महाराष्ट्र

युवा पिढी बिघडलेली नाही; संवादाची भाषा बदलली; डॉ. नीलम गोऱ्हे

जनरेशन Z’ ला दोष नको; समजून घेणे गरजेचे; विश्वास नांगरे पाटील

नाशिक: चौथ्या विश्व मराठी साहित्य संमेलनात “मराठी भाषेतील युवा वर्गाचा सहभाग” या विषयावर विशेष व्याख्यान सत्र उत्साहात पार पडले. या सत्रात विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे आणि अतिरिक्त पोलीस महासंचालक विश्वास नांगरे पाटील यांनी युवा पिढीशी थेट संवाद साधत मार्गदर्शन केले.

कार्यक्रमास अॅड. नितीन ठाकरे, शामकांत देवरे (संचालक, राज्य मराठी विकास संस्था), नामदेव भोसले (सहसचिव, मराठी भाषा विभाग), संवादक अभिजीत ब्रह्मनाथकर आणि सूत्रसंचालक कीर्ती पेंढारकर उपस्थित होते. यावेळी डॉ. गोऱ्हे यांचा सत्कार किरण कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आला.

संवादाची परिभाषा बदलली

डॉ. गोऱ्हे यांनी स्पष्ट केले की आजची युवा पिढी बिघडलेली नसून तंत्रज्ञान आणि बदलत्या सामाजिक संदर्भांमुळे तिच्या संवादाची पद्धत बदलली आहे. भाषा काळानुसार बदलत असते; त्यामुळे शुद्धतेचा अति आग्रह धरण्यापेक्षा भावार्थ समजून घेणे अधिक महत्त्वाचे आहे, असे त्यांनी सांगितले.

मोबाईल हे वरदान असले तरी त्याचा अतिरेक घातक ठरू शकतो. युवकांनी कोणती माहिती स्वीकारायची आणि कोणती नाकारायची याचा सजग निर्णय घ्यायला हवा. “मिसळ चालेल, पण भेसळ नको,” असे सांगत त्यांनी सांस्कृतिक मूल्यांची जपणूक करण्याचे आवाहन केले.

एकत्रित कुटुंब पद्धती कमी होत असल्याने पालक-मुलांमधील संवाद घटत आहे. अभ्यासासोबत क्लासेसचा ताण, घरातील लोकशाहीचा अभाव आणि निर्णयस्वातंत्र्याची कमतरता या बाबी चिंताजनक असल्याचे त्यांनी नमूद केले. अति लाड आणि अवास्तव अपेक्षा यामुळे नैराश्य वाढू शकते, असेही त्यांनी स्पष्ट केले.

‘जनरेशन Z’ क्रिएटिव्ह आणि इनोव्हेटिव्ह

विश्वास नांगरे पाटील यांनी ‘जनरेशन Z’ ला दोष देण्याऐवजी समजून घेण्याची गरज व्यक्त केली. आजची पिढी टेक्नोसॅव्ही, क्रिएटिव्ह आणि इनोव्हेटिव्ह असून समाजातील बदलांचे प्रतिबिंब तिच्या वर्तनात दिसते, असे त्यांनी सांगितले.

प्रशासनात मराठी भाषेचा वापर वाढत असल्याचे नमूद करत त्यांनी पोलीस दलाचा संदेश हा केवळ शक्तीचा नसून शिस्त आणि मूल्यांचा असल्याचे अधोरेखित केले. युवकांनी शरीर आणि मन दोन्ही सुदृढ ठेवावे. “शब्दांमधून विचार, विचारांतून कृती आणि कृतीतून चारित्र्य घडते,” असा संदेश त्यांनी दिला.

परिसंवादातून युवा पिढीची बौद्धिक आणि श्रमशक्ती ही भारताची ताकद असल्याचे मत व्यक्त करण्यात आले. मराठी भाषा आणि संस्कृती जागतिक स्तरावर समर्थपणे पुढे नेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

जनतेच्या विश्वासाचा बुलंद कौल; विकासाच्या राजकारणावर एकनाथ शिंदेंची मजबूत छाप

मुंबई: लोकशाहीमध्ये कोणत्याही नेत्याची खरी ओळख सत्ता किंवा पदावरून नव्हे, तर जनतेच्या विश्वासावरून ठरते. हा…

8 तास ago

वडगाव रासाई येथे पाटबंधारे विभागाचा कालवा फोडला; अनधिकृत सायपनद्वारे पाणी वळवल्याचा आरोप

सार्वजनिक मालमत्तेचे १ लाख ३१ हजार ७५० रुपयांचे नुकसान; एकाविरुद्ध शिरूर पोलिस ठाण्यात गुन्हा शिरुर…

8 तास ago

शालार्थ घोटाळ्यात मोठे रॅकेट उघड; शिक्षकांकडून 20 लाख, पगारातील अर्धी रक्कमही वसूल

बोगस विद्यार्थी, बनावट शिक्षक मंजुरी, कोरे धनादेश आणि स्टॅम्प पेपर जप्त; मालेगाव-पुण्यापर्यंत तपासाचे धागेदोरे परभणी:…

1 दिवस ago

दुधातील भेसळ कशी ओळखाल? तुकाराम मुंढेंचा नागरिकांना महत्त्वाचा सल्ला

मुंबई: राज्यात दुधातील भेसळीच्या वाढत्या प्रकारांमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. अन्न व औषध…

1 दिवस ago

भारत-यूके मुक्त व्यापार करारामुळे महाराष्ट्रासाठी जागतिक बाजारपेठेची दारे खुली; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई: भारत आणि युनायटेड किंगडम (यूके) यांच्यातील व्यापक आर्थिक व व्यापार करार (FTA) अंमलात आल्याने…

1 दिवस ago

₹2.93 कोटींच्या संशयित खाद्यतेलावर FDA चा छापा; छ. संभाजीनगरातील 2 कंपन्यांचे परवाने निलंबित

छत्रपती संभाजीनगर : 'सेफ फूड – सेफ महाराष्ट्र' मोहिमेअंतर्गत अन्न व औषध प्रशासन (FDA) ने…

1 दिवस ago