CREATOR: gd-jpeg v1.0 (using IJG JPEG v62), quality = 75?
मुंबई : टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहनांच्या किमतीत पुन्हा एकदा वाढ होणार आहे. पेट्रोल-डिझेलसोबतच इलेक्ट्रिक वाहनांच्या किमतीही वाढवण्याचा निर्णय कंपनीने घेतला आहे. ही दरवाढ येत्या १ सप्टेंबर २०२६पासून लागू होणार असून, विविध मॉडेल्सच्या किमतीत २५ हजार रुपयांपर्यंत वाढ होण्याची शक्यता आहे.
कंपनीने दिलेल्या माहितीनुसार, वाढता उत्पादन खर्च आणि महागाईचा सातत्याने असलेला दबाव यामुळे दरवाढीचा निर्णय घेण्यात आला आहे. मात्र, वाढलेल्या खर्चाचा संपूर्ण भार ग्राहकांवर टाकला जाणार नसून, त्यातील काही हिस्सा कंपनी स्वतः उचलणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
वाढत्या कच्च्या मालाच्या किमतींचा दबाव
टाटा मोटर्स पॅसेंजर व्हेइकल्सचे व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी शैलेश चंद्र यांनी वाहन उद्योगासमोरील आव्हानांवर भाष्य केले. कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने उद्योगासाठी चालू वर्षाची पहिली सहामाही आव्हानात्मक ठरत असल्याचे त्यांनी सांगितले.
कच्च्या मालाच्या किमती वाढल्यानंतर कंपन्या तातडीने त्याचा संपूर्ण भार ग्राहकांवर टाकत नाहीत. सुरुवातीला अंतर्गत खर्च कमी करण्याचा प्रयत्न केला जातो. मात्र, खर्चाचा दबाव कायम राहिल्यास टप्प्याटप्प्याने दरवाढ करण्याचा निर्णय घेतला जातो, असे कंपनीकडून स्पष्ट करण्यात आले.
२०२६ मधील टाटाची तिसरी दरवाढ
विशेष म्हणजे, २०२६ मध्ये टाटा मोटर्सच्या प्रवासी वाहनांच्या किमतीत होणारी ही तिसरी वाढ आहे. यापूर्वी १ एप्रिल २०२६ रोजी पेट्रोल-डिझेल वाहनांच्या किमतीत ०.५ टक्क्यांपर्यंत, तर १ जुलै २०२६ रोजी प्रवासी वाहनांच्या किमतीत १.५ टक्क्यांपर्यंत वाढ करण्यात आली होती.
ह्युंदाईकडूनही दरवाढीची घोषणा
दरम्यान, ह्युंदाई मोटर इंडियानेही सप्टेंबरपासून आपल्या वाहनांच्या किमतीत १ टक्क्यांपर्यंत वाढ करण्याची घोषणा केली आहे. कच्च्या मालाच्या वाढलेल्या किमती, जागतिक स्तरावरील युद्धजन्य परिस्थिती आणि आर्थिक अनिश्चितता यामुळे हा निर्णय घेतल्याचे कंपनीने सांगितले आहे.त्यामुळे टाटा आणि ह्युंदाईनंतर इतर वाहन कंपन्यांकडूनही दरवाढीची शक्यता व्यक्त केली जात असून, आगामी काळात नवीन कार खरेदी करणाऱ्या ग्राहकांच्या बजेटवर त्याचा परिणाम होण्याची शक्यता आहे.
तिरुवनंतपुरम : केरळमध्ये संघटनात्मक विस्ताराला वेग देताना शिवसेनेने सामाजिक सेवेला प्राधान्य देण्याची भूमिका स्पष्ट केली…
नाशिक : आगामी काळात देशात सत्ताबदल होणार असून, हा बदल काँग्रेस किंवा कोणत्याही राजकीय पक्षामुळे…
बीड : बीड येथील राष्ट्रीय पातळीवरील खो-खो खेळाडू तुकाराम करांडे याने पुण्यात आत्महत्या केल्याची धक्कादायक…
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीवरून सुरू झालेला पक्षांतर्गत वाद आता नव्या राजकीय आरोपांमुळे…
मुंबई: गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या हजारो भाविकांना दिलासा देणारा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनंतर एसटी…
मानवाच्या आहाराची रचना विशिष्ट पद्धतीने करण्यात आली आहे. नास्तापासून डिनरपर्यंत खाण्याचा विशिष्ट वेळ असतो. त्यावेळेच…