महाराष्ट्र

मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार नवीन जीआर काढण्याच्या तयारीत

मुंबई: ओबीसी प्रवर्गातून मराठा समाजाला आरक्षण मिळावे, यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी आजपासून अन्न-पाणी त्याग आंदोलनाला सुरूवात केली आहे. दरम्यान, या आंदोलनाविरोधात दाखल याचिकेवर मु्ंबई हाय कोर्टात युक्तीवाद सुरू असून, यावेळी कोर्टाने राज्य सरकारला काही सूचना दिल्या आहेत. याच पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून मोठी हालचाल सुरू असल्याची माहिती समोर आली आहे. मराठा आरक्षणासाठी राज्य सरकार नवीन (जीआर) काढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

कुणबी प्रमाणपत्रासाठी सुलभता, कुणबी प्रमाणपत्र मिळवण्यासाठी गावातील नातेवाईक किंवा कुणबी प्रमाणपत्रधारक यांच्या ऍफिडेव्हिटवर आरक्षण लागू करण्यासंदर्भात राज्य सरकारकडून विचार केला जाईल, अशी माहिती समोर आली आहे.

गाव पातळीवर स्क्रुटिनी कमिटीची स्थापना, कुणबी नोंदी पडताळणीसाठी तालुका आणि ग्रामपंचायत स्तरावर नवीन स्क्रुटिनी कमिटी स्थापन करून, गाव पातळीवर नोंदी शोधण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. दरम्यान, महाधिवक्त्यांच्या मान्यतेनंतर जरांगे पाटील यांना मसुदा दाखवून अंतिम निर्णय घेतला जाईल, अशी माहिती समोर आली आहे.

मुंबई हाय कोर्टात राज्य सरकारला सुचना

मराठा आरक्षण आंदोलनाचा मुद्दा आता थेट हायकोर्टापर्यंत पोहोचला आहे. मराठा आरक्षण आंदोलनाविरूद्ध मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर युक्तीवाद सुरू आहे. यावेळी हायकोर्टाने काही महत्वाचे निरिक्षण नोंदवले आहेत. मुंबईतील मराठा आंदोलन हाताबाहेर गेलंय. आता कुणालाही मुंबईत येऊ देऊ नका, असे थेट निर्देश कोर्टाने राज्य सरकारला दिले आहे. यासह कोर्टाने राज्य सरकारला सुचना दिल्या आहेत.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

12 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

12 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

12 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

12 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

14 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

14 तास ago