महाराष्ट्र

श्री संत ज्ञानोबा तुकोबा यांच्या पादुका चालल्या राम भेटीला सातासमुद्रा पार दुबईला

पुणे: जगाचे केंद्रबिंदू असणारी दुबई येथे सर्वात मोठे हिंदूंचे राम मंदिर असलेल्या कार्तिकी एकादशी निमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पादुका या मंदिरात भेटीस जाणार असल्याची माहिती दिंडीचे कार्याध्यक्ष ॲड. शरद बांदल यांनी दिली आहे.

श्री संत ज्ञानोबा तुकोबा विश्व भ्रमण दिंडीचे आयोजन करण्यात आले असुन (दि. २०) ते (दि. २५) नोव्हेंबर २०२२ या दरम्यान दिंडी आळंदी-पुणे-दुबई-राम मंदिर-बरजुमान-अबुदाबी- शारजा-पुणे-आळंदी अश्या प्रकारे भ्रमण करणार आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी जागतिक तत्वज्ञान सामावलेल्या श्रीमद्भगवद्गीता या ग्रंथावर अनुवादात्मक ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ सांगून जगाला अंधकार रुपी अज्ञानातून प्रकाशरूपी ज्ञानाकडे सर्वसामान्यांना नेण्याचे कार्य केले.

तसेच ‘जगद्गुरु’ या पदवीला योग्य न्याय देत समाजाला ज्ञान देण्यासाठी पाचवा वेदरुपी ‘अभंग गाथा’ लिहिला असे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज. संत बहिणाबाईच्या उक्ती प्रमाणे ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ असे जगातील सकल संतांचे महामेरु श्री संत ज्ञानोबाराय तुकोबाराय यांच्या विचारांचा प्रसार प्रचार करण्यासाठी प्रथमच विदेशी धरतीवर श्री संत ज्ञानोबा-तुकोबा विश्वभ्रमण दिंडीचे आयोजन करण्यात आले असल्याचे दिंडीचे कार्याध्यक्ष ॲड. शरद बांदल यांनी सांगितले.

जगाला श्री संत ज्ञानोबा-तुकोबा कळावेत याकरिता स्वच्छ, निर्मल अंतःकरणाने आपण पादुका दिंडीच्या माध्यमातून जगभर भ्रमंती करत आहोत. यावर्षी जगाचे केंद्र बिंदू असणारी ‘दुबई’ येथे दिंडी जाण्याचे निश्चित केले आहे

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरूर! वरुडे येथील आरोपीचे स्टेटस; लवकरच एकाचा मर्डर करून जेलमध्ये जाणार…

शिक्रापूर : शिरूर तालुक्यातील वरुडे येथील एका अल्पवयीन मुलाने जुन्या वादाचा राग मनात धरून, गेल्या…

2 तास ago

Video: शिरूर तालुक्यात जमिनीच्या वादातून डोळ्यात मिरची पुड टाकत जीवघेणा हल्ला…

शिरूर (तेजस फडके) : नवीन खरेदी केलेल्या शेतजमिनीच्या वादातुन एकाने आपल्या साथीदारांच्या मदतीने एका चुलत…

4 तास ago

शिरुर! वरुडे खून प्रकरणाचा 36 तासांत उलगडा; मुलगा ताब्यात; कारण समोर…

शिक्रापुर (ओंकार भोरडे) शिरुर तालुक्यातील वरूडे गावात घराबाहेर झोपलेल्या व्यक्तीच्या निर्घृण हत्येचा उलगडा अवघ्या 36…

7 तास ago

आचारसंहितेदरम्यान घेतलेल्या निर्णयांवर काँग्रेसचा सवाल; निवडणूक आयोगाने चौकशी करावी; अनंत गाडगीळ

मुंबई : मराठा समाजातील विद्यार्थ्यांना शैक्षणिक सवलती, शेतकऱ्यांसाठी कर्जमाफी आणि नाशिक कुंभमेळ्यानिमित्त तपोवन विकासासाठी आर्थिक…

2 दिवस ago

शेतकरी कर्जमाफी फसवी; सर्वपक्षीय बैठक बोलवा; विजय वडेट्टीवार

नागपूर: महायुती सरकारने जाहीर केलेली शेतकरी कर्जमाफी ही सरसकट नसून अनेक जाचक अटी-शर्तींनी युक्त असल्याने…

2 दिवस ago

अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळावर समर्थ पॅनेलचे निर्विवाद वर्चस्व; सर्व १४ जागांवर विजय

मुंबई: अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळाच्या २०२६ ते २०३१ या पंचवार्षिक कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकीत निर्माता…

2 दिवस ago