महाराष्ट्र

वांद्र्यातील त्रिरत्न बुध्द विहार बचावासाठी रहिवाशी रस्त्यावर उतरणार…

२८ फेब्रुवारीला उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

मुंबई: वांद्रे पूर्वेकडील शासकीय वसाहतीमध्ये उच्च न्यायालयाच्या उभारणीसाठी बांधकामे हटविण्यात येत आहेत. या ठिकाणी त्रिरत्न बुध्द विहार असून या विहाराच्या बचावासाठी स्थानिक रहिवाशी आक्रमक झाले आहेत. बुध्द विहारासाठी शासकीय वसाहतीमध्येच पर्यायी जागा उपलब्ध करून द्यावी, या प्रमुख मागणीसाठी येत्या २८ फेब्रुवारी रोजी उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर सकाळी ११ वाजता मोर्चा काढण्यात येणार आहे.

बुध्द विहार बचावासाठी त्रिरत्न बुध्द विहार बचाव कृती समितीने वांद्रे पूर्व,शास्त्रीनगर येथील कुशिनारा बुद्ध विहार येथे स्थानिक बौद्ध समाज बांधव व हितचिंतक यांची एक बैठक आयोजित केली. या बैठकीचे अध्यक्षस्थान एस. बी. जाधव यांनी भूषविले. यावेळी प्रज्ञा सांस्कृतिक केंद्राचे अध्यक्ष सुरेश गायकवाड यांनी शासकीय वसाहतीमधील त्रिरत्न बुध्द विहार वाचविण्याबाबत भूमिका मांडली. ते म्हणाले की, समता सेवा संघ गृहनिर्माण सोसायटीच्या झोपडपट्टी पुनर्वसन संदर्भात शासनाने नोटीस बजावली आहे. मात्र अद्याप त्रिरत्न बुद्ध विहारास कोणतीही नोटीस बजावण्यात आलेली नाही. या संदर्भात वरिष्ठस्तरावर पाठपुरावा करण्याचे कार्य सुरू असल्याचे गायकवाड यांनी स्पष्ट केले.

तसेच समाज बांधवांनी त्रिरत्न बुध्द विहार बचावासाठी एकत्र येऊन लढा उभाण्याचे आवाहन केले. या बैठकीमध्ये त्रिरत्न बुद्ध विहार बचाव कृती समिती सह प्रज्ञा सांस्कृतिक केंद्र यांच्या नेतृत्वात शुक्रवार दि. २८ फेब्रुवारी २०२५ रोजी सकाळी ११ वाजता उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला.या बैठकीत दामोदर गायकवाड, आनंद कांबळे, विजय जाधव, किसन रोकडे, रमेश बैले ,काका मोरे तांबे एल. आर.गोडबोले, चंद्रशेखर सकपाळ सुमित वजाळे यांनी आपले मत मांडले.या बैठकीला वांद्रे विभागातील विविध राजकीय पक्षाचे तसेच सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शाळा-महाविद्यालयांच्या दारातच नशेचा बाजार; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे विद्यार्थ्यांचे भविष्य धोक्यात

राजगुरूनगर: राजगुरुनगर शहरातील शाळा आणि महाविद्यालयांच्या परिसरात गुटखा, मावा, सिगारेट व इतर तंबाखूजन्य पदार्थांची खुलेआम…

10 तास ago

दरडग्रस्त भागांच्या सुरक्षेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

मुंबई: मुंबई उपनगरातील घाटकोपर, विक्रोळी आणि भांडुप परिसरातील डोंगराळ भागांमध्ये दरवर्षी पावसाळ्यात घडणाऱ्या दरड कोसळण्याच्या घटनांमुळे…

11 तास ago

डिजिटल परिवर्तनामुळे तंत्रशिक्षण प्रशासन अधिक पारदर्शक आणि कार्यक्षम; ई-गव्हर्नन्स पुस्तिकेचे प्रकाशन

मुंबई: राज्यातील तंत्रशिक्षण क्षेत्रात प्रशासन अधिक पारदर्शक, कार्यक्षम, उत्तरदायी आणि डेटा-आधारित करण्याच्या उद्देशाने विकसित करण्यात…

11 तास ago

शिरुर तालुक्यात सामाईक इलेक्ट्रिक मोटारच्या वादातून सख्ख्या भावाकडून मारहाण

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील गुनाट गावात सामाईक वापरातील इलेक्ट्रिक मोटारच्या वादातून सख्ख्या…

14 तास ago

शिरुर तालुक्यातील भीषण अपघातात पत्नीच्या मृत्यू प्रकरणी; पतीवर गुन्हा दाखल

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील न्हावरे-निर्वी अष्टविनायक महामार्गावर झालेल्या भीषण कार अपघातात एका महिलेचा मृत्यू…

15 तास ago

भाजलेल्या हरभऱ्याचे फायदे

चणे हा प्रथिनांचा समृद्ध स्रोत आहे. रोज भाजलेले हरभऱ्याचे सेवन केल्यास शरीराला अनेक आरोग्य समस्यांपासून…

18 तास ago