नागपूर: राज्यातील ऐतिहासिक व सांस्कृतिक गडकिल्ल्यांचे व पुरातत्व स्थळांच्या पावित्र्य भंगाच्या घटना समोर येतात . या ऐतिहासिक वास्तूंचे संरक्षण करण्यासाठी मुबलक प्रमाणात कर्मचारी व पावित्र्यभंग करणाऱ्यांवर कठोर शिक्षेची तरतूद करण्यात यावी, अशी मागणी आज विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुरातत्व शास्त्र विषयक स्थळे व अवशेष (सुधारणा) विधेयकावरील चर्चेदरम्यान सरकारकडे केली.
महाराष्ट्र प्राचीन स्मारके व पुरातत्व शास्त्र
विषयक स्थळे व अवशेष ( सुधारणा) विधेयक – २०२४ आणून शासनाने अत्यंत स्तुत्य काम केले आहे. सदरील विधेयक अत्यंत चांगले असले तरीही शिवकालीन व यादवकालीन अनेक गड किल्ल्यांवर मद्य सेवन व जुगार खेळले जातात. तरुण पिढीला या गडकिल्ल्यांचे पावित्र्य माहित नसते. त्यामुळे या गडकिल्ल्यांचे पावित्र्य राखले जावे, यासाठी कठोर शिक्षेची तरतूद करणे आवश्यक असल्याचे दानवे म्हणाले.
कल्याण: कल्याण रेल्वे स्थानक परिसरातील वाढती वाहतूक कोंडी कायमची सोडवण्यासाठी सॅटीस (SATIS) प्रकल्पाला गती देण्याचे…
मुंबई: महिला आरक्षणाच्या मुद्द्यावरून काँग्रेसने भाजपावर जोरदार टीका करत सरकारला थेट चर्चेचे आव्हान दिले आहे.…
सातारा: “मी उपमुख्यमंत्री म्हणून नाही, तर या मातीचा भूमिपुत्र म्हणून आलो आहे; जिथे कोणी जात…
मुंबई: महिला आरक्षण कायद्याच्या अंमलबजावणीवरून भाजपवर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार गट) चे प्रवक्ता ॲड.…
मुंबई: महाराष्ट्रात सुरू असलेल्या विशेष मतदार यादी पुनरिक्षण (Special Intensive Revision – SIR) प्रक्रियेच्या पार्श्वभूमीवर…
नागपूर: Vijay Wadettiwar यांनी पंतप्रधान Narendra Modi यांच्या कालच्या भाषणावर जोरदार टीका करत ते भाषण…