मुंबई: रायगड जिल्ह्यातील खालापूर येथील इर्शाळवाडीवर दरड कोलळून नैसर्गिक आपत्ती ओढवली गेली व ४८ कुटुंबावर अस्मानी संकटाचा घाला आला. त्यात ठाकर वाडीतील २२ निष्पाप जीवांचे बळी गेले, ५७ जण अद्याप बेपत्ता असून अनेक जखमींवर उपचार केले गेले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सरकार तर्फे सर्वोतपरी मदत उपलब्ध करून दिलीय व महाराष्ट्र सरकार त्यांचे पुनर्वसन देखील करून देणार आहे. आश्रम शाळेत शिकणा-या अनेक मुलांना अनाथ व पोरके व्हावे लागले त्यांचे डॉ. श्रीकांत शिंदे फ़ाउंडेशन ने पालकत्व स्वीकारले आहे.
शिवसेना पक्षाचे ८०% समाजकारण हे सुत्र लक्षात घेऊन शिवसेना सचिव व शिव चित्रपट सेनेचे अध्यक्ष सुशांत शेलार तसेच अभिनेत्री अदिती सारंगधर व इतर सहकारी यांनी तेथील महिला, मुले व ठाकर बांधवांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यां ना मानसिक बळ दिले व माणुसकीची मायेची पाखर दिली तसेच त्यांचे सांत्वन करून या दुर्घटनेच्या दु:खातून सावरण्यासाठी त्यांच्या सोबत हितगूज करत धीर दिला व त्यांच्यासाठी परमेश्वराकडे नव्याने आयुष्य जगण्याची शक्ती मिळो अशी प्रार्थना केली.
मुंबई: डिजिटल वित्तीय क्षेत्रातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा लाभ सर्वसामान्य नागरिक, शेतकरी, महिला उद्योजक, स्टार्टअप्स तसेच सूक्ष्म,…
लंडन: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दोन दिवसांच्या लंडन दौऱ्यावर दाखल झाले आहेत. हिथ्रो विमानतळावर त्यांचे आगमन…
नागपूर: राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने मोठी ओढ दिल्याने खरीप पिके संकटात सापडली आहेत. अनेक तालुक्यांमध्ये गेल्या…
मुंबई: महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्याची आणि लोककल्याणकारी योजनांची दखल आता आंतरराष्ट्रीय पातळीवर घेण्यात…
तापलेले असतानाच आता नवरात्रोत्सवातील गरबा-दांडियावरूनही वाद निर्माण झाला आहे. मंत्री नितेश राणे यांनी गरब्यात ‘लव्ह…
शिरूर : वाघाळे (ता. शिरूर) येथील आदर्श शिक्षक मारुती वामन थोरात यांचे अपघाती सोमवारी (ता.…