महाराष्ट्र

युवा पिढी बिघडलेली नाही; संवादाची भाषा बदलली; डॉ. नीलम गोऱ्हे

जनरेशन Z’ ला दोष नको; समजून घेणे गरजेचे; विश्वास नांगरे पाटील

नाशिक: चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनात “मराठी भाषेतील युवा वर्गाचा सहभाग” या विषयावर विशेष व्याख्यान सत्र उत्साहात पार पडले. या सत्रात विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनी युवा पिढीशी थेट संवाद साधत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास अॅड. नितीन ठाकरे, शामकांत देवरे (संचालक, राज्य मराठी विकास संस्था), नामदेव भोसले (सहसचिव, मराठी भाषा विभाग), संवादक अभिजीत ब्रह्मनाथकर आणि सूत्रसंचालक कीर्ती पेंढारकर उपस्थित होते. यावेळी डॉ. गोऱ्हे यांचा सत्कार किरण कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला.

संवादाची परिभाषा बदलली

डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले की आजची युवा पिढी बिघडलेली नसून तंत्रज्ञान आणि बदलत्या सामाजिक संदर्भांमुळे तिच्या संवादाची पद्धत बदलली आहे. भाषा काळानुसार बदलत असते; त्यामुळे शुद्धतेचा अति आग्रह धरण्यापेक्षा भावार्थ समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले.

मोबाईल हे वरदान असले तरी त्याचा अतिरेक घातक ठरू शकतो. युवकांनी कोणती माहिती स्वीकारायची आणि कोणती नाकारायची याचा सजग निर्णय घ्यायला हवा. “मिसळ चालेल, पण भेसळ नको,” असे सांगत त्यांनी सांस्कृतिक मूल्यांची जपणूक करण्याचे आवाहन केले.

एकत्रित कुटुंब पद्धती कमी होत असल्याने पालक-मुलांमधील संवाद घटत आहे. अभ्यासासोबत क्लासेसचा ताण, घरातील लोकशाहीचा अभाव आणि निर्णयस्वातंत्र्याची कमतरता या बाबी चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले. अति लाड आणि अवास्तव अपेक्षा यामुळे नैराश्य वाढू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘जनरेशन Z’ क्रिएटिव्ह आणि इनोव्हेटिव्ह

विश्वास नांगरे पाटील यांनी ‘जनरेशन Z’ ला दोष देण्याऐवजी समजून घेण्याची गरज व्यक्त केली. आजची पिढी टेक्नोसॅव्ही, क्रिएटिव्ह आणि इनोव्हेटिव्ह असून समाजातील बदलांचे प्रतिबिंब तिच्या वर्तनात दिसते, असे त्यांनी सांगितले.

प्रशासनात मराठी भाषेचा वापर वाढत असल्याचे नमूद करत त्यांनी पोलीस दलाचा संदेश हा केवळ शक्तीचा नसून शिस्त आणि मूल्यांचा असल्याचे अधोरेखित केले. युवकांनी शरीर आणि मन दोन्ही सुदृढ ठेवावे. “शब्दांमधून विचार, विचारांतून कृती आणि कृतीतून चारित्र्य घडते,” असा संदेश त्यांनी दिला.

परिसंवादातून युवा पिढीची बौद्धिक आणि श्रमशक्ती ही भारताची ताकद असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. मराठी भाषा आणि संस्कृती जागतिक स्तरावर समर्थपणे पुढे नेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

Video: शिरूर तालुक्यातील शिंदोडी येथे बाहेरचे गुंड आणून दहशत करत फोडले जेसीबी मशिन

शिरुर (तेजस फडके): शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील शिंदोडी गावात घोड नदीलगत असणाऱ्या शेतात काळी माती…

2 तास ago

राष्ट्रीय सुगी पश्चात तंत्रज्ञान संस्थेत ॲग्रीबिझनेस अभ्यासक्रम सुरु; पणन मंत्री जयकुमार रावल

मुंबई: सहकार, पणन आणि कृषी व्यवसाय क्षेत्रासाठी प्रशिक्षित व सक्षम मनुष्यबळ तयार करण्याच्या दृष्टीने पुणे…

8 तास ago

कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारकडून वाटाण्याच्या अक्षता

मुंबई: कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना भाजपा महायुती सरकारने वाऱ्यावर सोडले असून त्यांना काहीही…

8 तास ago

शासकीय निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ; मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले

मुंबई: राज्यातील शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी बांधण्यात येणाऱ्या निवासस्थानांच्या चटई क्षेत्रफळात वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय…

8 तास ago

शिरूर शहरात वाढत्या गुन्हेगारीविरोधात सत्याग्रह आंदोलन सुरू

शिरूर (अरुणकुमार मोटे): शिरूर शहर व परिसरात दिवसेंदिवस वाढत चाललेल्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर अखेर नागरिकांच्या सुरक्षिततेचा…

8 तास ago

एसटीचा तोटा कमी करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याचे निर्देश; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई: (१५ एप्रिल) सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) आर्थिक…

1 दिवस ago