बेंगळुरूच्या रमेश बाबूंची संघर्षातून शिखरापर्यंत झेप
मुंबई: “नशिबात काय आहे यापेक्षा मनगटात काय आहे, यावर यश ठरतं” हे बेंगळुरूचे उद्योजक रमेश बाबू यांनी प्रत्यक्षात सिद्ध करून दाखवलं आहे. एकेकाळी घरोघरी दूध आणि वर्तमानपत्रे वाटणारा हा मुलगा आज तब्बल ४०० पेक्षा अधिक लक्झरी गाड्यांचा मालक आहे. रोल्स रॉयसपासून मर्सिडीज मेबॅकपर्यंतच्या गाड्यांचा ताफा आणि सुमारे १२०० कोटी रुपयांची नेटवर्थ असा रमेश बाबू यांचा थक्क करणारा प्रवास आहे.
वयाच्या १३ व्या वर्षी खांद्यावर कुटुंबाची जबाबदारी
वडिलांच्या अकाली निधनानंतर रमेश बाबू यांच्या आयुष्यात संघर्षाची सुरुवात झाली. अवघ्या १३ व्या वर्षी त्यांनी कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी वर्तमानपत्र वाटणे, दूध विकणे आणि वडिलांचे छोटेसे सलून सांभाळणे अशी कामे केली. दिवसा कॉलेज आणि संध्याकाळी सलून, असा त्यांचा दिवस असायचा. कठीण परिस्थितीतही त्यांनी शिक्षण सोडले नाही आणि इलेक्ट्रॉनिक्समध्ये डिप्लोमा पूर्ण केला.
एका मारुती ओम्नीने बदललं आयुष्य
१९९३ साली साठवलेल्या पैशातून आणि चुलत्यांच्या मदतीने रमेश बाबू यांनी पहिली मारुती ओम्नी व्हॅन खरेदी केली. ही गाडी त्यांनी भाड्याने देण्यास सुरुवात केली आणि स्वतः ड्रायव्हर म्हणून काम केलं. याच काळात त्यांनी व्यवसायाची संधी ओळखली आणि “रमेश टूर्स अँड ट्रॅव्हल्स” या कंपनीची स्थापना केली.
लक्झरी कार बिझनेसचा गेमच बदलला
२००४ मध्ये त्यांनी धाडसी निर्णय घेत पहिली मर्सिडीज-बेंझ ई-क्लास खरेदी केली. कॉर्पोरेट कंपन्या आणि सेलिब्रिटींना प्रीमियम गाड्यांची मोठी गरज आहे, हे ओळखून त्यांनी लक्झरी सेगमेंटमध्ये गुंतवणूक वाढवली. आज त्यांच्या ताफ्यात रोल्स-रॉयस घोस्ट, मर्सिडीज मेबॅक, जग्वार, ऑडी, बीएमडब्ल्यू, तसेच विंटेज कार आणि मिनीबस मिळून ४०० हून अधिक वाहने आहेत.
कोट्यवधींची संपत्ती, तरीही साधेपणा कायम
इतकी अफाट संपत्ती असूनही रमेश बाबू आजही जमिनीवर पाय ठेवून आहेत. ते आजही नियमितपणे त्यांच्या जुन्या सलूनमध्ये जातात आणि अनेक जुन्या ग्राहकांचे स्वतः केस कापतात.“माझा भूतकाळ मला नेहमी संघर्षाची आठवण करून देतो आणि साधेपणा शिकवतो,” असं ते अभिमानाने सांगतात.रमेश बाबूंची ही कहाणी लाखो तरुणांसाठी प्रेरणादायी आहे.
शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…
मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…
मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…
मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…
शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…
मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…