चेन्नईः भारतीय जनता पक्षाच्या तामिळनाडू युनिटने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त नवजात बालकांना सोन्याची अंगठी देण्याचा निर्णय घेतला आहे. चेन्नईतील RSRM या सरकारी रुग्णालयाची निवड केली आहे. येथे पंतप्रधान मोदींच्या जन्मदिनी जन्मणाऱ्या सर्व मुलांना सोन्याची अंगठी देण्यात येईल,’ असे मत्स्यव्यवसाय आणि माहिती व प्रसारण राज्यमंत्री एल मुरुगन यांनी म्हटले आहे.
प्रत्येक अंगठी ही सुमारे 2 ग्रॅमची असेल, तिची किंमत सुमारे 5000 रुपयांपर्यंत असू शकते. तसेच, ही मोफत वाटली जाणारी रेवाडी नाही. तर या माध्यमाने आम्ही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जन्मदिनी जन्मणाऱ्या बालकांचे स्वागत करणार आहोत, असे मुरुगन यांनी म्हटले आहे. या रुग्णालयात 17 सप्टेंबरला 10 ते 15 बालकांचा जन्म होऊ शकतो, असा भाजपच्या स्थानिक युनिटचा अंदाज आहे.
तामिळनाडूनत मोदींच्या वाढदिवसानिमित्त तब्बल 720 किलो मासेही वाटण्यात येणार आहेत. हे मासे वाटण्यासाठी मुख्यमंत्री एमके स्टॅलिन यांच्या मतदारसंघाची निवड करण्यात आली आहे. पंतप्रधान मत्स्य संपदा योजनेचा (PMMSY) उद्देश मत्स्य विक्रीस प्रोत्साहन देणे, असा आहे. यामुळे आम्ही हे पाऊल उचलत आहोत. आम्हाला माहित आहे, की पंतप्रधान मोदी हे शाकाहारी आहेत. तसेच, यावेळी ते 72 वर्षांचे होत आहेत. यामुळे आम्ही 720 हा आकडा निवडला आहे, असेही मत्स्यव्यवसाय मंत्री मुरुगन यांनी म्हटले आहे.
दरम्यान, पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त दिल्ली भाजप 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर दरम्यान ‘सेवा पंधरवाडा’ साजरा करणार आहे. यादरम्यान, आरोग्य तपासणी आणि रक्तदान शिबिरांसोबतच इतरही अनेक कार्यक्रम होणार आहेत.
पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...? …
शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…
नागपूर : नागपूर येथे आंदोलनादरम्यान युवक काँग्रेसचे अध्यक्ष शिवराज मोरे यांच्यावर झालेल्या हल्ल्याचे पडसाद उमटले…
मुंबई : महाराष्ट्रातील अभियांत्रिकी आणि पॉलिटेक्निक विद्यार्थ्यांची कौशल्य क्षमता, रोजगारक्षमता आणि उद्योगसज्जता वाढविण्यासाठी उद्योगाभिमुख प्रशिक्षण,…
मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ, लोणेरे (DBATU) अंतर्गत विद्यार्थ्यांच्या तक्रारी आणि शैक्षणिक समस्यांचे जलद,…
मुंबई: विद्यार्थ्यांच्या नवकल्पना, संशोधन आणि उद्योजकतेला व्यापक संधी उपलब्ध करून देत महाराष्ट्राची स्टार्टअप परिसंस्था अधिक सक्षम…