महाराष्ट्र

‘राजा प्रजेपर्यंत पोहोचला पाहिजे’; ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमातून सचिन अहिर यांचा संदेश

वरळीत ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर’चे उद्घाटन; ३९ विभागांच्या सहभागातून शेकडो नागरिकांना शासकीय योजनांचा लाभ

मुंबई: “रयतेचा राजा सिंहासनावर बसून चालणार नाही, तर राजा प्रजेपर्यंत पोहोचला पाहिजे, हीच शिकवण छत्रपती शिवाजी महाराजांनी दिली. त्याच विचारातून राज्य सरकार ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम प्रभावीपणे राबवत आहे,” असे विधान परिषदेचे उपसभापती सचिन अहिर यांनी सांगितले.

वरळी विधानसभा मतदारसंघात आयोजित ‘छत्रपती शिवाजी महाराजस्व समाधान शिबिर’ अभियानाच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि दिवंगत माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या जयंतीचे औचित्य साधून महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या संकल्पनेतून या शिबिराचे आयोजन करण्यात आले.

यावेळी मुंबई शहराच्या जिल्हाधिकारी आंचल गोयल, कोकण विभागीय आयुक्त रुबल अग्रवाल, सहायक आयुक्त स्वप्नजा क्षीरसागर, महेश हरीचंद्रे, शिवसेना विभागप्रमुख दत्ता नरवणकर, भाजपचे किरण शेलार, माजी नगरसेविका रत्ना माळी तसेच विविध विभागांचे अधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सचिन अहिर यांनी प्रशासनाने केवळ औपचारिकता म्हणून नव्हे, तर नागरिकांच्या प्रत्यक्ष गरजांनुसार अशा शिबिरांचे आयोजन करावे, जेणेकरून शासनाच्या योजनांचा लाभ समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचेल, असे आवाहन केले.या अभियानात प्रशासनातील ३९ विभागांनी सहभाग घेतला. शेकडो लाभार्थींना विविध शासकीय योजनांची प्रमाणपत्रे, दाखले आणि अन्य सेवा यावेळी उपलब्ध करून देण्यात आल्या.

दरम्यान, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या उपक्रमाचे कौतुक करत, “माझ्या वाढदिवसाचे औचित्य साधून सामाजिक उपक्रम राबवले जात असतील आणि त्यातून शेवटच्या घटकाची सेवा होत असेल, तर अशा उपक्रमांना माझा नेहमीच पाठिंबा असेल,” असा संदेश दिला.वरळीतील या शिबिरातून एकाच छताखाली विविध शासकीय सेवा उपलब्ध करून देत शासनाच्या लोकाभिमुख कार्यपद्धतीचा सकारात्मक संदेश देण्यात आला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

एमपीएससी विद्यार्थ्यांच्या स्वप्नांवर सरकारचा बुलडोझर; जीआर मागे घ्या, अन्यथा रस्त्यावर उतरू; अतुल लोंढे

सरळ सेवा भरतीचे प्रमाण कमी करून लाखो स्पर्धा परीक्षार्थींवर अन्याय; काँग्रेसचा सरकारला इशारा मुंबई: एमपीएससीमार्फत…

2 तास ago

पोटात होणाऱ्या या समस्येमुळे मेंदुवर पडतो वाईट प्रभाव, जाणून घ्या कसा कराल बचाव

अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, अनेक गंभीर आजारांची सुरूवात ही पोटापासूनच होते. त्यामुळेच पोटाचं आरोग्य…

3 तास ago

आल्याचा वापर करून शरीरातील Uric Acid करू शकता कमी

आजकाल शरीरात यूरिक अ‍ॅसिड वाढणं ही एक कॉमन समस्या झाली आहे. खाण्या पिण्याच्या चुकीच्या सवयी…

3 तास ago

बेलाचे सरबत आरोग्यासाठी फायदेशीर

पचन सुधारते: बेलाच्या सरबतात फायबर आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, ज्यामुळे पचन सुधारते आणि गॅस, अतिसार आणि…

3 तास ago

ठाण्यातील ९०० खाटांच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाचे काम फास्टट्रॅकवर पूर्ण करा; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई: ठाणे आणि पालघर जिल्ह्यातील नागरिकांना अत्याधुनिक आरोग्यसेवा उपलब्ध करून देण्यासाठी उभारण्यात येत असलेल्या ९००…

3 तास ago

अक्कलकोट श्री स्वामी समर्थ मंदिर परिसराच्या विकासाला गती; ५०० कोटींच्या आराखड्यासाठी म्हाडा विशेष नियोजन प्राधिकरण

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मान्यता; रस्ते, वाहनतळ, पालखी मार्ग आणि सार्वजनिक सुविधांचा होणार सर्वांगीण विकास…

3 तास ago