महाराष्ट्र

रिक्षा-टॅक्सी चालकांना १५ ऑगस्टपर्यंत मराठी शिकणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील रिक्षा-टॅक्सी चालकांना प्रवाशांशी मराठीत संवाद साधता यावा यासाठी अमराठी चालकांना १५ ऑगस्टपर्यंत व्यावहारिक मराठी भाषा शिकणे सक्तीचे करण्यात आले आहे. १६ ऑगस्टनंतर कोणतीही मुदतवाढ दिली जाणार नसून नियमांचे पालन न करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिला.

मंत्रालयात आयोजित बैठकीत ते बोलत होते. या बैठकीस विविध साहित्य संस्था, परिवहन विभागाचे अधिकारी आणि तज्ज्ञ उपस्थित होते.

राज्यात मराठी भाषेचा प्रचार-प्रसार करण्यासाठी परिवहन विभाग, कोकण मराठी साहित्य परिषद आणि मुंबई मराठी साहित्य संघ यांच्या माध्यमातून राज्यभरात मराठी भाषा अभ्यास केंद्रे सुरू करण्यात येणार आहेत. रिक्षा संघटना आणि शिवसेना शाखांमधील उपलब्ध जागांमध्येही ही केंद्रे १५ ऑगस्टपर्यंत कार्यरत राहतील.

चालकांना ऑनलाईन तसेच ऑफलाईन पद्धतीने प्रशिक्षण दिले जाणार असून, सुमारे चार हजार शिक्षक या उपक्रमात सहभागी होणार आहेत. प्रत्येक महिन्यातील चार शनिवार-रविवार चालकांच्या सोयीप्रमाणे किमान चार तासांचे प्रशिक्षण पूर्ण करावे लागणार आहे. काही शिक्षक विनामूल्य सेवा देणार असून काहींना प्रति तास एक हजार रुपये मानधन दिले जाणार आहे.

या प्रशिक्षणासाठी आवश्यक निधीसाठी मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी दोन कोटी रुपयांच्या प्रस्तावाला पुढाकार दिल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या चालकांना परिवहन विभागाकडून प्रमाणपत्र दिले जाणार असून, त्यांच्या मराठी भाषेवरील व्यवहारिक क्षमतेची तोंडी परीक्षा घेण्यात येणार आहे.याशिवाय रिक्षा-टॅक्सी तसेच ओला, उबेर आणि रॅपिडो वाहनांवर मराठी जनजागृतीसाठी स्टिकर्स लावले जाणार असून, विशेष बॅनर्सद्वारे प्रचार मोहीमही राबविण्यात येणार आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शरद पवारांच्या NDA प्रवेशाच्या चर्चेला उधाण; पृथ्वीराज चव्हाणांचे आवाहन, सुप्रिया सुळेंचे प्रत्युत्तर

नाशिक : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष NDAसोबत जाणार…

9 तास ago

उन्हाळ्यात ताक प्यावं पण कधी, दुपारी-रात्री की कधीही?

उन्हाळ्यात शरीराला आतून थंडगार ठेवण्यासाठी आपण आहारात दही - ताकाचा समावेश करतो. या दिवसांत दही…

9 तास ago

दिवसभरात आपण किती वेळा श्वास घेतो

२४ तासात मनुष्य किती वेळा श्वास घेतो? मानवी शरीर प्रत्यक्षात एखाद्या रहस्याहून कमी नाही. किंबहुना…

9 तास ago

किडनी स्टोन समस्या आणि काळजी

किडनी स्टोनचा त्रास खूप भयंकर आणि असह्य असतो. चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी सोबतच कमी पाणी पिण्याची…

9 तास ago

दोन्ही शिवसेना पुन्हा एकत्र येणार? प्रताप सरनाईकांच्या वक्तव्याने राजकीय चर्चेला उधाण

मुंबई: महाराष्ट्राच्या राजकारणात शिवसेनेच्या दोन्ही गटांच्या संभाव्य एकत्रीकरणाची चर्चा पुन्हा रंगू लागली आहे. शिंदे गटाचे…

9 तास ago

पोषण आहारावर प्रश्न उपस्थित करणाऱ्या अंगणवाडी सेविकेवर कारवाई; आंबेगावात प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्न

पुणे : आंबेगाव तालुक्यात अंगणवाडीतील चिमुकल्यांना आणि स्तनदा मातांना दिल्या जाणाऱ्या पोषण आहाराच्या दर्जावर प्रश्न…

9 तास ago