महाराष्ट्र

पुणे महापालिकेत भाजपचा एकतर्फी झंझावात; ११० जागांवर आघाडी

पुणे: पुणे महानगरपालिका निवडणुकीत भाजपने घवघवीत यश मिळवत शहराच्या राजकारणात वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. भाजप ११० जागांवर आघाडीवर असून, दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांना मिळून केवळ १७ जागांपर्यंत मजल मारता आली आहे. काँग्रेसने १२ जागांवर आघाडी घेतली असली तरी ठाकरे गटाची शिवसेना आणि शिंदे गटाची शिवसेना या दोन्ही पक्षांना खातेही उघडता आलेले नाही. मनसेलाही एकही जागा मिळालेली नाही. अंतिम निकाल रात्री उशिरापर्यंत स्पष्ट होणार आहेत.

दरम्यान, पुण्यात यंदाच्या निवडणुकीत एक अनोखा आणि चर्चेचा विजय पाहायला मिळाला आहे. भाजपकडून निवडणूक लढवणाऱ्या पती-पत्नीने विजय मिळवत राजकीय वर्तुळाचं लक्ष वेधून घेतलं आहे. सुरेंद्र पठारे यांनी प्रभाग क्रमांक ४ मधून, तर त्यांच्या पत्नी ऐश्वर्या पठारे यांनी प्रभाग क्रमांक ३ मधून विजय मिळवला आहे.

विजय जाहीर होताच सुरेंद्र पठारे यांनी पत्नीला उचलून घेत विजयाचा जल्लोष केला. भाजपकडून हे दाम्पत्य पहिल्यांदाच निवडणूक लढवत होते. विशेष म्हणजे सुरेंद्र पठारे हे राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे पुणे शहरातील एकमेव आमदार बापू पठारे यांचे सुपुत्र आहेत.

विजयी उमेदवारांची यादी

प्रभाग १

अ – अश्विनी राहुल भंडारे (भाजप)

ब – संगिता दांगट (भाजप)

क – रेखा चंद्रकांत टिंगरे (राष्ट्रवादी)

ड – अनिल वसंतराव टिंगरे (भाजप)

प्रभाग ३

अ – श्रेयस प्रितम खांदवे (भाजप)

ब – अनिल दिलीप सातव (भाजप)

क – ऐश्वर्या पठारे (भाजप)

ड – रामदास दाभाडे (भाजप)

प्रभाग ८

अ – परशुराम वाडेकर (भाजप)

ब – अजित गायकवाड (भाजप)

क – सपना छाजेड (भाजप)

ड – सनी उर्फ चंद्रशेखर निम्हण (भाजप)

पुण्यात नेमकं काय घडलं?

पुणे महापालिका निवडणुकीत सुरुवातीला चौरंगी लढत पाहायला मिळाली. भाजप, शिवसेना (शिंदे), राष्ट्रवादी (अजित पवार) आणि राष्ट्रवादी (शरद पवार) हे पक्ष स्वतंत्रपणे रिंगणात होते. तर दुसरीकडे ठाकरे गटाची शिवसेना, काँग्रेस आणि मनसे यांनी एकत्रितपणे निवडणूक लढवली होती. मात्र या तिन्ही पक्षांच्या आघाडीला पुण्यात एकही जागा जिंकता आलेली नाही.दुपारी ४ वाजेपर्यंतचे हे आकडे असून सायंकाळपर्यंत काही बदल होण्याची शक्यता असली, तरी पुणे महापालिकेत भाजप सत्ता स्थापन करेल, हे जवळपास स्पष्ट झालं आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

आमदार संजय गायकवाडांचे विधान विकृत; कारवाईस सरकार का घाबरते? हर्षवर्धन सपकाळ

मुंबई: शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांच्या वक्तव्यावरून राज्यातील राजकारण तापले असून, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे…

1 तास ago

हाच का डॉ. बाबासाहेब आंबेडकरांबद्दल भाजपचा आदर? अनंत गाडगीळ यांचा संतप्त सवाल

मुंबई: डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या मुंबईतील दादर येथील ऐतिहासिक ‘राजगृह’ परिसरातील परिस्थितीवरून काँग्रेसचे वरिष्ठ प्रवक्ते…

1 तास ago

मुंबईत 27-28 एप्रिलला आंतरराष्ट्रीय रिव्हर्स बायर-सेलर मीट; एमएसएमई उद्योगांना निर्यातीच्या नव्या संधी

मुंबई: महाराष्ट्र लघुउद्योग विकास महामंडळ मर्यादिततर्फे महाराष्ट्र शासनाच्या ‘रॅम्प’ (रायझिंग अँड ॲक्सेलेरेटिंग एमएसएमई परफॉर्मन्स) उपक्रमांतर्गत…

1 तास ago

शिरूर तालुक्यात अवैध दारूविरोधात पोलिसांची धडक मोहीम; विविध ठिकाणी छापे…

शिरूर : अवैध धंदे बंद करण्यासाठी व इतर मागण्यांसाठी शिरूरमध्ये निलेश वाळुंज यांचे सत्याग्रह आंदोलन…

2 तास ago

वरळीतील वाहतूक कोंडीतून संताप; मंत्री गिरीश महाजन यांना जाब विचारणाऱ्या महिलेविरुद्ध तक्रार

मुंबई: वरळी परिसरात भाजप महायुतीच्या मोर्चामुळे निर्माण झालेल्या प्रचंड वाहतूक कोंडीदरम्यान राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश…

23 तास ago

वडिलांच्या निधनानंतर मालमत्तेवर पहिला हक्क कुणाचा? जाणून घ्या कायदा काय सांगतो

मुंबई: कुटुंबातील वडिलांचे निधन झाल्यानंतर मालमत्तेच्या वाटणीचा प्रश्न अनेकदा गुंतागुंतीचा ठरतो. विशेषतः आई आणि मुलांमध्ये…

23 तास ago