महाराष्ट्र

पावसाच्या विलंबाची कारणे जाणून घेण्यासाठी जय पवारांची हवामान केंद्राला भेट

मुंबई: महाराष्ट्रात मान्सूनच्या प्रगतीला झालेल्या विलंबाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे युवानेते जय पवार यांनी मुंबईतील प्रादेशिक हवामान केंद्राला (RMC) भेट देत पावसाच्या सद्यस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी हवामान तज्ज्ञांशी चर्चा करून राज्यातील पावसाच्या संभाव्य स्थितीबाबत माहिती घेतली.

हवामान केंद्रातील तज्ज्ञ बिक्रम सिंग यांनी जय पवार यांचे स्वागत करून संस्थेच्या कार्याची माहिती दिली. त्यानंतर डॉ. नायर, सौ. निथा, डॉ. जिस्मी आणि योगेश यांच्यासोबत झालेल्या चर्चेत पावसाच्या विलंबामागील कारणांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. एल निनोचा संभाव्य प्रभाव तसेच इतर हवामानविषयक घटकांवरही चर्चा झाली.

हवामान तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रात सुमारे २५ जूनच्या आसपास पाऊस पुन्हा सक्रिय होण्याची शक्यता आहे. राज्यातील अनेक भागांमध्ये शेतकरी पेरणीसाठी पावसाची प्रतीक्षा करत असून, पावसाच्या विलंबामुळे शेती, जलसाठे आणि जनजीवनावर परिणाम होत आहे.

यावेळी जय पवार यांनी शेतकऱ्यांना आवाहन करताना सांगितले की, पाऊस पूर्णपणे सक्रिय होऊन सातत्याने सुरू होईपर्यंत पेरणीची घाई करू नये. घाईघाईने पेरणी केल्यास दुबार पेरणीची वेळ येऊ शकते आणि त्यामुळे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता आहे. त्यामुळे हवामान खात्याच्या सूचनांचा विचार करूनच निर्णय घ्यावा.

पाऊस नियमित सुरू होईपर्यंत प्रादेशिक हवामान केंद्राशी सातत्याने संपर्क ठेवून पावसाच्या प्रगतीविषयीची अचूक आणि अद्ययावत माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याचा प्रयत्न करणार असल्याचेही जय पवार यांनी यावेळी सांगितले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

जाणून घ्या आपल्यासाठी आपला आजचा दिवस कसा असेल

मुंबई: आजचा दिवस अनेक राशींसाठी नवीन संधी, प्रगती आणि सकारात्मक बदल घेऊन येणारा ठरणार आहे.…

2 तास ago

गांधी भवनवरील हल्ल्यामागे भाजप-पोलिसांची फूस; काँग्रेस गांधींचा मार्ग सोडणार नाही; हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही कार्यकर्त्यांनी गांधी भवन येथील काँग्रेस कार्यालयात घुसून धुडगूस घातल्याचा आरोप करत…

12 तास ago

लोकप्रतिनिधींनी मालक नव्हे, जनतेचा सेवक बनावे; एकनाथ शिंदे

ठाणे: उपमुख्यमंत्री तथा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी कल्याण-डोंबिवली महानगरपालिकेतील शिवसेनेच्या नगरसेवक व लोकप्रतिनिधींना सेवाभाव,…

12 तास ago

किडनी स्टोन असल्यावर कोणती फळं खावीत आणि कोणती टाळावीत

आजकाल वेगवेगळ्या कारणांनी लोकांना किडनी स्टोनची समस्या होते. किडनी स्टोन झाल्याचं अनेकदा फार उशीरा समजतं.…

17 तास ago

एक्सरसाईज नंतर लगेच पाणी पिणं पडू शकतं महागात, जाणून घ्या योग्य पद्धत कोणती

एक्सरसाईज आरोग्यासाठी किती फायदेशीर असते हे सगळ्यांनाच माहीत आहे. लोक फीट राहण्यासाठी रोज एक्सरसाईज करतात.…

17 तास ago

सरकारच्या हिस्सा विक्रीच्या निर्णयाने LIC शेअर घसरला; बाजार उघडताच 9% पडझड

मुंबई : देशातील सर्वात मोठी विमा कंपनी एलआयसी (LIC) च्या शेअरमध्ये मंगळवारी बाजार सुरू होताच…

17 तास ago