मुंबई: ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या आठवड्यात एलिमिनेशनचा थरार चांगलाच वाढला असून, सोनाली राऊत घराबाहेर पडल्याच्या जोरदार चर्चा सध्या सोशल मीडियावर सुरू आहेत. या आठवड्यात घरातील एकूण आठ सदस्यांवर एलिमिनेशनची टांगती तलवार होती. सोनाली राऊत, दिपाली सय्यद, विशाल कोटियन, प्रभू शेळके, प्राजक्ता शुक्रे, करण सोनावणे, ओमकार राऊत आणि रुचिता जामदार हे सदस्य नॉमिनेशनमध्ये होते.
तिसऱ्या आठवड्यात घरात ‘मिस्टर इंडिया’ नॉमिनेशन टास्क पार पडला. या टास्कदरम्यान अनेक स्पर्धकांच्या मैत्रीत फूट पडल्याचं पाहायला मिळालं. घराचा कॅप्टन आयुष संजीव असल्यामुळे तो या आठवड्यात नॉमिनेशन प्रक्रियेतून सुरक्षित होता. या टास्कमधून एकूण सात सदस्य नॉमिनेट झाले.
दरम्यान, आठवी नॉमिनेटेड सदस्य सोनाली राऊत हिला ‘बिग बॉस’ने थेट नॉमिनेट केलं होतं. आदल्या आठवड्यात ‘शेणाचं दार अन् मेणाचं दार’ हा पॉवर कीसाठीचा टास्क खेळण्यास सोनालीने कपडे घाण होतील या कारणावरून स्पष्ट नकार दिला होता. यावरून ‘बिग बॉस’ने तिच्यावर थेट कारवाई करत तिला नॉमिनेट केलं. याच मुद्द्यावर कार्यक्रमाचा सूत्रसंचालक रितेश देशमुख यांनीही सोनालीच्या वागणुकीवर नाराजी व्यक्त केली होती.
अखेर हा निर्णय सोनालीला चांगलाच महागात पडल्याचं दिसत आहे. सोशल मीडियावर सुरू असलेल्या चर्चांनुसार सोनाली राऊत घराबाहेर गेल्याचं वृत्त समोर येत आहे. तिचा ‘बिग बॉस’मधील प्रवास इतक्या लवकर संपेल, अशी अपेक्षा प्रेक्षकांनी केलेली नव्हती. त्यामुळे या अनपेक्षित एव्हिक्शनमुळे अनेकांना धक्का बसला आहे.
व्होटिंग ट्रेंडनुसार ओमकार राऊत आणि सोनाली राऊत बॉटम-२ मध्ये होते. मात्र दिव्या शिंदेच्या चाहत्यांनी ओमकार राऊतला मोठ्या प्रमाणात पाठिंबा दिल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे सोनाली राऊत घराबाहेर झाल्याच्या चर्चा अधिक बळावल्या आहेत.
या सर्व चर्चांवर अधिकृत शिक्कामोर्तब रविवारी प्रसारित होणाऱ्या ‘भाऊच्या धक्क्या’मध्ये होणार असून, प्रेक्षकांना नेमकं काय घडलं याची स्पष्टता तेव्हाच मिळणार आहे.
मुंबई: महाराष्ट्राच्या जनजीवनाशी नाळ जोडलेली लालपरी आता नव्या उमेदीनं, नव्या शिस्तीनं आणि नव्या संवेदनशीलतेनं प्रवासाला…
नागपूर: राज्यातील महायुती सरकार महापुरुषांचा अपमान करणाऱ्यांना अभय देत आहे का, असा संतप्त सवाल काँग्रेस…
पनवेल: पनवेल महानगरपालिका आणि अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद, पनवेल शाखा यांच्या संयुक्त विद्यमाने ११…
मुंबई: तेलंगणातील काँग्रेस सरकारने मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांच्या नेतृत्वाखाली राज्य परिवहन महामंडळाचे राज्य सरकारमध्ये विलीनीकरण…
पुणे: वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (VSI) च्या उच्चस्तरीय शिष्टमंडळाचा २६ एप्रिल ते ८ मे २०२६ दरम्यान…
अहिल्यानगर: नदी ही केवळ पाण्याचा प्रवाह नसून ऊर्जा, श्रद्धा आणि सृष्टीचा आधार आहे—आणि म्हणूनच नदी…