महाराष्ट्र

राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात एक मोठा पक्ष आणि लोकांचा अधिक पाठिंबा असणारा पक्ष म्हणून पुढे येणार…

मुंबई: अलीकडे जे सर्व्हे छापून येत आहेत. त्या सर्व्हेमध्ये काही तथ्य दिसत नाही. कारण आमच्या पक्षानेदेखील खाजगी स्तरावर काही निवडक मतदारसंघाचा सर्व्हे केला आहे.

त्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस महाराष्ट्रात एक मोठा पक्ष आणि लोकांचा अधिक पाठिंबा असणारा पक्ष म्हणून पुढे येत आहे हाच निष्कर्ष आहे अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांची बैठक राष्ट्रवादी भवनमध्ये पार पडली. त्यानंतर जयंत पाटील यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

राष्ट्रवादीने केलेल्या सर्व्हेत महाविकास आघाडी आणि राष्ट्रवादी काँग्रेस हे अनेक मतदारसंघात अतिशय बळकट आहेत. मात्र काही असत्यावर आधारित सर्व्हेच्या बातम्या महाराष्ट्रात येत आहेत. त्यावेळी राष्ट्रवादीने केलेल्या काही मतदारसंघातील सर्व्हेची माहिती बैठकीत अवगत केल्याचेही जयंत पाटील यांनी स्पष्ट केले. कुठला आमदार येणार आणि कुठला आमदार येणार नाही अशी चर्चा आहे त्याच मतदारसंघातील सर्व्हेची माहिती आणि आपल्या आमदारांची काय स्थिती आहे ही माहितीही जयंत पाटील यांनी बैठकीत समोर ठेवली.

आम्ही २८८ जागांचा सर्व्हे केला नाही. आम्ही लढवू शकतो त्याच जागांचा सर्व्हे केला आहे. येवला, बारामती किंवा कराडचा सर्व्हे करण्याची आम्हाला आवश्यकता नाही. ज्याठिकाणी आवश्यकता आहे अशा निवडक ठिकाणी सर्व्हे केला असून त्याठिकाणी फार चांगली परिस्थिती आहे अशी माहितीही जयंत पाटील यांनी दिली. या बैठकीमध्ये राष्ट्रीय कार्याध्यक्षपदी निवड झालेले खासदार प्रफुल पटेल आणि खासदार सुप्रियाताई सुळे यांचा सत्कार करण्यात आला.

राज्यात दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊ शकते. पाऊस लांबला आहे. पेरण्या दुबार करण्याची वेळ येण्याची शक्यता आहे. पेरण्या करायच्या की नाही यादेखील समस्येत राज्यातील शेतकरी आहेत. पिण्याच्या पाण्याची समस्येने फार मोठे संकट निर्माण होणार आहे. या सगळ्या गोष्टींची चर्चा आणि वेगवेगळ्या भागाची चर्चा या बैठकीत करण्यात आली. शिवाय विधानसभा आणि विधानपरिषदेच्या आमदारांनी आपापली मतेही मांडली. याशिवाय अनेकांनी त्यांच्या भागातील प्रश्नही मांडले असेही जयंत पाटील यांनी सांगितले. संजय शिरसाटपेक्षा माझी जास्त विश्वासार्हता आहे. त्यांनी विचारलेल्या प्रश्नावर मला विचारता हे जास्तच झाले आहे असा टोला जयंत पाटील यांनी लगावला.

गद्दार दिवसाचे आंदोलन राष्ट्रवादी काँग्रेसने केले. युवक प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख व त्यांच्या सहकाऱ्यांनी आंदोलनाची तयारी केली होती. आंदोलन करण्यात येऊ नये म्हणून त्यांना पोलिसांनी सकाळीच ताब्यात घेतले. आता महाराष्ट्रात आंदोलन करायला परवानगी नाहीय. सरकार विरोधी कुणी बोलू नये, अशी मानसिकता ठेवून पोलिसांचा वापर आंदोलन चिरडण्यासाठी सर्रास सुरू आहे असा आरोपही जयंत पाटील यांनी केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नगरविकास विभागाने महिला सुरक्षेसाठी स्वतंत्र कार्यप्रणाली विकसित करावी;  डॉ. नीलम गोऱ्हे

मुंबई: राज्य शासनाच्या चौथ्या महिला धोरणाच्या अनुषंगाने महानगरपालिका क्षेत्रात महिला सुरक्षेसाठी अधिक प्रभावी उपाययोजना राबविण्याच्या…

4 तास ago

विधिमंडळाची अभ्यासक भेट ठरली विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी अनुभव

मुंबई: विधिमंडळाचे कामकाज प्रत्यक्ष अनुभवण्यासाठी नीता मुकेश अंबानी शाळेतील सुमारे ६० विद्यार्थ्यांनी विधानभवनाला दिलेली अभ्यासक…

4 तास ago

महिला आरक्षणावरून काँग्रेसवर शिंदेंचा हल्लाबोल

नवी दिल्ली: तब्बल ३० वर्षे रखडलेल्या महिला आरक्षण विधेयकाला काँग्रेसनेच विरोध केला होता, असा आरोप…

4 तास ago

ठाणे तिथे काय उणे! विकासाच्या वेगाने ठाणे ‘सुपर सिटी’कडे

इन्फ्रा, मेट्रो आणि परवडणाऱ्या घरांवर सरकारचा भर; ‘ठाणे पॅटर्न’ देशासाठी आदर्श – उपमुख्यमंत्री Eknath Shinde…

4 तास ago

मराठी भाषा सक्ती! नियम मोडणाऱ्या शाळांवर कठोर कारवाईचा इशारा

मुंबई: राज्यातील सर्व शाळांमध्ये इयत्ता पहिली ते दहावीपर्यंत मराठी भाषा अनिवार्य असतानाही काही शाळांकडून नियमांचे…

6 तास ago

देशात नारी शक्तीचा जयघोष की राजकारणाचा दिखावा?

नवी दिल्ली: देशात महिला सक्षमीकरण आणि ३३ टक्के आरक्षणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला असून, राजकीय…

6 तास ago