पटना: ३०० किलो सोन्याच्या देशभरातील मोठ्या लूट प्रकरणांचा मास्टरमाइंड आणि कुख्यात गुन्हेगार प्रिंस कुमार उर्फ अभिजीत कुमार याचा पटना STF आणि वैशाली पोलिसांच्या संयुक्त कारवाईत एनकाउंटर झाला आहे. हाजीपूर सदर पोलीस ठाण्याच्या हनुमान नगर कॉलनीत शुक्रवारी (६ फेब्रुवारी २०२६) पहाटे ही चकमक झाली.एनकाउंटरनंतर सर्वाधिक खळबळ उडवणारी बाब म्हणजे मृतकाच्या वडिलांनीच पोलिसांच्या कारवाईचे उघड समर्थन केले आहे.
एनकाउंटरची थरारक घटना
गुप्त माहितीच्या आधारे प्रिंस कुमार हनुमान नगरमधील एका घरात लपून राहत असल्याचे पोलिसांना समजले. त्यानुसार पटना STF आणि वैशाली पोलिसांनी संयुक्त छापा टाकला.छाप्यादरम्यान प्रिंसने पोलिसांवर गोळीबार सुरू केला. पोलिसांनी प्रत्युत्तर दिल्यानंतर झालेल्या चकमकीत तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने हाजीपूर सदर रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.या कारवाईत प्रिंसचा एक साथीदार हत्यारांसह ताब्यात घेण्यात आला आहे.
वडिलांचे धक्कादायक विधान
मृतक प्रिंस कुमारचे वडील नंदकिशोर सिंह यांनी माध्यमांशी बोलताना स्पष्ट शब्दांत पोलिसांची बाजू घेतली.ते म्हणाले,“पोलिसांनी काहीही चुकीचे केले नाही. मी स्वतः नेहमीच पोलिसांना त्याचा एनकाउंटर करण्यास सांगत होतो. तो कुटुंबाशी संबंधित नव्हता, तो गुन्हेगार होता. पोलिसांची कारवाई १०० टक्के योग्य आहे.”एनकाउंटरनंतर त्यांनी पोलिसांचे आभारही मानले.
गुन्हेगारी इतिहास थरारक
वैशालीचे एसपी विक्रम सिहाग यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रिंस कुमार उर्फ अभिजीत कुमार हा वैशाली जिल्ह्यातील हुसैना (गोरौल पोलीस ठाणे हद्द) येथील रहिवासी होता.
तो बिहारातील कुख्यात सोनालूट करणारा गुन्हेगार सुबोध सिंहचा जवळचा सहकारी आणि शार्प शूटर होता.प्रिसवर चोरी, हत्या आणि आर्म्स अॅक्टसह ३० ते ४० हून अधिक गंभीर गुन्हे दाखल होते. त्याच्यावर २ लाख रुपयांचे इनाम जाहीर करण्यात आले होते.
फिल्मी स्टाइलमध्ये तुरुंगातून पलायन
२०१८ मध्ये हाजीपूर न्यायालयात एका पोलिस कर्मचाऱ्याची हत्या करून तो फरार झाला होता. नंतर तो बेऊर जेलमध्ये बंद होता.
२ सप्टेंबर २०२५ रोजी उपचाराच्या बहाण्याने PMCH (पटना मेडिकल कॉलेज हॉस्पिटल) येथे नेण्यात आले असताना, त्याने आठ पोलिस कर्मचाऱ्यांना ‘मटण पार्टी’ देऊन एका खोलीत कोंडले आणि फिल्मी स्टाइलमध्ये पलायन केले होते.
देशभरात ३०० किलो सोन्याची लूट
प्रिंस कुमार आणि सुबोध सिंह टोळीने देशातील अनेक राज्यांतून मोठ्या प्रमाणात सोन्याची लूट केली होती. प्रमुख घटना पुढीलप्रमाणे
२०१७: आसनसोल (पश्चिम बंगाल) – ५६ किलो सोनं
२०१९: हाजीपूर (बिहार) – ५५ किलो सोनं
२०२२: उदयपूर (राजस्थान) – २४ किलो सोनं
२०२२: कटनी (मध्य प्रदेश) – १६ किलो सोनं
२०२३: देहरादून – १८ किलो सोनं
पोलिसांचा मोठा दावा
पोलिसांनी या एनकाउंटरला मोठे यश मानले असून उर्वरित टोळी सदस्यांच्या शोधासाठी विशेष मोहीम सुरू करण्यात आली आहे. या कारवाईमुळे बिहार पोलिसांच्या गुन्हेगारीविरोधी लढ्याला नवे बळ मिळाल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे.
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…
मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…