महाराष्ट्र

सीमेवर लढणाऱ्या सैनिकांमुळेच आपण सुरक्षित; त्यांच्या कुटुंबांसाठी समाजाने ठोस पावले उचलावीत

वाल्हे: देशाच्या सीमेवर प्राणपणाने लढणाऱ्या प्रत्येक सैनिकामुळेच आज आपण सुरक्षित आहोत. त्यांच्या त्यागाची जाणीव ठेवून समाजाने सैनिकांसाठी व त्यांच्या कुटुंबीयांसाठी काहीतरी ठोस केले पाहिजे, असे भावनिक प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या सुमेधा योगेश चिथडे यांनी केले.

वाल्हे येथील महर्षी वाल्मीकी विद्यालयात विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना रुजविण्यासाठी आयोजित यशोगाथा व प्रेरणादायी मार्गदर्शन कार्यक्रमात त्या बोलत होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन ॲड. विद्या नामदेव भुजबळ यांच्या पुढाकारातून करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विद्यालयाचे प्राचार्य सतीश निगडे होते.

यावेळी सरपंच अतुल गायकवाड, सेवानिवृत्त कृषी अधिकारी सिद्राम भुजबळ, प्रा. नामदेव भुजबळ, बाळासाहेब राऊत, ज्योती एडके, माजी सरपंच विमल भुजबळ, अंकुश माळवदकर, रज्जाकभाई पानसरे, दामोदर पवार, साईनाथ चव्हाण, संजय ढावरे, सुचिता हिंगणे, सारिका बनकर आदी मान्यवर उपस्थित होते.

चिथडे यांनी आपल्या कार्याची माहिती देताना सांगितले की, १९९९ साली पती योगेश चिथडे यांच्या सहकार्याने *‘सोल्जर्स इंडिपेंडंट रिहॅबिलिटेशन फाउंडेशन’*ची स्थापना करण्यात आली. या संस्थेमार्फत हुतात्मा जवानांच्या कुटुंबीयांना आर्थिक, शैक्षणिक व मानसिक आधार देण्याबरोबरच वीरनारींना स्वावलंबी बनवण्यासाठी विविध उपक्रम राबविले जातात.

भारतीय सैनिकांसाठी राबविण्यात आलेल्या ठोस उपक्रमांविषयी बोलताना त्यांनी सांगितले की, सियाचिन, लेह, लडाख व जम्मू-काश्मीरसारख्या अतिदुर्गम भागात देशातील पहिला ऑक्सिजन निर्मिती प्रकल्प उभारण्यात आला आहे. कठीण हवामानात कार्यरत असलेल्या जवानांसाठी हे प्रकल्प मोठा आधार ठरत आहेत. हे कार्य म्हणजे सैनिकांप्रती कृतज्ञतेचे प्रतीक असल्याचे त्यांनी नमूद केले.

सैनिकांसाठी अखंड सेवाभाव जपणाऱ्या सुमेधा चिथडे यांच्या कार्याची ओळख विद्यार्थ्यांना व्हावी आणि त्यातून त्यांना प्रेरणा मिळावी, या हेतूनेच हा उपक्रम राबविण्यात आल्याचे ॲड. विद्या नामदेव भुजबळ यांनी सांगितले.

फाउंडेशनला भरभरून प्रतिसाद

कार्यक्रमानंतर महर्षी वाल्मीकी विद्यालय, ॲड. विद्या नामदेव भुजबळ, बाळासाहेब राऊत तसेच माजी विद्यार्थ्यांनी सोल्जर्स इंडिपेंडंट रिहॅबिलिटेशन फाउंडेशनला आर्थिक मदत दिली.कार्यक्रमाचे प्रास्ताविक पर्यवेक्षिका नाजमिन अत्तार यांनी केले. शैला गवारी यांनी सूत्रसंचालन केले, तर सुदामा गायकवाड यांनी आभार मानले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

कामगार दिन व महाराष्ट्र दिनानिमित्त कामगार प्रश्नांवर प्रकाश; नव्या कायद्यांमुळे संमिश्र चित्र

मुंबई: कामगार दिन आणि महाराष्ट्र दिनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील कामगारांच्या स्थितीवर पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली…

12 तास ago

महाविकास आघाडी एकसंघ; अंबादास दानवे यांना काँग्रेसचा ठाम पाठिंबा

मुंबई: आगामी राज्यसभा व विधान परिषद निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी (मविआ) घटक पक्षांमध्ये सकारात्मक व…

12 तास ago

शिरुर तालुक्यात बैलगाडा शर्यतीदरम्यान अपघात; निष्काळजीपणामुळे एकाचा मृत्यू…?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्यातील करंदी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैलगाडा शर्यतीदरम्यान झालेल्या अपघातात प्रकाश…

17 तास ago

शरीराचे अवयव व त्याला निष्काळजीपणामुळे होणारे आजार

१) पोट: केव्हा बिघाडते, जेव्हा तुम्ही सकाळी नाष्टा करत नाही. २) मूत्रपिंड: केव्हा बिघडतात जेव्हा…

1 दिवस ago

मुंबईच्या पवई–चांदिवली उद्यानांना ‘सुरक्षा कवच’; गैरप्रवृत्तींवर विशेष मोहीम राबवण्याचे निर्देश

मुंबई: मुंबईतील पवई व चांदिवली परिसरातील महानगरपालिका उद्यानांमध्ये अंमली पदार्थ सेवन आणि इतर गैरप्रवृत्तींना आळा…

1 दिवस ago

व्यावसायिक चालकांसाठी ‘व्यवहारिक मराठी’ अनिवार्य; न शिकणाऱ्यांवर कारवाईचा इशारा

मुंबई: महाराष्ट्रात प्रवासी वाहन चालवणाऱ्या प्रत्येक व्यावसायिक चालकाला ‘व्यवहारिक मराठी’ येणे बंधनकारक करण्याबाबत राज्य सरकार…

2 दिवस ago