२८ फेब्रुवारीला उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा
मुंबई: वांद्रे पूर्वेकडील शासकीय वसाहतीमध्ये उच्च न्यायालयाच्या उभारणीसाठी बांधकामे हटविण्यात येत आहेत. या ठिकाणी त्रिरत्न बुध्द विहार असून या विहाराच्या बचावासाठी स्थानिक रहिवाशी आक्रमक झाले आहेत. बुध्द विहारासाठी शासकीय वसाहतीमध्येच पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, या प्रमुख मागणीसाठी येत्या २८ फेब्रुवारी रोजी उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी ११ वाजता मोर्चा काढण्यात येणार आहे.
बुध्द विहार बचावासाठी त्रिरत्न बुध्द विहार बचाव कृती समितीने वांद्रे पूर्व,शास्त्रीनगर येथील कुशिनारा बुद्ध विहार येथे स्थानिक बौद्ध समाज बांधव व हितचिंतक यांची एक बैठक आयोजित केली. या बैठकीचे अध्यक्षस्थान एस. बी. जाधव यांनी भूषविले. यावेळी प्रज्ञा सांस्कृतिक केंद्राचे अध्यक्ष सुरेश गायकवाड यांनी शासकीय वसाहतीमधील त्रिरत्न बुध्द विहार वाचविण्याबाबत भूमिका मांडली. ते म्हणाले की, समता सेवा संघ गृहनिर्माण सोसायटीच्या झोपडपट्टी पुनर्वसन संदर्भात शासनाने नोटीस बजावली आहे. मात्र अद्याप त्रिरत्न बुद्ध विहारास कोणतीही नोटीस बजावण्यात आलेली नाही. या संदर्भात वरिष्ठस्तरावर पाठपुरावा करण्याचे कार्य सुरू असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले.
तसेच समाज बांधवांनी त्रिरत्न बुध्द विहार बचावासाठी एकत्र येऊन लढा उभाण्याचे आवाहन केले. या बैठकीमध्ये त्रिरत्न बुद्ध विहार बचाव कृती समिती सह प्रज्ञा सांस्कृतिक केंद्र यांच्या नेतृत्वात शुक्रवार दि. २८ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.या बैठकीत दामोदर गायकवाड, आनंद कांबळे, विजय जाधव, किसन रोकडे, रमेश बैले ,काका मोरे तांबे एल. आर.गोडबोले, चंद्रशेखर सकपाळ सुमित वजाळे यांनी आपले मत मांडले.या बैठकीला वांद्रे विभागातील विविध राजकीय पक्षाचे तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.
मुंबई: मुंबई–पुणे द्रुतगती मार्गाला पूर्णतः ‘ऍक्सेस कंट्रोल’ बनवणाऱ्या महत्त्वाच्या ‘मिसिंग लिंक’ प्रकल्पाचे ९९ टक्के काम…
मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…
नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…
पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…
मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…
पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…