महाराष्ट्र

शिवाजीनगर रेल्वे भुयारी मार्ग २६ ते ३१ जुलै पर्यंत बंद! ‘हे’ आहे पर्यायी मार्ग

संभाजीनगर: शिवाजीनगर रेल्वे भुयारी मार्गावर लोखंडी संरक्षक पाट्यांचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामामुळे संपूर्ण मार्ग बंद राहणार आहे. नागरिकांनी प्रवासाच्या आधी पर्यायी मार्गांचा वापर करावा.

दररोज २ लाख नागरिकांना फटका

या मार्गाचा दररोज सुमारे १.५ ते २ लाख नागरिक वापर करतात. मार्ग बंद असल्याने आता प्रवाशांना ५ किमीचा अधिकचा फेरा मारावा लागणार आहे. यामुळे वेळेचा अपव्यय आणि इंधन खर्च वाढण्याची शक्यता आहे.

वाहतूक बदल, पर्यायी सुचना

शिवाजीनगर रेल्वे भुयारी मार्ग बंद असल्यामुळे, नागरिकांनी खालील पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करावे

पर्यायी मार्ग 2

देवलाई चौक → गोदावरी टी पॉईंट → संगम नगर→ उड्डाणपूल मार्ग हे मार्ग वाहनधारकांसाठी जलद आणि सोयीस्कर आहेत.

पर्यायी मार्ग २

देवलाई चौक→ गोदावरी टी पॉईंट एमआयटी कॉलेज→ आश्रम चौक→ रेल्वे स्टेशन

विशेषतः स्टेशनकडे जाणाऱ्या नागरिकांनी या मार्गाचा उपयोग करावा.

वाहतूक नियंत्रणासाठी पोलिस बंदोबस्त

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी विशेष पोलीस बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. कामाच्या वेळेत वाहतूक पोलिसांची अतिरिक्त नेमणूक केली जाणार आहे. नागरिकांनी संयम पाळून प्रशासनाला सहकार्य करावे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर तालुक्यात कारने एकमेकांना धडक देत केला गोळीबार; एकाचा मृत्यू….

शिरूर (अरुणकुमार मोटे) : शिरूर तालुक्यातील शिरूर-न्हावरे मार्गावरील करडे घाट परिसर आज (सोमवरा) सायंकाळी पाच…

8 तास ago

हिंदकेसरी महेंद्र गायकवाड यांचा भव्य नागरी सत्कार; जयकुमार गोरे यांची उपस्थिती

मंगळवेढा: सातारा येथे झालेल्या ५२ व्या हिंदकेसरी कुस्ती स्पर्धेत मानाचा ‘हिंदकेसरी’ किताब पटकावून मंगळवेढा तालुक्यातील…

14 तास ago

आदरणीय अजितदादांच्या पश्चात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा जीवनपट माझ्यासाठी आदर्श दीपस्तंभासारखा

पुण्यश्लोक, राजमाता अहिल्यादेवी होळकर यांच्या चरणी सुनेत्रा अजित पवार नतमस्तक मुंबई: स्वराज्यजननी जिजाऊ माँसाहेब, पुण्यश्लोक…

14 तास ago

अहिल्यादेवींच्या विचारांवर राज्यकारभार! चौंडीच्या विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही; एकनाथ शिंदे

अहिल्यानगर: लोकमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीनिमित्त चौंडी येथे आयोजित भव्य जयंती सोहळ्यात…

14 तास ago

नवनाथ बन यांनी शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्यापेक्षा सत्याचा अभ्यास करावा; राष्ट्रवादी काँग्रेसची टीका

मुंबई: कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर बोलताना नवनाथ बन यांनी केलेल्या विधानांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने समाचार…

14 तास ago

भेसळ, विषारी दारू आणि शिक्षण व्यवस्थेतील भ्रष्टाचारावर आमदार सत्यजीत तांबे यांची घणाघाती टीका

जळगाव: अन्नपदार्थांतील भेसळ, विषारी दारूच्या घटना, शिक्षण विभागातील भ्रष्टाचार, मराठी माध्यमाच्या शाळांसमोरील आव्हाने आणि अनुदानित…

15 तास ago