महाराष्ट्र

अजितदादा यांच्या निधनानंतर सुनेत्रा पवार यांची पहिली पोस्ट…

मुंबई: उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आकस्मिक निधनाने संपूर्ण राज्याला मोठा धक्का बसला आहे. मुंबईहून बारामतीकडे जात असताना बारामती विमानतळाजवळ त्यांच्या विमानाचा भीषण अपघात झाला. धावपट्टीच्या अगदी जवळ घडलेल्या या दुर्घटनेनंतर सुरुवातीला अजित पवार गंभीर जखमी असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र काही वेळातच त्यांच्या निधनाची अधिकृत माहिती समोर आली.

आजही अनेकांना ही घटना खरी वाटत नसून अजित पवार आपल्यात नाहीत, यावर विश्वास बसत नाही. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या प्रचारसभेसाठी ते बारामतीकडे रवाना झाले होते. अपघाताचे अनेक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाले असून, त्यात विमान हवेत असतानाच एका बाजूला कोलमडताना स्पष्टपणे दिसत आहे.

या प्रकरणाची गंभीर दखल घेत सीआयडीकडून सखोल चौकशी सुरू करण्यात आली आहे. अपघातासंदर्भात अजित पवार यांचे सचिव यांचीही चौकशी करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.

अजित पवार यांच्या निधनानंतर पवार कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्यानंतर सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, याच कालावधीत पवार कुटुंबातील अंतर्गत मतभेदही समोर आले.

ऐन जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर झालेल्या या घटनेमुळे राज्यातील राजकीय वातावरणावर मोठा परिणाम झाला. सर्वच राजकीय पक्षांनी प्रचारात संयम ठेवत जोरदार प्रचार टाळला. मतदान प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी जनतेचे आभार मानले.

सुनेत्रा पवार यांनी सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत म्हटले की,“जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक 2026 या लोकशाहीच्या उत्सवात उत्स्फूर्त सहभाग नोंदवत मतदानाचा हक्क बजावणाऱ्या सर्व मतदार बंधू-भगिनींचे मनःपूर्वक आभार.”

तसेच, “संपूर्ण निवडणूक प्रक्रियेदरम्यान राष्ट्रवादी परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलेला असताना, दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या दूरदृष्टीतील ग्रामीण महाराष्ट्राच्या विकासासाठी एकजुटीने काम करणाऱ्या पक्षाच्या सर्व नेते, पदाधिकारी, कार्यकर्ते व हितचिंतकांचे विशेष आभार,” असेही त्यांनी नमूद केले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एका मुलाखतीने बदलले आयुष्य; तांदळीतील आजोबांच्या मदतीला प्रशासन धावले

७५ वर्षीय केरबा खोरे यांच्या व्यथेला राज्यभरातून प्रतिसाद; तहसीलदार बाळासाहेब म्हस्के व आमदार माउली कटके…

2 तास ago

शिरुर; शेतकरी गोवंश कायद्याच्या कचाट्यात; तांदळीत तीन महिन्यांत 8 ते 10 बेवारस वासरांना सोडले रस्त्यावर

शिरुर (तेजस फडके) गोवंश संरक्षणाच्या उद्देशाने लागू करण्यात आलेल्या 'महाराष्ट्र पशु संरक्षण' कायद्याचा हेतू जरी…

4 तास ago

चासकमान कालव्याची गळती ‘हेड’ला, अस्तरीकरण ‘टेल’ला… उलट्या कारभाराविरोधात शेतकऱ्यांचा एल्गार

शिरुर (तेजस फडके): चासकमान डाव्या कालव्याच्या अस्तरीकरणाच्या मनमानी, विस्कळीत आणि शेतकरीविरोधी नियोजनाविरोधात आंबळे परिसरातील शेतकऱ्यांचा…

22 तास ago

नैसर्गिकरित्या मूड बदला

धावपळीच्या जीवनात आपण एकामागे एक सतत कामे करतो. मात्र हे आपल्यासाठी धोकादायक ठरू शकते. याचा…

1 दिवस ago

मणक्याचे दुखणे आणि पाठदुखी कारणे व कोणती काळजी घ्यावी

बहुतांश जणांची कामे ही सध्या बैठ्या स्वरूपाची असतात. विविध सरकारी कार्यालयात, बँकेत, आयटी मध्ये काम…

1 दिवस ago

शिरूर तालुक्यात घोड नदीकाठी शेतकऱ्यावर कुऱ्हाडीने जीवघेणा हल्ला; कायदा-सुव्यवस्थेचा उडाला पुन्हा बोजवारा…?

शिरूर (तेजस फडके): शिरूर तालुक्यातील निमोणे गावातील पिंपळाचीवाडी परिसरात घोड नदीच्या काठावर विद्युत मोटार सुरु…

1 दिवस ago