महाराष्ट्र

…तर भारताचं मोठं नुकसान झालं असत

मुंबई: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संसदेत ऑपरेशन सिंदूरबाबत महत्त्वाची माहिती दिली. पहलगामवर हल्ला झाल्यानंतर नेमकं काय घडलं? भारताने ऑपरेशन सिंदूर कसं पार पाडलं गेलं याबाबत सांगितलं. तसेच नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणामध्ये पाकिस्तानच्या एका मोठ्या हल्ल्याबाबत सांगितले आहे. पाकिस्तानने तब्बल 1000 मिसाईल्स आणि ड्रोनद्वारे भारतावर हल्ला केला होता, असे मोदींनी सांगितले.

भारतावर मोठा हल्ला करण्याचा प्रयत्न केला

पाकिस्तानच्या या मिसाईल्स आणि ड्रोन भारताच्या कोणत्याही भागात पडले असते तर मोठा विध्वंस झाला असता असेही मोदी यांनी सांगितले. भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमने पाकिस्तानच्या मिसाईल आणि ड्रोन्सना नेस्तनाबूत केले. मी आज एक आकडा सांगणार आहे. हा आकडा ऐकून संपूर्ण देशाचा उर गर्वाने भरून येईल. 9 मे रोजी पाकिस्तानने जवळजवळ 1000 मिसाईल्स आणि ड्रोन्सच्या मदतीने भारतावर मोठा हल्ला करण्याचा प्रयत्न केला, अशी माहिती मोदींनी संसदेत दिली.

भारताने पाकिस्तानचे हल्ले हाणून पाडले

तसेच, या मिसाईल्स भारताच्या कोणत्याही भगावर पडल्या असत्या तर तिथे मोठा विध्वंस झाला असता. पण या 1000 मिसाईल्स आणि ड्रोन्सना भारताच्या एअर डिफेन्स सिस्टिमने आकाशातच हाणून पाडले, असंही मोदी यांनी आपल्या भाषणात सांगितलं.

तेव्हा पाकिस्तानला अक्कल आली

पाकिस्तानने आदमपूर एअरबेसवर हल्ला झाल्याची खोटी माहिती पसवरली गेली. मी दुसऱ्या दिवशीच आदमपूरला गेलो आणि पाकिस्तानचं खोटं उघडं पाडलं. तेव्हा पाकिस्तानला अक्कल आली. राजकारणात काही नवे पक्ष आहेत, त्यांना सत्तेचा अनुभव नाही. त्यांच्याकडून काही गोष्टी घडल्या तर समजू शकतो. पण काँग्रेसने सत्ता भोगली आहे. त्यांना शासनव्यवस्था माहीत आहे. त्यांना अनुभव आहे. तरीही परराष्ट्र मंत्र्यांनी उत्तर दिलं तरी त्याला स्वीकारत नाही, गृहमंत्री बोलले, संरक्षण मंत्री बोलले त्यांच्यावर विश्वास नाही, असा हल्लाबोल मोदींनी काँग्रेसवर केला.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

नारळ पाणी पिण्याचे अनेक फायदे असूनही काही लोकांसाठी ठरतं घातक

हेल्दी ड्रिंक्सचा विषय निघतो तेव्हा नारळ पाण्याचं नाव सगळ्यात वर येतं. नारळ पाणी हे शरीरासाठी…

7 तास ago

आंबट ढेकर, पोटदुखीपासून आराम मिळवण्यासाठी घरगुती उपाय

कधीकधी अपचनामुळे पोट जड होऊन वेदनाही होतात. अस्वस्थता, जळजळ आणि मळमळ असा त्रासही होतो. तर…

7 तास ago

आजारी पडण्यापुर्वी पुढील गोष्टी फक्त आयुर्वेदच करु शकतो

1) कॅन्सर होण्याची भीती वाटते.-नियमित कडीपत्त्याचा रस प्या. 2) हार्ट अँटॅकची भीती वाटते - नियमित…

7 तास ago

7 तारखेपर्यंत पगार अनिवार्य; नोकरी सोडल्यानंतर 2 दिवसांत Full & Final, नवीन कामगार नियमांची माहिती

मुंबई : कर्मचाऱ्यांना वेळेवर वेतन मिळावे आणि नोकरी सोडल्यानंतर देय रक्कम मिळण्यासाठी होणारा विलंब टाळावा,…

7 तास ago

प्रदीप कबरे यांच्या ‘खिडकी’ अभिवाचनाचा विशेष प्रयोग ३० जुलैला दादरच्या शिवाजी मंदिरात

मुंबई: प्रसिद्ध नाटककार प्रदीप कबरे यांच्या सिद्धहस्त लेखणीतून साकारलेल्या 'खिडकी' या पुस्तकातील निवडक अनुभवांवर आधारित…

7 तास ago

अपघातग्रस्त तरुणीला सुनेत्रा पवार यांची तात्काळ मदत; रुग्णालयात दाखल करून उपचाराची केली व्यवस्था

बारामतीत विकासकामांच्या पाहणीदरम्यान थांबवला ताफा; जखमी तरुणीच्या उपचारासाठी अधिकाऱ्यांना तातडीच्या सूचना बारामती: उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित…

7 तास ago