मुंबई: अन्यायकारक इ-चलान रद्द करण्याबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल, असे आश्वासन देत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी राज्यातील वाहतूकदारांना ५ तारखेपासूनचे आंदोलन मागे घेण्याचे आवाहन केले.
राज्यातील विविध वाहतूक संघटनांच्या प्रतिनिधींशी झालेल्या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला परिवहन आयुक्त राजेश नार्वेकर व पोलीस प्रशासनाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
मंत्री सरनाईक म्हणाले, “इ-चलनांच्या कारवाईबाबत वाहतूकदारांच्या भावना तीव्र आहेत. पार्किंगमध्ये उभ्या वाहनांवर आकसाने इ-चलन काढले जात असल्याच्या तक्रारी आहेत. प्राधिकृत अधिकाऱ्यांऐवजी इतर कर्मचाऱ्यांकडून कारवाई होत असल्यास ते अन्यायकारक आहे.” संबंधित यंत्रणेला कडक सूचना देण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
येत्या ५ तारखेला परिवहन आयुक्त, पोलीस प्रशासन आणि वाहतूकदार संघटनांचे प्रतिनिधी यांची संयुक्त बैठक होणार असून, त्यात प्रलंबित मागण्यांवर तोडगा काढण्याचा प्रयत्न केला जाईल. तोपर्यंत आंदोलन स्थगित ठेवावे, असे आवाहन मंत्री सरनाईक यांनी केले.
शिरूर (ओमकार भोरडे): शेतात ट्रॅक्टर का घातला आणि मुलाला मारहाण का केली, याचा जाब विचारण्यासाठी…
शिरूर (ओमकार भोरडे): सामाईक इलेक्ट्रिक मोटार वापरण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून मोठ्या भावाने व भावजयाने लहान…
इन्स्टाग्रामवरून ओळख, लग्नाचे आमिष, धमक्या आणि पोक्सोसह गंभीर कलमांखाली शिक्रापूर पोलिसांत गुन्हा दाखल शिरूर (अरुणकुमार…
शिरूर : शिरूर तालुक्यातील वरुडे येथील रहिवासी व व्यवसायाने शेतकरी असलेले बाळासाहेब बबन तांबे यांचा…
मुंबई: राज्यभरात शिवसेनेच्या विस्ताराला वेग मिळत असल्याचे चित्र पुन्हा एकदा समोर आले असून यवतमाळ जिल्ह्यात…
शिरूर : शिरूर तालुक्यातील पिंपळे खालसा येथील प्रगतशील शेतकरी माऊली जगन्नाथ शेळेके (वय ६४) यांचे…