पुणे: जगाचे केंद्रबिंदू असणारी दुबई येथे सर्वात मोठे हिंदूंचे राम मंदिर असलेल्या कार्तिकी एकादशी निमित्त श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज यांच्या पादुका या मंदिरात भेटीस जाणार असल्याची माहिती दिंडीचे कार्याध्यक्ष ॲड. शरद बांदल यांनी दिली आहे.
श्री संत ज्ञानोबा तुकोबा विश्व भ्रमण दिंडीचे आयोजन करण्यात आले असुन (दि. २०) ते (दि. २५) नोव्हेंबर २०२२ या दरम्यान दिंडी आळंदी-पुणे-दुबई-राम मंदिर-बरजुमान-अबुदाबी- शारजा-पुणे-आळंदी अश्या प्रकारे भ्रमण करणार आहे. श्री संत ज्ञानेश्वर महाराजांनी जागतिक तत्वज्ञान सामावलेल्या श्रीमद्भगवद्गीता या ग्रंथावर अनुवादात्मक ‘ज्ञानेश्वरी’ हा ग्रंथ सांगून जगाला अंधकार रुपी अज्ञानातून प्रकाशरूपी ज्ञानाकडे सर्वसामान्यांना नेण्याचे कार्य केले.
तसेच ‘जगद्गुरु’ या पदवीला योग्य न्याय देत समाजाला ज्ञान देण्यासाठी पाचवा वेदरुपी ‘अभंग गाथा’ लिहिला असे जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज. संत बहिणाबाईच्या उक्ती प्रमाणे ‘ज्ञानदेवे रचिला पाया, तुका झालासे कळस’ असे जगातील सकल संतांचे महामेरु श्री संत ज्ञानोबाराय तुकोबाराय यांच्या विचारांचा प्रसार प्रचार करण्यासाठी प्रथमच विदेशी धरतीवर श्री संत ज्ञानोबा-तुकोबा विश्वभ्रमण दिंडीचे आयोजन करण्यात आले असल्याचे दिंडीचे कार्याध्यक्ष ॲड. शरद बांदल यांनी सांगितले.
जगाला श्री संत ज्ञानोबा-तुकोबा कळावेत याकरिता स्वच्छ, निर्मल अंतःकरणाने आपण पादुका दिंडीच्या माध्यमातून जगभर भ्रमंती करत आहोत. यावर्षी जगाचे केंद्र बिंदू असणारी ‘दुबई’ येथे दिंडी जाण्याचे निश्चित केले आहे
मुंबई: महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळ यांच्या दादासाहेब फाळके चित्रपट रसास्वाद मंडळ उपक्रमांतर्गत…
मुंबई: नाशिक व मालेगाव येथील राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे काही पदाधिकारी आज काँग्रेसमध्ये दाखल…
मुंबई: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष Harshvardhan Sapkal यांनी राष्ट्रपिता Mahatma Gandhi यांच्या हत्येचे समर्थन…
मुंबई: मुंबई शहरात वाढत चाललेल्या ड्रग्जच्या बेकायदेशीर व्यापाराविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे प्रदेश प्रवक्ते…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर तालुक्यातील सविंदणे येथील सुप्रसिद्ध सनईवादक हरीभाऊ पवार (वय ७५ वर्षे) यांचे दीर्घ…
मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी भाजपावर जोरदार टीका…