महाराष्ट्र

युवा पिढी बिघडलेली नाही; संवादाची भाषा बदलली; डॉ. नीलम गोऱ्हे

जनरेशन Z’ ला दोष नको; समजून घेणे गरजेचे; विश्वास नांगरे पाटील

नाशिक: चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनात “मराठी भाषेतील युवा वर्गाचा सहभाग” या विषयावर विशेष व्याख्यान सत्र उत्साहात पार पडले. या सत्रात विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनी युवा पिढीशी थेट संवाद साधत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास अॅड. नितीन ठाकरे, शामकांत देवरे (संचालक, राज्य मराठी विकास संस्था), नामदेव भोसले (सहसचिव, मराठी भाषा विभाग), संवादक अभिजीत ब्रह्मनाथकर आणि सूत्रसंचालक कीर्ती पेंढारकर उपस्थित होते. यावेळी डॉ. गोऱ्हे यांचा सत्कार किरण कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला.

संवादाची परिभाषा बदलली

डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले की आजची युवा पिढी बिघडलेली नसून तंत्रज्ञान आणि बदलत्या सामाजिक संदर्भांमुळे तिच्या संवादाची पद्धत बदलली आहे. भाषा काळानुसार बदलत असते; त्यामुळे शुद्धतेचा अति आग्रह धरण्यापेक्षा भावार्थ समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले.

मोबाईल हे वरदान असले तरी त्याचा अतिरेक घातक ठरू शकतो. युवकांनी कोणती माहिती स्वीकारायची आणि कोणती नाकारायची याचा सजग निर्णय घ्यायला हवा. “मिसळ चालेल, पण भेसळ नको,” असे सांगत त्यांनी सांस्कृतिक मूल्यांची जपणूक करण्याचे आवाहन केले.

एकत्रित कुटुंब पद्धती कमी होत असल्याने पालक-मुलांमधील संवाद घटत आहे. अभ्यासासोबत क्लासेसचा ताण, घरातील लोकशाहीचा अभाव आणि निर्णयस्वातंत्र्याची कमतरता या बाबी चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले. अति लाड आणि अवास्तव अपेक्षा यामुळे नैराश्य वाढू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘जनरेशन Z’ क्रिएटिव्ह आणि इनोव्हेटिव्ह

विश्वास नांगरे पाटील यांनी ‘जनरेशन Z’ ला दोष देण्याऐवजी समजून घेण्याची गरज व्यक्त केली. आजची पिढी टेक्नोसॅव्ही, क्रिएटिव्ह आणि इनोव्हेटिव्ह असून समाजातील बदलांचे प्रतिबिंब तिच्या वर्तनात दिसते, असे त्यांनी सांगितले.

प्रशासनात मराठी भाषेचा वापर वाढत असल्याचे नमूद करत त्यांनी पोलीस दलाचा संदेश हा केवळ शक्तीचा नसून शिस्त आणि मूल्यांचा असल्याचे अधोरेखित केले. युवकांनी शरीर आणि मन दोन्ही सुदृढ ठेवावे. “शब्दांमधून विचार, विचारांतून कृती आणि कृतीतून चारित्र्य घडते,” असा संदेश त्यांनी दिला.

परिसंवादातून युवा पिढीची बौद्धिक आणि श्रमशक्ती ही भारताची ताकद असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. मराठी भाषा आणि संस्कृती जागतिक स्तरावर समर्थपणे पुढे नेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

शिरुर पोलिसांची तत्परता; हरवलेली वृद्धाची बॅग एका तासात शोधून केली स्वाधीन

शिरुर (तेजस फडके) एका वृद्ध व्यक्तीची हरवलेली बॅग तत्परतेने शोधून अवघ्या एका तासात संबंधित व्यक्तीच्या…

14 तास ago

फडणवीसांइतकेच विलासराव देशमुखही माझे आवडते मुख्यमंत्री; मुरलीधर मोहोळांचं मोठं वक्तव्य

पुणे : काँग्रेसचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री विलासराव देशमुख हे देवेंद्र फडणवीस यांच्याइतकेच…

18 तास ago

शेरखान शेख यांनी लिहिलेल्या ‘अनुभवांच्या पाऊलखुणा’ पुस्तकाचे प्रकाशन!

शिक्रापूर : शिक्रापूर (ता. शिरूर) येथील पत्रकार, सामाजिक कार्यकर्ते व प्राणीमित्र शेरखान शेख यांनी त्यांच्या…

20 तास ago

शिरूर तालुक्यातील भीमा नदीच्या पात्रात हात-पाय दोरीने घट्ट बांधलेला मृतदेह आला समोर…

शिरूर : शिरूर तालुक्यातील टाकळी भीमा हद्दीतील भीमा नदीच्या पात्रात थरारक गुन्ह्याची उकल करणारी घटना…

22 तास ago

अंडी-चिकन सोडा ‘हे’ 5 प्रोटीनयुक्त शाकाहारी पदार्थ खा, पिळदार शरीर बनवा

आजकाल लोक फिटनेस आणि स्नायूंची ताकद वाढवण्यासाठी अनेकदा अंडी आणि चिकनचे सेवन करतात, परंतु त्याऐवजी…

1 दिवस ago

नाकातून भळाभळा रक्त आलं तर काय कराल? घाबरुन न जाता, तातडीने करा ‘हे’ उपाय

जसजसं तापमान वाढत जातं आरोग्यासंबंधी वेगवेगळ्या समस्या डोकं वर काढणं सुरू करतात. कमजोरी, थकवा, डिहायड्रेशन,…

1 दिवस ago