महाराष्ट्र

जनतेच्या जमिनीवर कर्ज नाही, पण सत्ताधाऱ्यांच्या नात्यात विकास?

१५ एकरांवर १०० कोटींचं कर्ज? रनाळा ‘गुप्त स्मार्ट सिटी’ झाली आहे का

नागपूर: महाराष्ट्रात विकासाची गंगा वाहतेय, असं सत्ताधारी वारंवार सांगतात. मात्र ही गंगा नेमकी कुणासाठी आणि कुठे वाहतेय, यावर आता गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत. नागपूर जिल्ह्यातील कामठी तालुक्यातील रनाळा गावातील १५ एकर जमिनीवर तब्बल १०० कोटी रुपयांचं कर्ज मिळाल्याची चर्चा सध्या राजकीय आणि शेतकरी वर्तुळात खळबळ उडवणारी ठरते आहे.

रनाळा हे पावसावर अवलंबून असलेलं साधंसं गाव. येथे ना मोठे औद्योगिक प्रकल्प, ना मेट्रो, ना मॉल्स. अशा परिस्थितीत इतक्या मोठ्या रकमेचं कर्ज नेमकं कोणत्या निकषांवर मंजूर झालं, हा प्रश्न उपस्थित केला जात आहे.

सातबारा नोंदीत अनेक नावे, नातेसंबंधांची चर्चा

सर्वे नंबर १२९/१/१ अंतर्गत परिणय रमेश फुके, परिणीता परिणय फुके, प्रशांत नागोराव साबळे, पंकज नागोराव साबळे, विमल नागोराव साबळे, वैशाली रमेश चोपडे आणि सुवर्णा प्रशांत साबळे अशी नावे नोंद असल्याची माहिती समोर येते. ही सर्व नावे कागदोपत्री वेगळी असली तरी परस्पर नातेसंबंध असल्याची चर्चा आहे.

शेतकऱ्यांना कर्जासाठी संघर्ष, इथे कोट्यवधी सहज?

एकीकडे सामान्य शेतकऱ्याला दहा हजार रुपयांच्या पीक कर्जासाठी तहसील, बँक, सोसायटी यांचे फेरे मारावे लागतात. पंचनामे, हमीदार, विलंब — आणि शेवटी “उद्या या” हेच उत्तर मिळते.दुसरीकडे मात्र NA झालेल्या १५ एकर जमिनीवर १०० कोटींचं कर्ज सहज मिळत असेल, तर बँकांच्या कर्ज धोरणांवर प्रश्नचिन्ह उभं राहतं.बँकांना शेतकऱ्याच्या जमिनीत धोका, पण सत्ताधाऱ्यांच्या नात्यात विकास?या संपूर्ण प्रकरणात कुणालाही दोषी ठरवण्याचा उद्देश नसला तरी प्रश्न विचारणं हा अजूनही गुन्हा नाही, असं नागरिकांचं म्हणणं आहे. बँकांना सामान्य शेतकऱ्याच्या जमिनीत जोखीम दिसते, पण सत्ताधाऱ्यांशी संबंधित व्यवहारांमध्ये विकास दिसतो का, असा थेट सवाल उपस्थित केला जात आहे.

चौकशी होणार का? की प्रकरण दुर्लक्षित राहणार?

नेहमी विरोधकांवर चौकशी यंत्रणा सक्रिय होतात. मात्र आता प्रश्न सत्तेच्या अंगणात उभा आहे. मुख्यमंत्री या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी करणार का, की हे प्रकरणही कागदापुरतंच राहणार, याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे.

निष्कर्ष नाही, पण प्रश्न महत्त्वाचे

हा विषय कोणताही निकाल देत नाही, मात्र आरसा नक्की दाखवतो.१५ एकर जमीन + NA दर्जा + १०० कोटींचं कर्ज = नेमकं गणित काय?आज हा प्रश्न शेतकरी विचारतोय, उद्या संपूर्ण महाराष्ट्र विचारेल.लोकशाहीत सत्ता प्रश्नांना उत्तर देणारी असावी, प्रश्नांपासून पळणारी नाही, अशी भावना आता अधिक तीव्र होत आहे.

शिरूर तालुका टीम

Recent Posts

लंडनच्या तीन पुरस्कारांचा सन्मान अन् मुंबईत शिवसैनिकांचा जल्लोष

मुंबई: लंडनमध्ये लीडरशिप अवॉर्ड, स्टेट्समनशिप अवॉर्ड आणि महाराष्ट्र ग्लोबल अवॉर्ड अशा तीन पुरस्कारांनी गौरविल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ…

1 दिवस ago

महाराष्ट्रातील आरोग्य, पर्यावरण आणि सामाजिक विकास प्रकल्पांना सरकारचे पाठबळ

मुंबई: आगा खान डेव्हलपमेंट नेटवर्कच्या माध्यमातून महाराष्ट्रात राबविण्यात येत असलेल्या आरोग्य, शिक्षण, आदिवासी विकास, कौशल्यविकास,…

1 दिवस ago

हाऊस ऑफ कॉमन्समध्ये सोहळा, पण पुरस्कार ब्रिटिश संसदेचा नाही! ‘वर्ल्ड लीडरशिप’ची खरी कुंडली कोण उघडणार?

एकनाथ शिंदेंच्या ‘Statesmanship Award’भोवती पारदर्शकतेचे सवाल; जुनी संस्था आणि २०२४ मध्ये स्थापन झालेल्या नव्या कंपनीत…

1 दिवस ago

घोड धरणाची मालकी नक्की कुणाची…? पाटबंधारे विभाग की वाळु माफिया…? पाटबंधारे विभागाच्या पत्रानंतरही कारवाईचे घोडे अडले कुठे….?

शिरुर (तेजस फडके) शिरुर तालुक्याच्या पुर्व भागातील चिंचणी येथील घोड धरणातुन गेल्या चार ते पाच…

2 दिवस ago

घोड धरण लुटले जात असताना प्रशासन झोपेत…? दिवसाढवळ्या बेसुमार वाळू उपसा सुरुच

पाटबंधारे विभाग म्हणतो महिनाभरापूर्वीच नावासह यादी पोलिसांना दिली; मग शिरुर पोलिसांच्या कारवाईला मुहूर्त कधी...?  …

2 दिवस ago

शिष्यवृत्ती परीक्षा व स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात शिरूर तालुका अग्रणी…

शिरूर : पुणे जिल्हा परिषदेच्या मॉडेल स्कूल, गुणवत्ता विकास कार्यक्रम, विद्यार्थ्यांच्या राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय क्षेत्रभेटी…

3 दिवस ago