मुंबई: राज्यातील शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आणि डिजिटल तंत्रज्ञानाचे आधुनिक प्रशिक्षण देण्यासाठी शालेय शिक्षण विभाग आणि Google for Education यांच्यात उद्देशपत्रावर स्वाक्षरी करण्यात आली आहे. या उपक्रमांतर्गत पुढील दीड वर्षांत राज्यातील चार लाखांहून अधिक शिक्षकांना ‘गुगल एआय एज्युकेटर सिरीज’ अंतर्गत प्रशिक्षण दिले जाणार आहे.
शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांच्या उपस्थितीत मंत्रालयात झालेल्या कार्यक्रमात गुगल फॉर एज्युकेशनचे उपाध्यक्ष ख्रिस फिलिप्स आणि शालेय शिक्षण विभागाचे सहसचिव ताशीलदार यांनी करारावर स्वाक्षरी केली.
या उपक्रमाद्वारे शिक्षकांना कृत्रिम बुद्धिमत्ता, डिजिटल साधनांचा वापर, डिजिटल सुरक्षितता आणि आधुनिक अध्यापन पद्धतींचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. प्रारंभी निवडक मास्टर ट्रेनर्सना प्रशिक्षण देण्यात येईल. त्यानंतर हे प्रशिक्षित शिक्षक राज्यभरातील इतर शिक्षकांना मार्गदर्शन करतील.
यावेळी मंत्री दादाजी भुसे यांनी सांगितले की, बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षकांना आधुनिक कौशल्यांनी सुसज्ज करणे आवश्यक आहे. या प्रशिक्षणामुळे राज्यातील प्रत्येक शाळेपर्यंत एआय आधारित शिक्षणाचा लाभ पोहोचेल. विशेष म्हणजे या संपूर्ण उपक्रमासाठी राज्य शासनावर कोणताही आर्थिक भार पडणार नसून प्रशिक्षण गुगलकडून विनामूल्य उपलब्ध करून दिले जाणार आहे.
राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले की, या सहकार्यामुळे शासकीय आणि अनुदानित शाळांमधील शिक्षकांना जागतिक दर्जाचे प्रशिक्षण मिळणार असून त्याचा फायदा विद्यार्थ्यांनाही होईल.
या उपक्रमांतर्गत मराठी, हिंदी आणि इंग्रजी भाषांमध्ये प्रशिक्षण सामग्री उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसेच शिक्षकांना सुरक्षित डिजिटल ओळख, आधुनिक एआय साधनांचा शैक्षणिक वापर आणि व्यावसायिक विकासाच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत.
राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० शी सुसंगत असलेल्या या उपक्रमामुळे राज्यातील डिजिटल शिक्षण व्यवस्थेला चालना मिळणार असून स्मार्ट वर्गखोल्या, डिजिटल ग्रंथालये, आयसीटी प्रयोगशाळा आणि कनेक्टेड क्लासरूम्स अधिक सक्षम होण्यास मदत होणार आहे.
मुंबई: आजचा दिवस अनेक राशींसाठी नवीन संधी, प्रगती आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरणार आहे.…
मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी गांधी भवन येथील काँग्रेस कार्यालयात घुसून धुडगूस घातल्याचा आरोप करत…
ठाणे: उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवक व लोकप्रतिनिधींना सेवाभाव,…
आजकाल वेगवेगळ्या कारणांनी लोकांना किडनी स्टोनची समस्या होते. किडनी स्टोन झाल्याचं अनेकदा फार उशीरा समजतं.…
एक्सरसाईज आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. लोक फीट राहण्यासाठी रोज एक्सरसाईज करतात.…
मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) च्या शेअरमध्ये मंगळवारी बाजार सुरू होताच…