाने संपूर्ण प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लुडो खेळाच्या वादातून तरुणाची निर्घृण हत्या; आरोपीसह तिघांना अटक

अमरावती: अमरावती शहरात शनिवारी (४ जुलै) रात्री उशिरा लुडो खेळादरम्यान झालेल्या किरकोळ वादाचे रूपांतर भीषण…

2 तास ago

रांजणगाव M.I.D.C मध्ये औद्योगिक शांततेसाठी पोलीस-उद्योग प्रतिनिधींची समन्वय बैठक संपन्न

रांजणगाव गणपती (तेजस फडके): रांजणगाव M.I.D.C परिसरातील औद्योगिक शांतता, कायदा व सुव्यवस्था, कामगार सुरक्षा तसेच…

3 तास ago

मुसळधार पावसामुळे पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग आणि जुना महामार्ग बंद; नागरिकांना प्रवास टाळण्याचे आवाहन

पुणे: राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे पुणे–मुंबई द्रुतगती मार्ग (एक्सप्रेसवे) आणि जुना पुणे–मुंबई महामार्ग या…

7 तास ago

‘पाईप चोरी’ प्रकरणात फिर्यादी व स्वच्छता निरीक्षकांची चौकशी करा; अनिल बांडे

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर नगरपरिषदेतील कथित पाईप चोरी प्रकरणाला नवे वळण मिळाले असून, या प्रकरणात…

7 तास ago

पँटमध्ये लपलेल्या विंचवाचा 12 वर्षीय मुलाला दंश; डॉक्टरांच्या प्रयत्नांनी 72 तासांनंतर जीव वाचला

पावसाळ्यात कपडे, शूज आणि वाहन तपासूनच वापरा; विंचू-सापांपासून सावध राहण्याचे आवाहन  चंद्रपूर: पावसाळ्यात घरात विंचू,…

7 तास ago

हिरवा कफ झाल्यावर अ‍ॅंटी बायोटिक्स घ्यावे की नाही

वातावरण बदल झाला की, लोक वेगवेगळ्या आजारांचे शिकार होतात. सर्दी खोकला होणं तर कॉमनच आहे.…

7 तास ago