पिंपरी: पिंपरी चिंचवड शहरातील अनधिकृत शाळांच्या संचालकांवर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी रयत विद्यार्थी विचार मंच या संस्थेने पालिकेचे प्रशासक तथा आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे.
पालिकेच्या शिक्षण विभागाकडून दरवर्षी अनधिकृत शाळांचे सर्वेक्षण केले जाते. त्यानंतर, पालिकेकडून अनाधिकृत शाळा घोषित केल्या जातात. मात्र, या शाळांना नोटीस बजावणे, दंडात्मक कारवाई करणे, या शाळांमध्ये पाल्यांचा प्रवेश घेऊ नये, असे जाहीर करण्यापलिकडे शिक्षण विभागाने काहीही केले नाही.
अनधिकृत शाळांवर कोणतीही ठोस कारवाई होत नाही, याकडे संस्थेचे प्रदेश महासचिव संतोष शिंदे यांनी आयुक्तांचे पत्राद्वारे लक्ष वेधले. अनधिकृत शाळांचा कारभार पालिकेच्या शिक्षण विभागाच्या आशीर्वादाने सुरु आहे का, अशी शंकाही त्यांनी व्यक्त केली आहे. या प्रकरणाची गांभीर्याने दखल घ्यावी आणि अनाधिकृत शाळांवर कारवाई करावी, अशी मागणी संस्थेने केली आहे.
मुंबई: मंत्रालयातील पिण्याच्या पाण्याच्या टाकीमध्ये मांजर पडल्याच्या माहितीत तथ्थ नाही. पाण्याच्या टाक्यांवर लोखंडी झाकणे बसवलेली…
ठाणे: राज्याच्या राजकारणात एकनाथ शिंदे यांच्या भोवती वाढणारा जनाधार पुन्हा एकदा स्पष्ट झाला आहे. “अपॉइंटमेंटशिवाय…
मुंबई: मुंबई महानगरपालिकेच्या के-ईस्ट वॉर्डचे सहायक आयुक्त नितीन शुक्ला यांना एका महिलेला लग्नाचे आमिष दाखवून…
मुंबई: Dr. Shrikant Eknath Shinde यांनी अमेरिकेतील Harvard Kennedy School येथे आयोजित अभ्यासदौऱ्यात सहभागी होत…
अमरावती: राज्यातील प्रगत विकासाच्या दाव्यांना छेद देणारी धक्कादायक बाब समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यातील मेळघाट…
फोन आजकाल लोकांच्या जीवनाचा महत्वाचा भाग झाला आहे. फोन नसेल तर अनेकांची कामे रखडतात. सकाळी…